- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, आता वेध महानगरपालिका निवडणुकीचे… जून २०२० पासून वसई – विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवटीचा अंमल आहे.केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.शिंदे सरकारने या निवडणुका विविध कारणावरून पुढे ढकलल्या.या निवडणुकांमध्ये महायुतीचा पराभव होईल,या भितीतून फडणवीस व शिंदे यांनी कोरोना व नंतर ओबीसी प्रश्नावरून त्या लांबणीवर टाकल्या.या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी सरकार आता न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका निकालात काढण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे राज्यातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतील,असा अंदाज आहे. मुंबई,ठाणे,भिवंडी,कल्याण – डोंबिवली,उल्हासनगर, कुळगाव -…
संजय लांडगे,वाडा शहर, स्व.विष्णू सवरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्णांना फळवाटप, महाराष्ट्र राज्याचे माझी आदिवासी विकासमंत्री स्व. विष्णू सवरा यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना पाटील म्हणाले की,सवरा यांनी फक्त वाड्यासाठीच नाही,तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांचे कार्य अविस्मरणीय असे होते.त्यांच्या अकाली निधनाने पालघर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चाचे पालघर जिल्ह्याध्यक्ष कुणाला साळवी यांनी केले होते. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी रोहन पाटील, कुणाल साळवी,राजेश…
राजू पडबिद्री बेळगाव, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फुटले ; नेत्यांना राज्यात प्रवेशबंदी कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे.वादाची ठिणगी आता नव्याने पडली आहे.कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे.त्यास विरोध करण्यासाठी याच बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरू झाली.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते कर्नाटक पोलिसांच्या रडारवर…
दीपक मोहिते, भयाण वास्तव,भाग क्र.५ जिल्हानिर्मितीनंतर आदिवासी जमिनी वेगाने लुटण्यात येत आहेत, मुंबईलगत असलेला पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्ह्यात होता,२०१४ साली या जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला.या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे जिल्ह्याला आदिवासी दर्जा देण्यात आला.पण सरकारचा हा निर्णय आदिवासी समाजाला कितपत फायदेशीर ठरला,हा एक वेगळा विषय आहे. आदिवासी समाजाला केंद्रबिंदू ठेवून सरकारने दहा वर्षापूर्वी जिल्ह्याची ” दिशा व दशा,” निश्चित केली.त्यानुसार जिल्ह्याचा कारभारही सुरू झाला.सुरुवातीचा काळ स्थिरस्थावर होण्यात गेला.जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे करण्यात आल्यामुळे जव्हार,मोखाडा व विक्रमगडवासियांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते,कालांतराने ते निवळले.जिल्हा निर्मितीमुळे आदिवासी लोकांच्या जीवनात काही बदल झाला का ? त्यांचे…
दीपक मोहिते, ईव्हीएम मशीन ; सरकार घाबरतयं का ? आज ना उद्या अंध:कार दूर होणार.. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल संशयास्पद असल्याचे उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे म्हणणे आहे,त्याची शहानिशा व्हावी,यासाठी राजकीय पक्ष विविध सामाजिक संस्था सध्या आक्रमक झाल्या आहेत.त्यांच्या या मागणीची दखल केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय घ्यायला तयार नाहीत.सदर बाब भारतीय संविधानातील कलम ५० चे उल्लंघन आहे.या कलमानुसार न्याययंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून अलिप्त असली पाहिजे.पण गेल्या दहा वर्षात केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय हे दोघे एकाही प्रकरणी अलिप्त नसल्याचे दिसून आले आहे.तर कलम ५१ क नुसार संविधानाचे पालन करणे,हे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते.पण सरकार गेल्या दहा…
नादुरुस्त व कालबाह्य एसटी बसेसमुळे प्रवासी हैराण,खा.डॉ.सवरा यांनी लक्ष घालावे, जव्हार ( प्रतिनिधी ) जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांतील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय असलेल्या जव्हार एसटी आगारातील बसेसची अवस्था दयनीय झाली आहे.या बससेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सतत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विस्कळीत बससेवा,वेळेत येजा न करणाऱ्या बसेस, प्रवासादरम्यान बसेस नादुरुस्त होणे,अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्तआहेत. जव्हार एसटी आगारातून दररोज प्रवाशांसाठी ५३ फेऱ्या चालवण्यात येतात.यामध्ये ३८ बसेस प्रवासी वाहतुकीसाठी तर १८ बसेस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत.मात्र,जवळपास ५६ बसेसपैकी ५० बसेस जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसच्या तुटलेल्या खिडक्या,गळकी छते, तुटलेल्या खुर्च्या अशा समस्यांमुळे प्रवासी नाराज आहेत.पावसाळ्यात गळणाऱ्या…
संजय लांडगे,वाडा शहर, विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षेसोबत इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे-खा. डॉ.सावरा, शालेय विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासह इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी व आपल्या परिवाराचे तसेच देशाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन खा.डॉ. हेमंत सावरा यांनी विद्यार्थ्यांना केले.वाडा शहरातील नुरबाग हॉल येथे आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धा परीक्षेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. क्रांतिज्योत बहुउदेशीय सामाजिक संघटना व आय. टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,आयोजित थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय व्हावी,ग्रामीण,दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी – युपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी,या उद्देशाने स्पर्धांचे…
दीपक मोहिते, हवामानातील बदलामुळे कृषी उत्पन्नावर विविध रोगाचे आक्रमण, राज्यात गेल्या पाच दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्राला जबर फटका बसला आहे.गहू तुर,कांदा,हळद सोयाबीन द्राक्ष व अन्य कृषी उत्पन्नावर विविध रोगाचे आक्रमण झाले आहे.मात्र या ज्वलंत समस्येबाबत राज्याचे कृषी विभाग मात्र उदासीन आहे.विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा,अशी मागणी केली आहे. वातावरणात झालेला बदल,हा शेतकऱ्यांना मारक ठरला असून अनेक पिकांवर रोग पडला आहे.यवतमाळ जिल्ह्यात हळदी पिकावर करपा रोग पडला असून या जिल्ह्यात हजारो हे.जमिनीवर हळदीची लागवड करण्यात येत असते.या रोगाच्या आक्रमणाने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत.कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती…
दीपक मोहिते, १२ वी मॅरेथॉन स्पर्धा ; कालिदास हिरवे,रोहित वर्मा व सानिका अंतिम विजेते, थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करीत १२ व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉनमध्ये उच्चभ्रू खेळाडूंनी कोर्स रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये ५८ लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली. २ तास १८ मिनिटे आणि १९ सेकंदांच्या वेळेसह, साताऱ्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला,परंतु त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली.हिरवे यांच्या पाच सेकंदमागे त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला.दोन वेळा विजेता, दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहित राठोडने २…
दीपक मोहिते, अभ्यास दौरा, वसई विकासिनी दृककला विद्यार्थ्यांची चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट, वसईमधील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आज चित्रकला साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट घेऊन चित्रकलेच्या साहित्य निर्मितीची माहिती घेतली.ही भेट म्हणजे एकप्रकारचा अभ्यास दौराच होता. चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देणारे वसई विकासिनी हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्रे काढून चित्रकलेचा मनमुराद आनंद लुटला. वसईतील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे ५३ विद्यार्थी,६ शिक्षक,वसई विकासिनी संस्थेचे विश्व्स्त सचिव जयंत देसले आणि कार्यकारीणी सचिव विजय वर्तक यांनी उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीचे मालक संतोष रवेशीया त्यांचे चिरंजीव ओम…
