- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते वसई विरार शहर मनपा ; भाजप सर्वस्व पणाला लावणार… गेल्या पाच दिवसात news27.in या वेबपोर्टलने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रमुख पक्षांची कशी भूमिका असेल,या विषयी अनेक पैलू वाचकांसमोर आणले. वास्तविक या विषयी त्यांच्या प्रमुख नेत्यांनी भरभरून बोलायला हवे होते.पण दुर्देवाने तसे घडले नाही. त्यामुळे या सर्व मुलाखतीमध्ये दोन्ही बाजू समोर येऊ शकल्या नाहीत.या पक्षाच्या नेत्यांशी आम्ही सातत्याने संपर्क करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,पण शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष वगळता एकाही नेत्यांनी तशी हिंमत दाखवली नाही.त्यामुळे त्यांच्या पक्षातील असंतुष्ट आत्म्याचा आम्हाला आधार घ्यावा लागला.या माध्यमातून पक्षाची सद्यस्थिती,निवडणुकीची तयारी,पक्षातील अंतर्गत मतभेद व निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात आलेली मरगळ,इ.विषयी मतदारांना भरीव माहिती…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” युद्धानंतर पाकिस्तान कर्जाच्या खाईत सापडला आहे… पाकिस्तान किंवा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान,हा दक्षिण आशिया खंडातील एकदेश असून,हा भारताच्या वायव्य दिशेला आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे ( परगणा ) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची हे सर्वात मोठे शहर असुन ते व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे २५ कोटीच्या घरात असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा जगात सहाव्या क्रमांकांचा देश आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते.बोलीभाषा,वंश, भूगोल,वन्यप्राणी यात प्रचंड विविधता येथे पाहायला मिळते.पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, उद्योगीकरण,हे अद्याप उर्जितावस्थेत आहेत.लष्करी राजवट,राजकीय अस्थिरता,शेजारी…
वसंत भोईर,वाडा पडीक जमिनीवर फायदेशीर पिकांची लागवड करा, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी,यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत असतात.यामध्ये जमिनीवर औषधी वृक्ष लागवड,फुल पिक,तसेच फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबवण्यात आली आहे. फळबाग व औषधी वृक्ष लागवड या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळपिके व फुल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आवर वैयक्तिक बांधावर,सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळ झाड व फुल पीक लागवड करता येते.…
अनिकेत मेहेर,डहाणू माजी आ.लहानू कोम अनंतात विलीन, शिक्षणमहर्षी,समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करणारे आणि सदैव समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे,आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे अध्यक्ष,वारली समाजरत्न,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार,माजी आमदार, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज सकाळी ५.३५ च्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.गेले १० दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खाजगी इस्पितळात आय.सी.यू.मध्ये उपचार घेत होते. कॉम्रेड लहानू कोम यांचे पार्थिव उद्या सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत कम्युनिस्ट पार्टी कार्यालय,तलासरी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी ठीक ११:०० वाजता कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा तलासरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहॆ. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे…
सुरेश काटे,तलासरी हक्काच्या जमिनीचा मोबदला नाही ; शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा, मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी तलासरी तालुक्यातील लाखनपाडा परिसरातील २० हून अधिक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना तीन वर्षांनंतरही अद्याप मोबदला मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.याविषयी जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाल न केल्यास शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वडिलोपार्जित जमिनीत आंबा,चिकू,चिंच,काजू,खजुरी यांसारख्या शेकडो झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा मोबदला न देता संबंधित ठेकेदार कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले.परिणामी अनेक शेतकरी उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन नाहीसे झाले. शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.तीन प्रांताधिकारी बदलले,परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याला मोबदला…
दीपक मोहिते, स.गो.वर्टी मेमो.ट्रस्टतर्फे वसईत व्याख्यानाचे आयोजन, थोर समाजवादी नेते व १९५२ ते १९६२ या काळातमाजी आमदार असलेले.प्रा.स.गो.वर्टीसरांची येत्या १ जून रोजी जयंती आहे, त्यानिमित्ताने वसईत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश हायस्कुल येथे संध्या ४.३० होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित राहणार आहेत.वसईला एक थोर व्यसंगी बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न आणि निस्पृह नेतृत्व,अशी वर्टीसरांची ओळख आहे. निष्ठावंत व प्रामाणिक समाजवादी विचारवंत म्हणून कार्य करताना त्यांनी अन्याय,भ्रष्टाचारी व अनिष्ट प्रवृत्ती विरुद्ध आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी निकराची झुंज दिली. ” चले जाव,” चळवळीत म. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरांनी स्वतःला झोकून दिले. तसेच वसईतील अनेक तरुणांना आपल्याबरोबर…
सचिन परब,विरार जनसेवा फाउंडेशन संस्थेतर्फे आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला ग्रंथाची भेट, समाजातील तरुणाईला शैक्षणिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाठ्यपुस्तकी ज्ञानासह विविध क्षेत्रातील ज्ञान गरजेचे आहे. यामुळे वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी अर्नाळा आरमार प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून ग्रंथालय उभारण्यात आले आहे. या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उदंड प्रतिसाद मिळत आहे.अत्याधुनिक आणि मोबाईलच्या स्क्रीनवर गुरफटून गेलेल्या समाज वातावरणात पुस्तक वाचन संस्कृती जपली पाहिजे.या संकल्पनेला शाबासकी म्हणून,जनसेवा फाऊंडेशन संस्थेतर्फे विविध विषयांवरील शेकडो पुस्तके आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला भेट देण्यात आली.याप्रसंगी आरमार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश बावकर,सचिव भागेश बावकर,खजिनदार सिताराम घरत,सदस्य समीर अत्तार व अभय पुजारी उपस्थित होते.यावेळी अर्नाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जनसेवा फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याचा गौरव ; दोन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ” यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५,” अंतर्गत आयोजित उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था,गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी गौरव पुरस्कार सोहळा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला महामहीम राज्यपाल पी.सी.राधाकृष्णन उपस्थित होते.तसेच ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे व गृहराज्यमंत्री ( शहरे ), योगेश कदम हे देखील या सोहोळ्यास आवर्जून उपस्थित होते. सन २०२२-२३ साठी नितीन देऊ पवार,ग्रामपंचायत अधिकारी,मनोर ( ता.पालघर ) आणि सन २०२३-२४ करीता दिपक पांडुरंग पाटील,ग्रामपंचायत अधिकारी,गोऱ्हे ( ता. वाडा ) यांना हा गौरव प्राप्त झाला…
नदीम शेख,पालघर मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मोसमी पावसाने येत्या दोन दिवसात राज्यातील अधिक भागांत,तसेच मुंबई, पुणे,सोलापूर,कर्नाटक राज्यातील बेंगळुरू, तामिळनाडूचे उर्वरित भाग, तेलंगणा,आंध्रप्रदेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये आगमन केले आहे. आगामी ३ दिवसांत मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग,महाराष्ट्रा,कर्नाटकमधील अनेक क्षेत्रे,तेलंगणा, आंध्रप्रदेश,पश्चिम व उत्तर बंगालच्या उपसागर परिसर तसेच ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल,सिक्कीममध्येही पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक राज्यातील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असुन मराठवाडा आणि शेजारी असलेल्या भागांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाला आहे.या वातावरणाच्या प्रभावामुळे…
दीपक मोहिते, महानगरपालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असेल… गेल्या चार दिवसात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाखती आम्ही प्रसिद्ध केल्या.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टो. किंवा नोव्हें.महिन्यात राजकीय पक्षाची कशी तयारी आहे,यावर आपण प्रकाशझोत टाकला.आमच्या वेबपोर्टलने सुरू केलेल्या या उपक्रमाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर त्या पक्षांची महानगरपालिका निवडणुकीत काय स्थिती असेल ? यावर आम्ही सविस्तर विवेचन केले.डोळ्यात अंजन घालणारे हे विवेचन पक्षाचे अनेक नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पसंतीला उतरले.तर काही मूठभर राजकारण्यांच्या मात्र गळी उतरले नाही.त्यांनी थोडीफार नाराजी देखील व्यक्त केली. ९७…
