Author: दीपक मोहिते

सुशील भोईर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्वाची बैठक संपन्न, महाराष्ट्र विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्त्वाची बैठक काल वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात पार पडली. या बैठकीत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अत्यंत धोकादायक (C-1) प्रकारात समावेश असलेल्या २०० धोकादायक इमारतींच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत,इमारतीचा पुनर्विकास रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचे बेघर होण्याचे भिती आ.स्नेहा दुबे यांनी व्यक्त केली. महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करताना आ.प्रवीण दरेकर यांनी आ.स्नेहा दुबे पंडित यांची वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर केली. तसेच नवी मुंबई-पनवेलसाठी आ.प्रशांत ठाकूर यांची वर्णी लावली. त्यामुळे आता वसई-विरार सह नवी मुंबईमधील…

Read More

सचिन परब, विरार, उसगाव येथे श्रमजीवी साहित्य मेळा २०२५ चे आयोजन, आदिवासी आणि श्रमिक समुदायाच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थानासाठी समर्पित श्रमजीवी साहित्य मेळा थाटात पार पडला.ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गज्वी,अशोक नायगावकर आणि महेश केळुस्कर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन झाले.श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळ्याने साहित्यप्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.यावेळी उसगाव येथे असलेल्या फुलबाग वसतिगृहातील मुलींनी ” गीताई दिंडी, ” काढली.तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस गीताई अध्यायाचे सादरीकरण करण्यात आले. उद्घाटन समारंभात विवेक पंडित,डॉ.मनोज रानडे,महेश केळुस्कर,प्रेमानंद गजवी, खासदार डॉ.हेमंत सवरा आणि अशोक नायगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विवेक पंडित आपल्या भाषणात म्हणाले,श्रमजीवी साहित्य…

Read More

दीपक मोहिते, सरकारचे बनावट प्रगती पुस्तक, काही दिवसापूर्वी हिंगोलीचे आ.संजय गायकवाड यांनी राज्य पोलिसांवर बेछूट आरोप केले होते.राज्याचे पोलीस भ्रष्ट असुन ५० लाख रु.पकडले तर पोलीस ५० हजार रु.च दाखवतात,असे ते म्हणाले होते.त्यांचा हा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला होता. कारण गृहखाते त्यांच्याकडे आहे.त्यामुळे त्यांचा राग अनावर होणे, साहजिकच होते.त्यांनी त्वरित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गायकवाड विरोधात तक्रार केली व त्यांना योग्य ती समज द्या,असे सुनावले.त्यानंतर शिंदे यांनी आ.गायकवाड यांचे कान उपटले.या सर्व घडामोडीनंतर आ.गायकवाड यांनी सारवासारव करत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.वास्तविक आ. गायकवाड यांनी जे वास्तव समोर आणले होते.त्यामध्ये व १०० % तथ्य आहे.पण हल्लीच्या…

Read More

तलासरी प्रतिनिधी, तलासरी भागात बिबट्याचा दोघांवर हल्ला, तलासरी भागात बोर्डी वनविभागाच्या हद्दीत बिबट्याने हल्ल्यात दोन जण जखमी झाले.त्यांना तात्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील बलसाड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची खबर लागताच तलासरी पोलीस आणि बोर्डी वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटना स्थळी पोहोचले. आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेतात पाला गोळा करण्यास गेलेल्या गुलाब मधुकर वरठा,रा.करजगांव, मानपाडा येथे राहणाऱ्या महिलेवर बिबट्याने अचानक मागून हल्ला केला.यावेळी प्रसंगावधान राखून त्या महिलेने हल्ला परतवून लावला आणि आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्या पळून गेला.यात महिलेच्या पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापत झाली.याघटनेनंतर थोड्याच वेळात बिबट्याने धामणगाव आपटोलपाडा येथे आपल्या वाडीत काम करणाऱ्या राज्या काकड्या…

Read More

दिपक मोहिते, रयतेची निव्वळ फसवणूक, देवाभाऊ,” अजब तुझे सरकार,” राज्य सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्या संदर्भात प्रत्येक विभागाचा लेखाजोगा मांडला आहे.अनेक विभागाने पैकीच्या पैकी गुण मिळवत बाजी मारली आहे.आपण या लेखाजोगात पहिल्या पाच क्रमांकावर विराजमान झालेल्या पाच विभागावर बोलणार आहोत.हे पाच विभाग कोणते आहेत,याची सर्वप्रथम माहिती घेऊ या.. महिला व बालकल्याण,सार्वजनिक बांधकाम,कृषी,परिवहन व मत्स्य व बंदरे,असे ते पाच विभाग आहेत.या पाच विभागाची गेल्या १०० दिवसात कामगिरी कशी होती ? यावर एक प्रकाशझोत…. १ ) महिला व बालकल्याण – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवत तत्कालीन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली.( प्रत्येक महिलेला दरमहा १५००/- रु. ) त्यामुळे निवडणुकीत…

Read More

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना- आकाश छाजेड, काल केंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला त्याचे संपूर्ण श्रेय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आहे.गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी,यासाठी प्रयत्नशील होते.देशांमध्ये जातीची लोकसंख्या त्याच्या तुलनेत भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी लढाई लढली. देशातील वंचित घटक व सुशिक्षितांसाठी राहुल गांधींनी हा लढाई लढली.जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती.या राहुल गांधींच्या लढ्याला काल यश मिळाले म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जाते,असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे…

Read More

जव्हार प्रतिनिधी, आदिवासी क्रांतिकारक चौक येथे अभिवादन कार्यक्रम, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज युवा आदिवासी संघाच्या वतीने विक्रमगड येथील आदिवासी क्रांतिकारक चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राघोजी भांगरे यांच्या बलिदानाचे स्मरण करून युवा पिढीने त्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती सुरेश कोरडा, जामसर ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल थेतले,युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष राजू भोये,माजी अध्यक्ष हेमंत घेगड व मनोज कामडी,का यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

Read More

दीपक मोहिते, भाजपवाल्याना राष्ट्रहितापेक्षा पक्षीय हित मोठे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या मिडियाने दोन देशात आता युद्धाला तोंड फुटणार,मोदी प्रत्येक दहशतवाद्याला हुडकून ठोकणार,पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे,अशा बातम्या पेरल्या.पण त्याचवेळी पाकिस्तानची आर्मी आपल्या टेहळणी चौक्यावर बेछूट गोळीबार करत होती. आपणही सारे लवकरच युद्ध सुरु होईल,अशी अपेक्षा बाळगून होतो.या घटनेला अकरा दिवस उलटल्यानंतरही आपल्या तपास यंत्रणाना अद्याप त्या पाच नराधमांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही.हे आपल्या तपास यंत्रणा तसेच लष्कराचे अपयशच म्हणावे लागेल.पूर्वी दोन देशात युद्ध सुरू करणे,सहजशक्य होत असे.आता तशी स्थिती नाही.कारण काही किरकोळ अपवाद वगळता प्रत्येक देश आता अन्वस्त्रधारी देश बनला आहे.त्यामुळे युद्ध होणे,आजच्या घडीला कोणालाही परवडणारे नाही.पाकिस्तानला बेचिराख करण्याची…

Read More

दीपक मोहिते, मिडिया/सोशल मीडिया, ” शाप की वरदान ?, ” चार महिन्यापूर्वी निवडणुकीची धामधूम आता थांबली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील,हे सांगणे आता ब्रम्हदेवालाही शक्य नाही.चार महिन्यापूर्वी सोशल मिडियावर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील निवडणुकापर्यंत आग ओकणार नाहीत.एकमेकांच्या उखाळ्या- पाखाळ्या ऐकण्यात महिना कधी निघून गेला,ते कळलेही नाही. या निवडणुकीत सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले.निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया,हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते स्विकारलेही आहे.पूर्वी पक्षांची मुख्यालये,ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत,आता त्याची जागा सोशल मीडियाच्या वॉररुमने घेतली आहे.या वॉररूम्स आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत. ” होत्याचे नव्हते व नव्हत्याचे…

Read More

सुरेश वैद्य,पालघर, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उदघाटन, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी,याकरिता जिल्हास्तरावर ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,” स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा.डॉ.हेमंत सवरा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२…

Read More