- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, राज्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट,धरणातील पाणीसाठा खालावत चालला आहे, राज्याच्या तलावातील पाण्याची स्थिती चिंताजनक असुन यंदा जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्याच्या धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच राज्यातील सुमारे साडेतीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा ५१ टक्क्यांवर आला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.फेब्रु.च्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे.परिणामी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” भाजपमध्ये निष्ठावंताची प्रचंड हेटाळणी,फडणवीस यांच्या लेखी पक्षनिष्ठा नगण्य, विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी काल भाजपने आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत.यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना आणि प्रामुख्याने माधव भंडारी यांना डावलण्यात आले आहे. भाजप स्वतःला इतरांपेक्षा स्वतःला वेगळा पक्ष म्हणवतो, पण सध्या हा पक्ष देखील काँग्रेसच्या वळणावर येऊन पोहोचला आहे.इतर पक्षाचे आमदार व खासदार फोडणे, त्यांना लाभाची पदे देणे,इ. गैरकामांना अक्षरशः ऊत आला आहे.तपास यंत्रणाचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अनेकांना गेल्या बारा वर्षात भाजपने लाभाच्या पदाची खिरापती वाटल्या.संपूर्ण राजकीय जीवन काँग्रेसमध्ये घालवलेल्या विखेंना महसूल, जलसंधारण अशी महत्वाची खाती मिळाली.एका दिवसात भाजपमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खासदारकी मिळाली. मात्र…
जव्हार प्रतिनिधी, व्याख्याते व शिक्षक नितीन आहेर शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित, समाजहित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन,मलकापूर यांच्या वतीने ” राष्ट्रभक्ती सेवा पुरस्कार २०२५, ” राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुत्रसंचालक तथा व्याख्याते जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नितीन वामनराव आहेर यांना ” शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्कार,” देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नितीन आहेर यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान असुन कोरोना काळात त्यांनी आरोग्य विभागाला अडीच लाखांचा कोविड निधी…
दीपक मोहिते, राज्यात नक्की काय चाललंय ? महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा २०२४ ; सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करणारा नसावा, राज्याच्या विधिमंडळ सचिवालयाने विधानसभा क्र.३३ विधेयक संदर्भात सर्वसामान्य जनता,विधिमंडळाचे माजी सदस्य,सामाजिक संघटना,संस्था,यांच्याकडून सूचना व सुधारणा संदर्भात अभिप्राय मागवले आहेत.गेल्या ११ जुलै २०२४ रोजी तत्कालीन महायुतीच्या सरकारने ” महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम २०२४,” आणले होते.बेकायदेशीर कृत्यांचा अत्यंत प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी व अन्य कारणासाठी हे विधेयक आणल्याचे सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते.या विधेयकाचा मुख्य हा उद्देश शहरी भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करणे,असा आहे.पण या विधेयकाचा गैरवापर होईल,अशी भिती विरोधी पक्षांनी व्यक्त केल्यानंतर या विधेयकाचा मसुदा संयुक्त समितीकडे पाठवण्यात आला होता.या संदर्भात विधिमंडळ सचिवालयाने आता…
दीपक मोहिते, १९ मार्च रोजी विरार पूर्व भागात इफ्तार पार्टीचे आयोजन, सालाबादप्रमाणे यंदाही अंजुमन – ए – इस्लाम,या संस्थेतर्फे बुध.१९ मार्च रोजी सां.६.०० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे.यंदाचे हे ३३ वे वर्ष आहे.दरवर्षी संस्था मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टीचे आयोजन करत आली आहे. अंजुमन – ए – इस्लाम ही संस्था गेली तीन दशके शिक्षण,सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.संस्थेतर्फे आजवर शेकडो उपक्रम राबवण्यात आले आहेत.सामाजिक सलोखा व बंधुभाव हा संस्थेचा पाया असून संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या परीने शैक्षणिक साहित्य व इतर मदत करत असते. विरार पूर्व भागातील मंगल हॉल,चंदनसार विरार येथे…
दीपक मोहिते, सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी,आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित, सामाजिक बांधिलकीतून निस्वार्थ सेवा करणाऱ्या आणि समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन, मलकापूरच्या वतीने ” राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार २०२५,” राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा भव्य सोहळा १६ मार्च २०२५ रोजी तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल, ४० बिघा,मलकापूर,जि. बुलढाणा येथे पार पडला. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील शिरोशी गावातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व तालूका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांना ” आदर्श समाजरत्न पुरस्कार,” देऊन गौरवण्यात आले.ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू नागरिकांना मदतीचा हात देणारे,महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मनोज…
शुभम सावंत,विरार बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या : शिक्षिका आणि प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल, आपली शिक्षण व्यवस्था कायम प्रकाशझोतात असते,परीक्षेचे पेपर फुटणे,परीक्षेत सर्रास कॉपी करणे,उत्तर पत्रिका गहाळ होणे,असले प्रकार आपल्या पाचवीला पुजले आहेत.शिक्षण विभागात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही.शिक्षणाचा सुमार दर्जा,शिक्षकांची अपुरी संख्या,त्यामुळे शाळेची पटसंख्या खालावणे व वेगाने बंद पडणाऱ्या शाळा इ. कारणामुळे आपले शिक्षण विभाग बदनाम झाले आहे. सध्या पालघर जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणाने आपल्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. बारावी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात विरारच्या बोळींज पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकीने या उत्तरपत्रिका बेकायदेशीरपणे…
वसंत भोईर,वाडा वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर, तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून वाडा तालुका देखरेख संघ,वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था,चांबळे सेवा सहकारी संस्था,आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या एप्रिलमध्ये होणार आहेत.या संस्थांची निवडणूक १९एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची करायची आहेत.तर २४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान माघार घेता येणार आहे. वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे.या संस्थेची इमारत असुन त्यामध्ये व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे.मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने…
जव्हार प्रतिनिधी, अपघातग्रस्त चालकाला आर्थिक मदतीचा हात, समाजामध्ये संकटसमयी एकमेकांना आधार देणे,ही खरी माणुसकीची भावना आहे.याचे जिवंत उदाहरण जय हिंद चालक-मालक संघटनेने नुकतेच घालून दिले. संघटनेच्या एका सदस्याचा अपघात झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि आर्थिक सहकार्य करून चालकाच्या कुटुंबाला दिलासा दिला. जव्हार तालुक्यातील तसेच गुजरात सीमेलगत असलेल्या दादरानगर हवेली सीमेलगत असलेल्या रुईघर गावातील जय हिंद चालक-मालक संघटनेचा एक सदस्य आपल्या खाजगी जीपने रात्री घरी परतत असताना दुर्दैवी अपघाताला सामोरा गेला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीपचा मोठा अपघात झाला.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत,त्याला सिल्वासा येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सांगितल्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.या…
दीपक मोहिते, गेले ते दिवस, रोजगार हमी योजनेचे जनक, वि.स.पागे यांचा आज स्मृतिदिन, काही वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ पडला असताना ऐतिहासिक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील जनतेचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रोजगार हमी योजना सुरु करणाऱ्या वि.स.पागे यांचा आज स्मृतिदिन आहे.२१ जुलै १९१० रोजी वाळवा तालुक्यातील बागणी येथे त्यांचा जन्म झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथे झाले.त्यानंतर ते संस्कृत विषय घेऊन बी.ए.झाले,पण तेवढ्यावर न थांबता त्यांनी एल.एल.बी कायद्यांची पदवी घेतली.लहानपणापासूनच ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.वाळवा हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो.१९३० ची कायदेभंगाची चळवळ तसेच १९४२ चे भारत छोडो आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५२ ते १९६० या कालावधीत ते…
