- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण, नुकसान झाल्यामुळे बाधितांना मदत देण्यासाठी रु.१ कोटी २० लाख १५ हजार १९५ इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.दरम्यान जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायत शेतीचे १ हजार ९२३ शेतकऱ्यांचे ५३७.६८ हेक्टर क्षेत्राचे ३३ % हून अधिक नुकसान झाले.फळपिकांचे ५ हजार ५९८ शेतकऱ्यांचे २ हजार १६२ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे तलाठी,ग्रामवसेवक व कृषिसहायक यांच्याद्वारे करण्यात आले आहेत. बाधितांना मदत देण्यासाठी रु.९ कोटी २३ लाख ७७ हजार ८००…
वसंत भोईर,वाडा गातेस – वाडा येथे अविष्कार बालसंस्कार शिबिर संपन्न, वाडा तालूकाच्या गातेस या गावात अविष्कार बालसंस्कार शिबिराची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली होती.काल या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला.या बालसंस्कार शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मुलांना संस्कारक्षम करण्याचे काम पालक व शिक्षक करत असतात.आज अधुनिकतेच्या युगात लहान मुले मोबाईल,टिव्ही,व्हिडिओ गेममध्ये गुरफटलेली पाहायला मिळतात. शाळांना सुट्या पडल्या की ती आणखी मुक्त होतात.पालकांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडे हवे तसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यात विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांचे लाड पुरवणारे आजी- आजोबा, काका – काकू यांच्याकडून त्यांना संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा भावनिक संवाद तुटतो.अशावेळी…
जव्हार,प्रतिनिधी जव्हार तहसीलदा्रांकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी, जव्हार तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गमन गावित यांनी गावाचा दौरा केला. तहसीलदार गावित यांनी ग्रामपंचायत वावर,जामसर, दाभलोन आणि किरमिरा या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली.त्यांनी नुकसानग्रस्त लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले आणि शासनाच्या वतीने शक्य ती मदत लवकरच पोहोचवण्यात येईल,असे आश्वासन दिले. यावेळी किरमीरा गावचे नुकसानग्रस्त लाभार्थी विलास गणपत दळवी यांनी सांगितले की, “ वादळी वाऱ्यामुळे माझ्या घराचे छप्पर उडून गेले असून संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये तहसीलदारांनी दिलेले आश्वासन दिलासा देणारी…
वसंत भोईर,वाडा पिकाला खत काय द्यायचे ? ” कृषीक,”ॲप वर कळणार, खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध खतांसाठी होणाऱ्या धावपळीला यंदा ब्रेक बसणार आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे” कृषीक,” हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खतासाठीची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात aali आहे. यामुळे खताच्या काळाबाजाराला आता आळा बसणार असून,शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा मिळणार आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची दरवर्षी खतासाठी होत असलेली धावपळ आता थांबणार आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून `कृषीक ʼ नवे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅप द्वारे सरकारने खते व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यात खा. हेमंत सवरा यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, गेल्या दोन दिवसात विक्रमगड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. या अस्मानी संकटात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खा.हेमंत सवरा यांनी आज तालुक्याचा दौरा केला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून यावेळी खा.सवरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश दिले.तसेच तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून विजपुरवठा खंडित झाला असुन वादळी वाऱ्यामुळे वीजेचे अनेक वीजेचे पोल जमीनदोस्त झाले आहेत.त्यासंदर्भातही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली.या पाहणी दौऱ्यामध्ये पालघर जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती संदिप पावडे व भाजपा विक्रमगड…
दीपक मोहिते, वसई विरार शहर मनपा निवडणूक ; आता फार कठीण आहे,कारण पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे,ते पुन्हा मागे वळू शकणार नाही…. गेल्यावर्षी मे महिन्यात लोकसभा व डिसें.महिन्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या.लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा अपेक्षित होता,तसाच तो लागला.पण विधानसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय विषश्लेकांचे डोळे पांढरे झाले.ज्या वसई,नालासोपारा विधानसभा मतदारसंघावर गेली तीन दशके बहुजन विकास आघाडीचे साम्राज्य होते.ते या विधानसभा निवडणुकीत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.या गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघात ज्या बविआने बाजी मारली,तोही त्यांच्या हातून निसटला.या तीनही जागा महायुतीने प्रचंड मताधिक्य घेत जिंकल्या.( वसई व नालासोपारा – भाजप/ बोईसर – शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) अशी…
दिपक मोहिते, वसई तालुका शिवसेना ( उबाठा ) सध्या प्रभावी नेतृत्वाच्या प्रतिक्षेत, परवा आमच्या वेबपोर्टलने शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर व काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) गटाच्या एका नाराज माजी पदाधिकाऱ्याने नांव न छापण्याच्या अटीवर स्फ़ोटक मुलाखत दिली. त्यानंतर वेबपोर्टलने शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर यांच्याशी मुलाखतीसाठी संपर्क केला.अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून मुलाखत देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली.मी पालघर लोकसभा संघटकाशी बोलतो त्यानंतर मुलाखत देतो,असे सांगून आमच्या स्टाफची त्यांनी बोळवण केली.तरीही आम्ही त्यांना प्रश्नावली पाठवली.पण त्यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षाच्या एका नाराज माजी पदाधिकाऱ्याला गाठले,पण त्यांनीही प्रारंभी आडेवेढे घेतले.पण त्यांची समजूत घालण्यात आम्ही…
दीपक मोहिते, हिंदुत्व म्हणजे व्यापक सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मिता, हिंदुत्वाची खरी ओळख केवळ धार्मिक परंपरा आणि श्रद्धा नसून ती एक व्यापक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मिता,अशी आहे. सावरकरांनी याला एक राजकीय विचारधारा म्हणून परिभाषित केले होते.ज्यात समान राष्ट्र,वंश आणि संस्कृती या घटकांचा समावेश आहे. सावरकरांनी केलेल्या व्याख्येनुसार हिंदुत्व म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आधारित,धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचे एकत्रीकरण होय. हिंदुत्वात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत,समान राष्ट्र,समान वंश आणि समान संस्कृती. हिंदुत्व केवळ धार्मिक नसून, एक व्यापक सांस्कृतिक ओळख आहे,जी भारतीय भूभागावर आधारीत आहे. सावरकरांनी हिंदुत्व,या शब्दाचा वापर एका राजकीय विचारसरणीसाठी केला होता. ज्यामध्ये भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेला महत्व देण्यात आले आहे. हिंदुत्व…
दीपक मोहिते ” वेळीच जागे व्हा,” पर्यावरणाचे संतुलन ढासळले तर मानवी विनाश अटळ – सोमय्या दत्ता जगभरात हवामान बदलावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे. जगभरातील ऋतू चक्रच बदलत आहे.उष्णतेमध्ये होत असलेली वाढ मानवाबरोबरच पशू पक्षी यांच्या जीवावर उठू लागली आहे.निसर्गाच्या चक्रात मानवी हस्तपेक्ष सुरू राहिल्यास निसर्गाचे बदलाचे धोकादायक परिणाम मानवी जीवनावर बेतू शकते,असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय तज्ञ सोमय्या दत्ता यांनी व्यक्त केले. हवामान बदल व त्यास सामोरे कसे जावे,याविषयी निर्मळ, वसई येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ” हवामान बदल,” याविषयावर फक्त चर्चा करून व १०-१५ झाड लावून हा प्रश्न सुटणार नाही.आज परिस्थती आपल्या हाताबाहेर जात आहे.कोळसा,तेल…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” जिल्हा परिषद शाळा बंद करणे ; ग्रामीण भागातील निरक्षरतेला आमंत्रण देण्यासारखे, अनेक देश आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेला सर्वाधिक महत्व देत असताना,आपले सरकार मात्र या महत्वाच्या विषयी कायम उदासीनच राहिले.सरकारच्या निष्क्रियतेचा विविध क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला आहे.” शिक्षणाचा अधिकार,” कायदा मंजूर होऊन देखील या व्यवस्थेतील बजबजपुरी नाहीशी होऊ शकली नाही.सरकारच्या अशा उदासीनतेमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येचा वेलू गगनावर पोहोचला आहे. सरकारचे या महत्वाच्या विषयाकडे कायम दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक,व्यापार,आयटी,उद्योग व रोजगार क्षेत्रात आपल्या देशाची चांगलीच पीछेहाट झाली.आज शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था पार कोलमडून पडली आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडू लागल्या आहेत.तर मायबाप…
