- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे ५०% अनुदानावर शेतकऱ्यांना भात बियाणाचे वाटप, जव्हार येथे परिषद सेस फंड अंतर्गत शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर सुधारित भात बियाण्यांचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पालघरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, कृषी अधिकारी प्रशांत पाटील तसेच कृषी विभागातील इतर प्रमुख अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जव्हार परिसरातील शेतकरी हे भातशेती व्यवसायावर अवलंबून आहेत. यंदा वेळेवर आणि सवलतीच्या दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहॆ. भात बियाणे वाटप कार्यक्रमा दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया…
दीपक मोहिते, अर्नाळा किल्ल्याच्या किनारपट्टीला वादळीवाऱ्याचा तडाखा ; अनेक घरांची पडझड, गेल्या काही दिवसांपासून वसई तालुक्याच्या अर्नाळा,अर्नाळा किल्ला,कळंब व राजोडी या समुद्रकिनारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे.दोन दिवसापूर्वी वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्याचा मोठा फटका किनारपट्टीला बसत आहे. काल सायंकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे अर्नाळा किल्ला येथील अनेक घरावरील पत्रे उडून गेले.या घटनेमध्ये सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.५ ते १० मिनिटे झालेल्या वादळाने स्थानिक ग्रामस्थाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. विरार पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या तीन ते चार गावात दर पावसाळ्यात येथील स्थानिक ग्रामस्थाना नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागते.यंदाही वसई विरार मध्ये वादळीवाऱ्यासह पावसाचे सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रादेशिक…
वसंत भोईर,वाडा भात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड, वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे गमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानित भात पिकांच्या बियाणांचे वितरण करण्यात आले. दरम्यान कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.रांगेत उभे राहून कंटाळलेल्या अनेक शेतकऱ्यांवर अखेर बियाणे न घेताच घरी परतण्याची वेळ आली.कृषी विभागाच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला.त्यामुळे कुणबी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप हरड यांनी वाटपाची सविस्तर माहिती देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर्षी पाऊस मे महिन्यातच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली असून,शेतीची अवजारे व बी बियाणे जमा करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले…
दीपक मोहिते, दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे, अन्यथा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती अटळ आहॆ, ” हल्लाबोल,” गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेली अनेक कुटुंबे गृहकलहामुळे दुभंगली गेली.त्यामध्ये ठाकरे,पवार,मुंडे व अन्य काही कुटुंबाचा समावेश आहे.अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर आता ही कुटुंबे पुन्हा एकत्र येत असल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत.पण ते एकत्र येतील,असे वाटत नाही.यावर आम्ही अनेक लेख लिहिले,कारण सत्ता, स्वार्थ व नाती,ही कधीही एकत्र नांदत नाहीत.पण या लोकांचे एकत्र येणे,हा विषय चघळायला मिळाल्यामुळे अनेक वृत्तपत्राच्या कार्यालयाने आपल्या दैनिकाचे रकानेच्या रकाने भरले.वृत्तवाहिन्या व युट्युबर मंडळींनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. त्याचवेळी आमच्या वेबपोर्टलने मात्र हे कसे अशक्य आहे,ते आपल्या लेखातून वाचकांसमोर मांडले.असो,मात्र आज ही…
दीपक मोहिते, ” सावधगिरीचा काळ ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आगामी काळ अग्निदिव्य ठरणार आहॆ… गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी तिसऱ्यांदा देशाची धुरा शिरावर घेताना,देशासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती.त्याचा अनुभव पावलोपावली आपण घेत आहोत.देशासमोर असलेल्या समस्यामध्ये देशाची सुरक्षा,काश्मीर राज्यातील अस्थिरता,अतिरेकी कारवाया, आंतरराष्ट्रीय बाजारात रु.चे होत असलेले अवमूल्यन,कर्जाचा वाढता बोझा,कृषी क्षेत्राची झालेली वाताहात,देशभरात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या,वस्तू आणि सेवाकराच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल,इ.देशांतर्गत महत्वाच्या प्रश्नानी,अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे.अशा स्थितीत मोदी हे गेल्या वर्षी तिसरी इनिंग खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले व त्यांनी विरोधकांना नामोहरम करत पुन्हा बाजी मारली.गेल्या वेळी त्यांच्या पक्षाकडे सध्या बहुमत असले तरी गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आर्थिक निधी वळवणे ; दलित व आदिवासी आमदारांनी एकत्र येऊन अजित पवार यांच्या मनमानी कारभाराला चाप लावावा… राज्यात गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ” लाडकी बहीण योजना,” अंमलात आणली.त्याचे दृश्यपरिणाम आपल्याला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.समस्त महिलावर्गाने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात भरभरून मते टाकली.त्यामुळे महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला.निवडणुकीच्या प्रचारात गुलाबी कोट घालणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फार काळ हा कोट घालावा लागला नाही.सध्या ते पुन्हा सफेद कपड्यावर हिंडताना पाहायला मिळत आहेत. पण,आता या योजनेमुळे मंत्रिमंडळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.या योजनेसाठी लागणारा आर्थिक निधी कसा…
नदीम शेख,पालघर पालघर जिल्ह्यात खरीप हंगाम भातबियाणे वाटपाचा शुभारंभ, पालघर जिल्हा परिषद अंतर्गत खरीप हंगामासाठी भातबियाणे वाटपाचा शुभारंभ काल पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, गटविकास अधिकारी ( प्र. ) बापुराव नाळे आणि कृषी विभागातील अधिकारी तसेच अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद पालघरच्या कृषी विभागातर्फे गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत आहे.यावर्षीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असून,जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती ( पालघर, डहाणू,तलासरी,विक्रमगड, जव्हार,मोखाडा,वसई,वाडा ) कार्यालयांमध्ये भातबियाणे पोहोचले…
संजय नेवे,विक्रमगड नुकसानग्रस्त गावांना जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिली भेट, गेल्या दोन दिवसापूर्वी विक्रमगड तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे टेटवाळी – देहर्जे सवादे या भागात मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली.त्यामुळे भागात अनेक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांना भेटी दिल्या व परिस्थितीची पाहणी केली. तसेच साखरे येथे सुरू असलेल्या देहर्जे प्रकल्पाच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली. त्यानंतर विक्रमगड तालुक्यातील मलवाडा व म्हसेपाडा येथील गावानाही त्यांनी भेटी दिल्या.म्हसेपाडा येथे नदी असल्यामुळे त्या गावातील लोकांना पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी योग्य ती सोय नाही.त्यामुळे जिल्हाधिका ऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीची देखील पाहणी…
जव्हार प्रतिनिधी, पिकाची नुकसानभरपाई मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी सुखावले, शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहॆ. महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी दीर्घ व लघुकालीन योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.याच प्रयत्नाचा भाग म्हणून खावडाचार पार्ट सी म्हणजेच पूर्वाश्रमीची स्टरलाइट पॉवर यांच्या माध्यमातून उच्च वीजवाहक तारा व टॉवर उभारण्याचे काम पालघर जिल्ह्यात सध्या सुरू आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल २००० मेगा वॅट अतिरिक्त ऊर्जा मिळणार आहे. उच्च वीजवाहक तारा व टॉवर उभारल्यानंतर शेतकऱ्यांना त्याखाली पारंपारिक शेती व्यवसाय करण्याची मुभा देण्यात…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात दहा ठिकाणी रोबोटिक बोटीचे वाटप, जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यास निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.त्या अंतर्गत केळवे,सातपाटी वाणगाव डहाणू,घोलवड,तारापूर,या सहा सागरी पोलीस ठाणी, पालघर,डहाणू जव्हार,या तीन नगरपरिषदा व एक वाडा नगरपंचायत,अशा दहा ठिकाणी बोटी दिल्या आहेत. काल केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम,सहापोलीस निरीक्षक केळवा,विजया गोस्वामी,पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी,अदिवाल आणि सर्व सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच पालघर, डहाणू,जव्हार नगरपालिकेचे व वाडा नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे.कारण…
