- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, बंजारा समाजही आखाड्यात उतरला ; राज्याची वाटचाल अराजकतेच्या दिशेने … मराठा,ओबीसी,धनगर व आता बंजारा – वंजारी असे एकामागून एक समाज आरक्षणावरून आक्रमक होत आहेत.ही परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्राला अराजकाच्या दिशेने नेणारी ठरणार आहे.आपले राज्य हे आता एका वळणावर येऊन पोहोचले आहे.समाजा समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ओबीसी व मराठे,या दोन समाजामध्ये आग लावण्याचे काम काही पक्षाच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक केले.त्यांच्या या प्रयत्नाला या समाजाच्या नेत्यांनीही खतपाणी घातले,त्यामुळे राज्यातील सौहार्दाचे वातावरण पार बिघडले व सध्या राज्यात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.धनगर समाजानेही आता आरक्षणाची मागणी केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा न्यायालयात…
सचिन सावंत,विरार विवा महाविद्यालयात “श्रावणधारा” स्पर्धेचे यशस्वी आयोजन, विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेत याही वर्षी “ श्रावणधारा,” या कार्यक्रमांतर्गत चित्रकला व लोकगीत गायन या दोन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,असे तीन गट सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी एकूण ९७ जणांनी नोंदणी केली होती.स्पर्धांचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ ग्रंथालयाच्या वाचन कक्षात नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे व ग्रंथालय समिती सदस्या डॉ.निलीमा भागवत उपस्थित होत्या. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदन नंतर ग्रंथपाल डॉ.नागरत्ना पलोटी यांच्या प्रास्ताविकतेने झाली.समारंभाचे सूत्रसंचालन…
वसंत भोईर,वाडा वाड्यातील शेतकऱ्यांना किवावरील मासेमारीचा उत्पन्नाला हातभार, पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने १३ ते १८ सप्टें. या दरम्यान पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे.येथील नदी- नाले,ओहोळ तुडूंब भरून वाहत आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात छोट्या मोठ्या ओहोळ – नाले,रस्त्यावरील मोरी शेजारी,शेतातील बांधावर ” किव,” करून शेतकरी सध्या मासेमारी करत आहेत.या मासेमारीमुळे काही दिवस शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत असतो. तालुक्यातील वाडा, कुडूस,शिरीषफाटा, खानिवली,अंबाडी या बाजारपेठेत माश्यांची विक्री होत असते.३०० ते ३५० रु. किलो या दराने माश्यांची विक्री होत आहे. वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पावसाळ्यात भातशेतीची लागवड केल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या शेतात तसेच पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे मिळत असतात.तर काही…
जव्हार प्रतिनिधी, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय,जव्हारची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर यांनी भूषवले.सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कार्यवाह मनोज कामडी यांनी प्रस्ताविकामध्ये वाचनालयाची वाटचाल, आतापर्यंत राबविलेले उपक्रम व भावी योजनांची माहिती देऊन उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. तसेच यावेळी वाचनालयाचे उत्कृष्ट वाचक म्हणून वाचनालयाचे सभासद,वाचक सुभाष बोरसे यांचा अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ व वृक्ष भेट देऊन विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. सभेच्या कामकाजात मागील सभेचे इतिवृत्त वाचन व अनुमोदन,…
वाडा प्रतिनिधी, गावाला आत्मनिर्भर बनवणं हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या क्षेत्रात एक नवे पर्व ठरणार असून या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता,पारदर्शक कारभार आणि जबाबदार नेतृत्व प्रदान करणे हा आहे.गावोगाव रोजगार निर्मितीला चालना देणे,शेतीपुरक व लघुउद्योग वाढवणे महिलांचे सबलीकरण करणे तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव बदल घडवून गावाला आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याची माहिती खासदार डाॅ.हेमंत सवरा यांनी वाडा येथे बोलताना दिली. ग्रामविकास विभागातर्फे राबवण्यात येणा-या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वाडा येथील पां.जा.विद्यालय सभागृहात करण्यात आले होते.त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते…
सचिन सावंत,विरार बविआच्या महिला कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा संपन्न, विरार पूर्व येथे बहुजन विकास आघाडीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटक-सचिव तथा प्रवक्ते अजीव पाटील यांच्या उपस्थितीत विरार पूर्व येथील जीडी गार्डन हॉल,विवा तारांगण येथे काल सायं. मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.त्यानंतर त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रविणा ठाकुर यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवणे यावर भर दिला.लोकांची कामे आपण करत आलो आहोत आणि यापुढेही करतच राहणार आहोत.त्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागेल,ती…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.११, प्रभाग क्र.११ हा भौगोलिकदृष्ट्या विचित्र व त्रासदायक, या प्रभागात बाहेरून स्थायिक झालेले सर्वसामान्य नागरिक व स्थानिक रहिवाश्यांचा समावेश आहे.समेळपाडा,निळेगाव,उमराळे तलाव,पाटील आळी,खवणे आळी,करमाळे या परिसरात स्थानिक भूमीपुत्राचा भरणा आहे.त्यामध्ये सामवेदी,कुपारी,या समाजाचा समावेश आहे.तर म्हाडा कॉलोनी सिद्धिविनायक हॉस्पिटल,यशवंत नगर,श्रीप्रस्थ,सिविक सेंटर व साईबाबा मंदिर येथील नागरी वसाहतीमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.पूर्वी येथील मतदार हा कायम बहुजन विकास आघाडीचा समर्थक म्हणून ओळखला जायचा.सामवेदी हा समाज कायम हिंदुत्वाचा समर्थक राहिला असून तो आपली मते शिवसेनेला देत असतो.यावेळी ती मते भाजपच्या पारड्यात जातील,असा अंदाज आहे.उर्वरित ख्रिस्ती समाजाची मते ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये…
दीपक मोहिते, मुंबई नव्हे तर अहमदाबाद,देशाची आर्थिक राजधानी बनवण्याचे कटकारस्थान, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यासाठी सरकार,आवश्यक असलेल्या जमिनी साम,दाम,दंड,भेद,निती वापरून ताब्यात घेत आहे.जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने पैश्याच्या थैल्या सध्या मोकळ्या केल्या आहेत.या जमिनी बाजारभावापेक्षा अधिक भाव देऊन खरेदी करण्याचा सरकारने धुमधडाका लावला आहे.त्यामुळे सरकारच्या या गोरखधंद्या विरोधात आंदोलने होत नाहीत.सरकारच्या या कुटील डावाला स्थानिक भूमिपुत्र बळी पडत आहेत.जमीन खरेदी व्यवहारात सरकार सध्या कोटी कोटीची उड्डाणे घेत आहे.अपेक्षेपेक्षा अधिक पैसा हाती खुळखुळू लागल्यामुळे भूमिपुत्राचा आवाजच दबला गेला.पूर्वी जमीन संपादन हा विषय अत्यंत ज्वलंत,असा होता.उरण येथे काही वर्षांपूर्वी…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१०, गुजराती व उत्तर भारतीयांचे मतदान निर्णायक ठरणार… प्रभाग क्र.१० ची रचना विचित्र अशी असून या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रचारादरम्यान चांगलीच दमछाक होणार आहे.या प्रभागात एकूण ४६ हजार ९८९ मतदार असून त्यामध्ये अनु.जमाती – २ हजार १६५ तर अनु.जाती – १ हजार २८ मतदारांचा समावेश आहे. या प्रभागात सर्वाधिक मतदार गुजराती भाषिक आहेत,त्यानंतर उत्तर भारतीय मतदारांचा नंबर लागतो.या दोन्ही समाजाच्या तुलनेत मराठी समाजाची लोकसंख्या फार कमी आहे.गेल्या दोन निवडणुकीत येथील मतदारांनी बहुजन विकास आघाडी व काही प्रमाणात एकसंघ शिवसेनेच्या पदरात मताचे दान टाकले.परंतु आता मात्र चित्र पालटले आहे.येथील मतदारांमध्ये सध्या बदलाचे वातावरण आहे.वर्षानुवर्षे…
दीपक मोहिते, सामाजिक भान, अर्नाळा जलमार्गांवरील पुलाचे काम सूरू होण्याची शक्यता, वसईच्या आ.ॲड.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत आपल्या वसई मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा शासनस्तरावर सतत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे अनेक विकासकामे आता मार्गी लागत आहेत.गेल्या जून महिन्यात त्यांना अर्नाळा ग्रामपंचायतीने अर्नाळा किल्ला व अर्नाळा गाव दरम्यान जलमार्गावरील वर्षानुवर्षे रखडलेला पूल बांधण्यात यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाच्या आधारे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्या कानावर सदर बाब घातली होती.या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागाला याप्रकरणी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार शासनस्तरावर हालचाली…
