- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार, वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघर मधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार,
- मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय,
- काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे,
- गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट,
- सारासार विचार करण्याची गरज आहे…
- समाजात इतकी असंवेदनशीलता येते तरी कुठून ?
- ‘ अमृत सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना,
- चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात रास्ता रोकॊ, हजारो महिला रस्त्यावर,
Author: दीपक मोहिते
वाडा प्रतिनिधी, वाड्यात निवडणूक आयोगा विरोधात मशाल मोर्चा, देशातील निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे,परंतु मागील निवडणुकीतील काही घटना पाहता या स्वायत्त संस्थेवरील जनतेचा व राजकीय पक्षांचा विश्वास कुठेतरी कमी होत असल्याचे दिसत आहे. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हें. २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक गैरप्रकार दिसून आले आहेत. असे मत काँग्रेस कमिटीचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी मांडले आहे.ते पत्रकारांशी बोलत होते. वाडा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत,ते पुढे म्हणाले की,मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत मोठा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यातही खाजगीकरणाचे वारे वेगाने वाहू लागले ; ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला, केंद्र सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यसरकारनेही शासकीय संस्था व सार्वजनिक उपक्रम,धनदांडग्याच्या घश्यात घालण्यास सुरुवात केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने नूकताच घेतला आहे.या निर्णयानंतर एसटी सेवाही आता पाईपलाईनमध्ये आहे.बीओटी या गोंडस नावाखाली हा खेळ आता सुरू झाला आहे.या तत्वावर यापूर्वीच रस्तेबांधणी सुरू झाली आहे.या उपक्रमाच्या कोट्यावधी रु.च्या जमिनी हडप करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या खाजगी खाजगी संस्था व विश्वस्त संस्थाना नाममात्र अनामत रकमेवर चालवण्यास देण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची ( आयटीआय…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” “अपरिपक्वता,” कोण कोणाचा बाप ? यावरून मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडा्जंगी, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची काल मुंबईत बैठक झाली.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ” कोण कोणाचा बाप,” यावर तमाशाचा फंड चांगलाच रंगला होता. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. ” सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे,” असे नितेश राणे आपल्या भाषणात म्हणाले होते.नितेश राणे यांचे हे वक्तव्य शिवसेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागले.त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांकडे याविषयी तक्रार केली,त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले. शिवसेनेच्या मंत्र्यांनीही “आमचा बाप बाळासाहेब ठाकरे,तुमचा कोण ?…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत बालविवाह नाही, पण अल्पवयीन मातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, कायद्याने बालविवाहावर बंदी असल्यामुळे हल्ली बाल विवाह होत नाहीत.तलासरी सारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयात प्रेमसंबंधामुळे माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमसंबंधाने विवाह न करता अल्पवयातच तरुण – तरुणी एकत्र राहत असल्यामुळे अल्पवयीन माताचे प्रमाण तलासरी भागात मोठया प्रमाणात वाढले आहे.अशी स्थिती असतानाही आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र केवळ ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे.यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३,वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११,आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २०,अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि…
दीपक मोहिते, एकनाथ शिंदे व अजित पवार गटाच्या आमदारांवर सध्या स्वाभिमान गुंडाळून ठेवण्याची पाळी आली आहे, महायुती सरकारमध्ये शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या दोघांना भाजपकडून मिळणारी वागणूक लक्षात घेता या दोन्ही गटाच्या आमदारांना आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत आहे.तशीच परिस्थिती निर्माण झाली तर अजित पवार हे पुन्हा शरद पवाराकडे वळू शकतात.पण एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या आमदारांना पुन्हा उद्धव गटात एंट्री मिळणे कदापि शक्य नाही.कारण ” गद्दारांना क्षमा नाही,” या बाळासाहेबाच्या धोरणानुसार उद्धव ठाकरे यांनी वागायचे ठरवल्यामुळे शिंदे गटाच्या आमदाराना उबाठाची दारे आता बंद झाली आहेत. गेल्या वर्षी मोदी सरकारने सत्तेत…
वसंत भोईर,वाडा घराचे अनधिकृत बांधकाम बंद केल्याच्या रागातून उपसरपंचास धमकी, तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील घराचे अनधिकृत बांधकाम नोटीस देऊन बंद केल्याच्या रागातून सोनाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन तिखंडे यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती. अमोल गोरे व कल्पेश कोर अशी धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,यातील आरोपीनी सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अजय कुमार चोखणी यांच्या घरांचे बांधकाम काम सुरू केले होते.सदरचे काम अनधिकृत असल्यामुळे ग्रामपंचायतीने ते नोटीस देऊन बंद केले होते.याचा राग मनात धरून आरोपींनी उपसरपंच सचिन यांना दूरध्वनीवरून ” तु,आमचे साईटवरचे काम का बंद केले ? तुमचा त्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” खरं तर,केंद्र सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी ” सिंदूर,” पाठवण्याची गरज आहे, भारत – पाक युद्धात कोण जिंकले आणि कोण हरले, याविषयी जगभरात सध्या वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत.आपल्या सैन्याने मुसंडी मारली असताना अवघ्या ७२ तासात दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्यामुळे,तसेच ही शस्त्रसंधी आम्ही घडवून आणली,असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे देशात संशयाचे वादळ घोंगावू लागले.अजूनही ते शमलेले नाही.अधून मधून हे वादळ पुन्हा पुन्हा घोंगावत असते.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक महिलांचे ” सिंदूर,” नाहीसे झाले.त्यामुळे केंद्र सरकारने दोन देशातील या युद्धाला ” ऑपरेशन सिंदूर,” असे गोंडस नांव दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय सुरुवातीच्या…
दीपक मोहिते, मुंब्रा रेल्वे दुर्घटना ; तमाम रेल्वे प्रवासी संघटनानी एकत्र आले पाहिजे, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेनंतर मुंबईच्या जीवघेणा रेल्वेप्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आपले मायबाप सरकार नेहमीप्रमाणे मृतांच्या वारसाना नुकसानभरपाई देऊन मोकळे झाले आहे.पण पुढे काय ? तर ” ये रे माझ्या मागल्या, ” हे असे गेल्या काही वर्षांपासून सतत सुरू आहे.लोक किड्यामुंग्यासारखे मरत असताना,सरकार मात्र मेट्रो, मोनोरेल व टनेल बांधण्यात व्यस्त आहे.अशा दुर्घटना घडल्या की अवघ्या पाच मिनिटात सरकार आर्थिक मदत देऊन मोकळी होत असते.पण सरकार गाड्या वाढवणे,प्रवाश्यांना आधुनिक सुविधा देणे,इ.कामाकडे कधीच लक्ष देत नाही.मुंबईचा रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत…
जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे गुणवंतांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न. जव्हार येथे युवा आदिवासी क-ठाकूर समाज सांस्कृतिक, सामाजिक,क्रीडा व संस्कृती संवर्धन मंडळ यांच्यातर्फे समाजातील यशस्वी, प्रेरणादायी व कार्यरत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात युवकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानू यशू माळी होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज मोरघा यांनी उपस्थित राहून युवकांना आधुनिक काळातील शिक्षणाचे महत्त्व, कौशल्यविकास आणि नेतृत्वगुण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी स्वकष्टावर विश्वास ठेवत संधी निर्माण करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांचे भाषण,त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत सैन्यात कसे यशस्वी स्थान मिळवले,याविषयी थक्क करणारा प्रवास मांडला. त्यांच्या अनुभवांनी युवकांमध्ये देशभक्ती,शिस्त आणि चिकाटीचा…
दिपक मोहिते, अन्न सुरक्षा कायद्याचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. अन्न सुरक्षा कायद्याला येत्या ५ जुलैला एक तप ( १२ वर्षे ) पूर्ण होत आहे.या कायद्याची अंमलबजावणी सध्या काटेकोरपणे सुरू आहे. देशातील गरिबीचे प्रमाण घटत नसताना,देशवासीय भुके राहता कामा नयेत,यासाठी केंद्र सरकार अन्नधान्य अनुदानावर प्रचंड पैसा खर्च करत आहे.गेल्या बारा वर्षाच्या या वाटचालीत ही योजना किती फायदेशीर ठरली, याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी योजना म्हणजे देशातील अन्नधान्य सुरक्षा योजना होय.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसारख्या योजनांनी लाखो नागरिकांसाठी अन्न उपलब्धता निश्चित करण्यात…
