Author: दीपक मोहिते

वादळी वा-यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान, वसंत भोईर, वाडा तालुक्यातील अंबाडी परिसरात काळ दुपारी सुटलेल्या जोरदार वादळीवाऱ्याने दुगाडफाटा या गावातील अनेक शेतकऱ्याच्या राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दहा ते पंधरा मिनिटे सुटलेल्या या वादळवाऱ्याने दुगाड मोहिली मालबिडी परिसरातील घरांवरचे छप्पर,कौले व शेड्स उडाले.त्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ग्रामस्थांनी आपल्या घरावर लावलेले सोनल पॅनल, रस्त्यालगतची झाडे व वीजेचे खांब कोसळले.अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या वावटळीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे.महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे,अशी मागणी दुगाडवासीयांनी केली…

Read More

दीपक मोहिते, पत्रकार आरिफ पटेल त्रासद निरोध, दैनिक मनोर खासदार व मराठी साप्ताहिक विकास वृत्ताचे संपादक आरिफाचे पटेल प्रयत्न हृदयविकार तीव्र झटक्याने निराकरण केले.मृत्यूसमयी ते ५६ वर्षाचे होते.गेल्या अनेक वर्षापासून आरिफाचे लोकमतच्या स्थानिक लोक समस्या सोडवण्याची पराकाष्ठी केली. तसेच विकासाचे नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू होते.या चॅनेलच्या स्थानावर त्यांनी अनेक समस्या केल्या आहेत. स्थानिक प्रशासकीय निदर्शनास आणल्या आहेत. ,येथे बसण्यात आले होते, मात्र त्यांची प्राणज्योत मावळली.घटनेची माहिती देण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी हॉस्पिटलमध्ये धावा व त्यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेतले.रात्री उशीरा आरिफ पटेलवर तेन गावाच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More

दीपक मोहिते, “सांस बोल,” तीन इंजिनचे पुन्हा सरकारचे रुळावर, अशक्यच… लोक शब्द महायुतीला जबर फटका बसला तीन इंजिनचे सरकार सध्या खिरापत सुटले आहे.सरकारने सार्वजनिक पैश्याची कितीही उधळपट्टी केली तरी लोकल त्यांना १०० % धोबीपछाड देतील, यात बिलकुल शंका नाही.कायदा व सुटलची खालची स्थिती, वाढती महागाई,बेरोजगारी,उयोगधंदे विकासे खुंटली गेलेली,कृषी क्षेत्राची स्थिती,शेतकऱ्यांची हलाखी परिस्थिती,मराठी आणि सरकारची चालाखीची परिस्थिती,इ.कारणे महायुतीदिनाला कारण ठरणार आहेत.या तीन भागांत गेल्या अडीच वर्षात खाली जमिनीची गरज, त्यांच्या लाखोंच्या समस्या,सोडवनावर भराव टाकणे. कोटीरापत वाटणे,यामध्ये धन्यता मानली. त्यांनी विश्वस्तांच्या भूमिकेत राज्यशकट हाकणे भूमिकेत राहणे, पण तेच वावरत आहेत. प्रश्न आता वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी विचार करू लागले आहेत. अनेक योजना…

Read More

वसई-विरार मनपा क्षेत्राला देहर्जे प्रकल्पातून १९५ द.ल.लि.पाणी मिळणार, पालघर, देहेर्जे प्रकल्पातून वसई विरार शहर महानगरपालिकेस १९५ द.ल.ली.पाणी उपलब्ध करून देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी संबधित विभागांना निर्देश दिले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सन २०५५ च्या प्रस्तावित लोकसंख्येस पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी देहेर्जे मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्याबाबतच्या आ.हितेंद्र ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले होते.उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच विधानभवन,मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकी कार्यवाही करण्यासंदर्भात नगर विकास विभागाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व जलसंपदा विभागास निर्देश दिले.तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या १५३ व्या बैठकीतील इतिवृत्तात पाणी वाटपाचे नियोजन अंतर्गत १९५…

Read More

भुईगावला समुद्र गिळंकृत करणार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण, दीपक मोहिते, वसई तालुक्याच्या पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या भुईगाव येथे पर्यटक, पक्षीप्रेमीसाठी खूप प्रसिद्ध आहे.सागरी उत्पादनावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव समुद्र किनाऱ्याला पहिली पसंती देत असतात.पर्यटनसोबतच भुईगावला समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात, चवळी,गवार,वाल,दुधी आदी शेती करण्यात येते. पर्यटक व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य भुईगाव समुद्र किनारा हा हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. २५ वर्षांपूर्वी शासन व गावकरी यांच्या प्रयत्नाने या समुद्रकिनारी १२ हजाराहून अधिक सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती.सुरुच्या सुंदर बागेमुळे किनाऱ्याची होणारी धूप रोखणे,सोबत समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडत होती.परंतु मागील २-३ वर्षापासून प्रचंड भरती व किनारपट्टी भागात वाढत असलेली अतिक्रमणे,यामुळे समुद्राचे पाणी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एक तर तू असशील नाही तर मी, बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले, उद्धव ठाकरे यांचा तळतळाट, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस,या दोघामध्ये सुरू झालेले वाकयुद्ध आता चांगलेच हातघाईवर आले आहे.उद्धव ठाकरे यांनी प्रथमच एकेरीवर येत,” एक तर तू असशील किंवा मी असेन,” व बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले,असे जाहीर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस,अमोल मिटकरी- देशपांडे,विद्या चव्हाण-चित्रा वाघ,असा कलगीतुरा रंगू लागला आहे.आपण व आपल्या मुलाला तुरुंगात पाठवण्यासाठी फडणवीस यांनी कटकारस्थाने केल्याचे उघड झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संयम सुटला व त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.अमोल मिटकरी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारणात आततायीपणा करून चालत नाही, राजकारणात अहंकार,उर्मटपणा,तोरा व दुसऱ्याला तुच्छ लेखणे,हे फार काळ चालत नाही.हे स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मतांनी पराभव केला होता.त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेंव्हा स्मृती इराणीच्या कार्यकर्त्यांना हर्षवायू झाला होता.स्मृती इराणी सहजपणे निवडून येतील,असा विश्वास त्यांना वाटला होता.त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यानी ” राहुल गांधी यांनी अमेठीमधून पळ काढला,” अशा आरोळ्या ठोकल्या.पण निकाल जाहीर होताच,दस्तुरखुद्द स्मृती इराणी व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तोंड लपवत केंद्रातून अक्षरशः पळ काढला.स्मृती इराणी यांनी मतदारसंघात…

Read More

आम्हालाही शिकायचंय..! दीपक मोहिते, केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१० रोजी शिक्षण अधिकार कायदा २००९,लागू केला.६ ते १४ वयोगटातील मुलाना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे,असा उद्देश हा कायदा करण्यामागे होता.परंतु १० वर्षे उलटून गेल्यानंतरही या वयोगटातील लाखो मुले आज प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक मुलाला शाळेत आणणे,टिकवणे,त्यास गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे,व अन्य चांगले उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा कायदा केला.परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी मानसिकता सरकारकडे असायला हवी होती,ती सरकारने आजवर दाखवली नाही.कायदा केला,परंतु तो कठोरपणे राबवला नाही.त्यामुळे आजही लाखो मुलांचे भवितव्य अंधारात चाचपडत आहे.अठरापगड दारिद्र असलेल्या लाखो कुटुंबातील ही…

Read More

वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे गोविंदाना विम्याचे संरक्षण, पालघर, सालाबादप्रमाणे सामाजिक व धार्मिक उत्सव ” गोपाळकाला,” ( दहीहंडी ) मंगळ.२७ ऑगस्ट, २०२४ रोजी मनपा क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.तालुक्यातील अनेक गोविंदा पथके या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात.दहीहंडी उत्सवात भाग घेणारे गोविंदा पथक आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात.उत्सवामधील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या गोविंदाना ( खेळाडू ) विम्याचे संरक्षण मिळावे,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी पथकातील सर्व गोविंदांचा मोफत अपघात विमा काढण्यात येतो.यंदाही तशी व्यवस्था करण्यात आली आहे.गोविंदा अपघात विमा योजनेचा अर्ज महानगरपालिकेच्या vvcmc.in…

Read More

पालघर, रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नायगाव येथे रिक्षाचालकांचा रास्ता रोको, नुकत्याच झालेल्या मुसळधारवृष्टीत वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.” रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संबधित विभागाचे अधिकारी कोणत्याही उपाययोजना करत नसल्यामुळे आज नायगाव येथे रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. वसई तालुक्यात विरार,नालासोपारा,वसई व नायगाव,या शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या सर्व रस्त्यावरून वाहतूक करणे, दिवसेंदिवस धोकादायक झाले आहे.अनेक भागात अपघात होऊनही रस्ते विकास,महानगरपालिका व सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.त्यामुळे नागरिक व रिक्षाचालकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.आज नायगाव येथे या असंतोषाचा स्फोट झाला.नायगाव-बाफाणे दरम्यान रस्त्याची पार दुर्दशा…

Read More