सुरेश काटे,तलासरी
हक्काच्या जमिनीचा मोबदला नाही ; शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा,
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी तलासरी तालुक्यातील लाखनपाडा परिसरातील २० हून अधिक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना तीन वर्षांनंतरही अद्याप मोबदला मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.याविषयी जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाल न केल्यास शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
वडिलोपार्जित जमिनीत आंबा,चिकू,चिंच,काजू,खजुरी यांसारख्या शेकडो झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा मोबदला न देता संबंधित ठेकेदार कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले.परिणामी अनेक शेतकरी उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन नाहीसे झाले.
शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.तीन प्रांताधिकारी बदलले,परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला असून, त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांची वनपट्ट्याची जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे.परंतु वनहक्क कायद्यानुसार देण्यात आलेल्या जमिनींवर मालकी असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे या शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाने कामाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना अनेक आश्वासने आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना ” केराची टोपली,” दाखवण्यात आली.त्यांच्या मते,महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपन्यांकडून आमची फसवणूक झाली आहे.
वडिलोपार्जित जमिनींचा तातडीने मोबदला द्यावा,
झाडांची किमत व नुकसान भरपाई द्यावी,
झोपड्यांचे पुनर्वसन करावे व
भूमिहीन होणाऱ्या कुटुंबांना पर्यायी जमीन द्यावी,अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, आमदार,खासदार यांच्याशी पत्रव्यवहार केला.मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या पार्श्वभूमीवर लवकरच मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन अडचणीत येते.

