- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,
- मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर वाहनाच्या प्रचंड रांगा,
- जांभूळ विहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
- भालीवली गावातील सिंचन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवा,
- एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा,
- आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत,
- पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी,
- नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका,
Author: दीपक मोहिते
नवीन पाटील,सफाळे सफाळ्यात बोगस आयएएस अधिकाऱ्याकडून कोट्यवधींचा जमीन घोटाळा, डेप्युटी कलेक्टर असल्याचा बनाव करीत खोटे दस्तावेज बनवून कोट्यावधींच्या जमिनींचा घोटाळा करणाऱ्या प्रतिक मोहन पाटील ( रा. मधुबन सोसायटी,सफाळे ) याला सफाळे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षा देवून त्यात उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर झाल्याचा बनाव रचला. प्रतिक पाटील हा सफाळे परिसरात राहत होता,सफाळे पोलिस स्टेशन हद्दीतील कर्दळपाडा भागात पालघर येथील जयंत विष्णू दांडेकर यांची १५ एकर आणि आशालता दत्तात्रय ताम्हणकर या मयत महिलेची साडेपाच गुंठे मालकीची जमीन आहे. या दोन्ही जमिनींसाठी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांच्या साहाय्याने प्रतीक पाटील यांनी खोटे दस्तावेज बनवले व ११…
दीपक मोहिते, भारताला नडला,त्याला लष्कराने फोडला, अखेर पाकने भारतासमोर गुडघे टेकले… भारतीय सैन्याने अवघ्या सहा दिवसात पाकिस्तान्याना गुडघे टेकायला लावले.पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांचे मोठे बंधू व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रातोरात दोन्ही देशा दरम्यान शस्त्रसंधी घडवून आणली.त्यामुळे पाकिस्तानची अब्रू राखली गेली.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या शस्त्र संधीसाठी साकडे घालण्यात आले.त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रोबियो यांनी वेगाने हालचाली केल्या व या शस्त्रसंधीला मूर्तस्वरूप दिले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २२ पर्यटकांची निर्घृण हत्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले व भारतीय वायू दलाने अवघ्या २५ मिनिटात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नाल्यातील कचरा नाल्याच्या बाजूला टाकण्यात येतो,या कृष्णकृत्यात फार मोठे अर्थकारण, दरवर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग १०० % नालेसफाई केल्याचा दावा करत असते.पण त्यांच्या या दाव्यात बिलकुल तथ्य नसते.या महानगरपालिकेची नालेसफाई ही चक्क करदात्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असते.ठेकेदार,मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी या तिघांचे खिसे भरण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असतो,असा आरोप नागरिक करत असतात. वसई विरार महानगरपालिका हद्दीत पावसाळी पाणी वाहून नेणारे असंख्य नाले आहेत.परंतु गेल्या काही वर्षात या नाल्याच्या परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे हे सर्व नाले अरुंद झाले आहेत.त्यामुळे दरवर्षी अतिवृष्टी झाली की हे सर्व नाले तुडुंब भरतात व पावसाळी पाणी शहरात साचून…
सचिन परब,वसई अवकाळी पावसामुळे वसई विजयोत्सव दिन उत्सवाच्या तारखेत बदल, वसई विरार शहर महानगरपालिकेने २८७ वा वसई विजयोत्सव दिन सोहळा १० ते १२ मे २०२५ असा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता.मात्र,मंगळ.६ ते ८ मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक परिसरामध्ये पाणी साचले, सोबत या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असलेला परिसरात चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच हवामान खात्याच्या सुचनेनुसार,पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने वसई विजयोत्सव कार्यक्रम तीन दिवसांच्या ऐवजी फक्त एक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोम.१२ मे २०२५ रोजी फक्त एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला…
दीपक मोहिते, ” फ्रँटलाइन,” पाकिस्तानने वेळीच शहाणे व्हावे,अन्यथा तीन तुकडे होण्याची शक्यता, भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले असून युद्धाची व्याप्ती सतत वाढत आहे.हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याची शक्यता आहे.या युद्धाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसणार आहे.गेल्या काही वर्षात या देशाची आर्थिक घडी पार विस्कळीत झाली आहे.औद्योगिक उत्पादन,व्यापार,जीडीपी,कृषी व रोजगार या क्षेत्रात पाकिस्तान जगाच्या क्रमवारीत १०९ क्रमांकावर घसरला आहे.वाढती महागाई व बेरोजगारी,यामुळे जनता अधूनमधून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते. देशाचे चारही प्रांत सिंध,पंजाब,पख्तुनख्वा व बलुचिस्तान,अशांत बनले आहेत.बलुचिस्तान व पख्तुनख्वा,हे दोन्ही प्रांत फुटून निघण्याच्या तयारीत आहेत.अशा स्थितीत हे युद्ध त्यांच्या…
जव्हार प्रतिनिधी, वाड्यात मशाल गौरव पुरस्काराचे वितरण, ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘मशाल’ या वृत्तपत्राच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमीत्त मशाल गौरव पुरस्कारांचे वितरण शरद नगर येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील,माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, खा.डॉ.हेमंत सवरा,सद्गुरु अलोकनाथ महाराज,उबाठाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामधे आदर्श लोकप्रतिनीधी खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,आदर्श संस्थाचालक शिल्पा शिंदे, आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कमा कामडी,आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरु आलोकनाथ महाराज,आदर्श फोटोग्राफर दिपक गोळे,उत्कृष्ट पत्रकार दिपक चंदे,आदर्श युवा उद्योजक प्रितम भोपतराव, आदर्श सामाजिक…
दीपक मोहिते, अखेर शहाणपण सुचलं.. चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करा- सर्वोच्च न्यायालय, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाची मुदत संपून तीन ते चार वर्षे पूर्ण होत आली पण या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याविषयी अंतिम सुनावणी झाली असता घटनापीठाचे प्रमुख न्या.सूर्य कांत यांनी येत्या चार आठवड्यात या निवडणुका करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले. तसेच ही निवडणूक प्रक्रिया चार महिन्यात संपवावी अशी सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना…
दीपक मोहिते, नेत्रदिपक कामगिरी, दि ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेला २१८ कोटी रु.चा नफा, सहकार क्षेत्रात अग्रेसर बँक आणि शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून प्रसिद्ध असलेली ठाणे आणि पालघरवासियांची बँक दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात २१८ कोटी ९७ लाख रु.चा नफा चालू आर्थिक वर्षात मिळवला आहे.राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेने दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ठाणे नेहमीच अग्रेसर राहिली आहे.बँकेने वर्षअखेर १ हजार ५९३ कोटी २५ लाख रु.चा निधी उभारला आहे. सद्यस्थितीत बँकेकडे ९ हजार ६३१ कोटी ४७ लाख रु.च्या ठेवी आहेत.यात बँकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५५९ कोटी ७३ लाख रु.ची वाढ झाली आहे.बँकेने ४…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राज्याच्या राजकारणाची अधोगती सुरू, ” युद्ध व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,” असं म्हंटल जातं ते खरंच आहे.पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे,त्याचे ” राजकारणाची अधोगती,” असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये.दीड दशकापूर्वी दोन ठाकरे बंधू एकमेकांच्या उरावर बसले होते,तर दोन वर्षांपूर्वी काका-पुतण्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष निर्माण होऊन पक्षाची दोन शकले झाली. स्वार्थी राजकारणाचा हा परिपाक होता.पुतण्याने पक्ष, चिन्ह व आमदार पळवल्याचे सांगत काकाश्रीनी राज्यभरात आपला ऊर बडवला.आज तेच काका/पुतण्या व दोन ठाकरे बंधू ” आम्ही एकत्र आलो तर आश्चर्य वाटता कामा नये,” असा ढोल पिटण्यात धन्यता मानत आहेत.गेल्या ६६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची…
दीपक मोहिते, ” विनाशकाले विपरीत बुद्धी, ” भारताने पाकची अनेक शहरे केली बेचीराख… काल पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या वायुदलाने तो हाणून पाडला.यावेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानची चार ते पाच विमाने पाडली व त्यांच्या तीन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे.आपण केलेल्या लष्करी कारवाईंनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या एक तृतीयांश भुभागावर मुसंडी मारली आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या सियालकोट शहरात अफरातफरी माजली आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला पदावरून हटवण्यात यावे,अशा मागणीने जोर धरला आहे.दरम्यान तुर्कस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानात पोहोचले असुन या विमानात ड्रोन असल्याची माहिती मिळाली आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात प्रखर हल्ले चढवल्यामुळे सर्वत्र ब्लँकआउट घोषित…
