- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही,” ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेच्या निवडणुकीवरून वसई विरार भागातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे ती आता चुरशीची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही बँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपने गेल्या तीन दिवसांपासून विविध हातखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा, बोईसर व विक्रमगड या चार विधानसभा जिंकून भाजपने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर झालेल्या वसई- विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत ४४ जागा जिंकून बविआची चांगलीच दमछाक केली. आज…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा, ५१ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कार करणारा, मानवी हक्क व अधिकार यास सर्वोच्च प्राधान्य देणारा देश म्हणून जगभरात ओळख असलेल्या भारतात या दिवशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. सुमारे २१ महिने आपला देश अंधारात चाचपडत होता. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण सांगून इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने देशव्यापी आणीबाणीची शिफारस केली. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम ३५२ (१) नुसार देशभरात आणीबाणी जारी केली. पण लोकशाही व्यवस्थेवर दृढविश्वास असणाऱ्या भारतीय जनतेने या आणीबाणीला कडाडून विरोध…
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” ( उत्तरार्ध ) ठाकुर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ? काल प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखात ” ठाकुरको आखिर गुस्सा क्यों आया ? ” सदराखाली मी सविस्तर विवेचन केले होते. आजच्या भागात माजी आ. हितेंद्र ठाकूर यांचा संयम का सुटला ? आणि त्यामागची नेमकी काय कारणे आहेत ? यावर प्रकाश टाकणार आहे. भाजपच्या परिवर्तन पॅनल )मधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत हे कधीच स्वयंप्रकाशित असे व्यक्तिमत्व नव्हते व आजही नाही. नगरसेवक म्हणून त्यांची कारकिर्दही फारशी चर्चेत राहिली नाही.” दोन मामांचे वलय,” असलेला नवखा तरुण, अशी त्यांची ओळख होती व आजही ती तशीच आहे. गेल्या…
दीपक मोहिते, ” ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?” खूप दिवसानंतर आज पुन्हा मी एका राजकीय उलथापालथीवर लेख लिहीत आहेत. मी अनेकदा लिहीत आलो की राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कारण, राजकारणात कोणीच कोणाचे नसते.आज राज्यस्तरावर जे काही घडत आहे,तसाच काहीसा प्रकार ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला राजकारणात ” स्वार्थ,” हा नातेसंबंधाच्या सतत आड येऊ लागला आहे. त्याचा अनुभव वसई – विरार भागात पावलोपावली अनुभवायला मिळत आहे. काल या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणात तीव्र संताप व्यक्त केला.या संतापाचे कारण होते,त्यांचा भाचा,पक्षाचा माजी…
दीपक मोहिते, फ्रँटलाईन, देशात श्रीमंत – गरीब दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक… स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही यशस्वीरीत्या रुजली आणि ती सातत्याने परिपक्व होत आहे, असे अनेक घटनातज्ञाचे म्हणणे आहे. मात्र समाजात सध्या जी आर्थिक व सामाजिक विषमता पाहायला मिळत आहे, त्यावरून आपल्या देशात लोकशाही व्यवस्था अपेक्षेनुसार रुजू शकली नाही, असेच म्हणावे लागेल. गेल्या आठ दशकाच्या काळात श्रीमंत व गरीब यांच्यामधील दरी सतत रुंदावत गेली.जगात अनेक देश आपल्या लोकशाहीचे गोडवे गात असतात. पण, प्राप्त परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षात लोकशाहीच्या आडून आपण एकाधिकारशाही स्विकारल्याचे पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सध्या नरेंद्र मोदी या…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला… जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. त्यामुळे राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याची जी काही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अल निनोच्या प्रभावामुळे असे हवामान तज्ञाचे म्हणणे आहे. राज्यात केवळ २३ % टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३२ % इतका होता. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यावर फार मोठे संकट येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाऊस रखडल्यामुळे सरकारकडून पाणीकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक शहरात २० % पाणी कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकारने शहरी भागातील नागरिकांना पाणी जपून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र,” आज १९ जून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे.त्याचवेळी त्यांच्या पक्षाचे सहा खासदार शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाले आहेत. ही घटना उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी ठरली आहे. दुसरीकडे शिवसेनाही ( शिंदे गट ) त्याच दिवशी आपला वर्धापनदिन साजरा करत आहे.निवडणूक आयोगाने तीन वर्षांपूर्वी ( १७ फेब्रु.२०२३ ) रोजी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली व कालांतराने सेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही त्यांना बहाल केले.अशा सर्व परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष आपापले वर्धापनदिन साजरा करत आहेत.या चार वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, तुझ्या गळा,माझ्या गळा, गुंफू कोट्यांच्या माळा, महाराष्ट्र व प.बंगाल या दोन राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. केंद्र व राज्यस्तरासोबत जिल्हा,तालुका व ग्रामस्तरावर देखील या प्रकाराला अक्षरशः उत आला आहे. अशा या गैरप्रकाराला राजकीय पक्ष मिशन लोटस व टायगर मिशन,अशी गोंडस नांवे देत असतात. कमळ हे चिखलात उगवत असले तरी ते आपल्या पाकळ्याना कधी चिखल लागू देत नाही, पण भाजपने ते आता चिखलाने पार माखून टाकले आहे. टायगर ( वाघ ) हा एकेकाळी जंगलावर आपले वर्चस्व राखून असायचा, आज त्या टायगरला जंगलात राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये मुक्तसंचार करू लागला आहे. जंगलात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” १९८० चा अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही… ” सत्तेसाठी काय पन,” सध्या या वाक्याचा आपण पावलोपावली अनुभव घेतोय. ज्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा भारतीय राजकारणात दबदबा होता, तो नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ओसरत चालला आहे. बंगालची शेरनी आणि भावी पंतप्रधान म्हणून सतत गुणगान गाणारे त्यांचे सहकारी आता त्यांना सोडचिट्ठी देत आहेत. दोन महिन्यांपूर्वी जे भाजपला लाखोली वाहत होते, ते आज भाजपच्या तंबूत विसावले आहेत. सयानी घोष या ममता बॅनर्जी अत्यंत विश्वासू सहकारी, त्यांनी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची खिंड एकट्याने लढवली. मुळात प.बंगालच्या सिनेजगतातील त्या नावाजलेल्या पार्श्वगायिका व अभिनेत्री, ममता बॅनर्जी यांनी त्यांना राजकारणात आणले…
दीपक मोहिते, ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे… गेल्या काही दिवसापासून ” अल निनो,” ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हे अल निनो म्हणजे नक्की काय ? त्याची जगभरात इतकी दहशत का आहे ? या दोन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अल निनो हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ आहे ” लहान मुलगा किंवा बाल येशू,” असा आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोर या दोन देशाच्या किनारपट्टीवर ख्रिसमसच्या दरम्यान तप्त असा सागरी प्रवाह येतो. हे पाणी जेंव्हा उष्णतेचे उच्चतम पातळी गाठते, तेंव्हा जागतिक स्तरावर हवामान बदलत असते. या अल निनो च्या प्रभावामुळे…
