- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायला सुगीचे दिवस पण,मत्स्यउत्पादनात होणारी घट रोखण्याची गरज, राज्यातील मत्स्यव्यवसायाला पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यासाठी कृषीचा समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायिकांना शेतकऱ्यांप्रमाणे वीजदरात सवलत,किसान क्रेडिट कार्डची सुविधा,कृषी दरानुसार कर्ज,विमा,सौरऊर्जेतील लाभ इ.सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बंदरे व मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी दोन्ही सभागृहांमध्ये मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊ,अशी घोषणा केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. दरम्यान देशाला परकीय चलन तसेच प्रथिनयुक्त अन्न पुरवण्यात मत्स्यव्यवसायाचे मोठे योगदान आहे.राज्य ” कृषी,” प्रमाणे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही चांगले उत्पादन घेण्यास सक्षम आहे. या निर्णयामुळे सुमारे…
जव्हार प्रतिनिधी, धानोशी-जव्हार येथे खरीपपूर्व शेतकरी शिबिर संपन्न, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत धनोशी येथे खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. पाच दिवसीय शिबिरात जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत आणि तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.शिबिराचा उद्देश आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक माहिती,मार्गदर्शन आणि शाश्वत शेतीसाठी प्रशिक्षण देणे हा होता.या शिबिराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना उत्पादनवाढ, सुधारित शेतीपद्धती, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.कृषी विभागाच्या एटीएमए अंतर्गत कार्यरत ब्लॉक…
वसंत भोईर,वाडा कुडूस मध्ये वार्षिक बाजाराला सुरुवात… सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कुडूस येथील वार्षिक बाजार भाव काल सायंकाळी निश्चित करण्यात आले असून आजपासून बाजाराला सुरवात होणार आहे.या बाजारात विकण्यासाठी आलेल्या मालाचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार हळद- २३० रू. किलो,धने-२५०,राई-१०० रु. किलो, मेथी-१००,जिरे-३००, खोबरे – २७५, ओवा-२३०,मोठा कांदा-१५ रु. लहान कांदा-१२ राजीने-२४०,सफेद लसूण-१००,लाल लसूण-१९०,चिंच-१६०,शेपू- २२० असे भाव निश्चित करण्यात आले आहेत. ठरलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने माल विकत घेऊ नये,असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाडा,भिंवडी, शहापूर,मुरबाड,जव्हार, डहाणू ,विक्रमगड,वसई,पालघर,ठाणे,नवीमुंबई,पनवेल आदी ठिकाणांहून शेतकरी पावसाळ्यात लागणा-या वस्तूंची बेगमी करून ठेवण्यासाठी या बाजारात येत असतात. शेतक-यांना लागणा-या…
सचिन परब,विरार ” खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती,” कार्यशाळा संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या सभागृहात काल “ खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती कार्यशाळा,”संपन्न झाली.या कार्यशाळेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजीत गोरे व उप मुख्य लेखापरीक्षक मनोज पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धतीसंबंधी निर्गमित झालेले नवीन शासन निर्णय व कायदे,शासकीय ध्येय-धोरणे, निविदा कार्यपद्धतीत करावयाचे व झालेले बदल यासंबंधी ही कार्यशाळा पार पडली.महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन व माहिती देऊन सध्या राबवण्यात येत असलेल्या निविदा कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करणे व निविदा कार्यपद्धती नियमानुसार सुरळीत करणे,हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.तसेच उपस्थित अधिकारी व…
दीपक मोहिते, करदात्यांच्या जीवाशी खेळ, धोकादायक इमारती ; यादी प्रसिद्ध करणे,केवळ एक सोपस्कार… ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने यंदाही धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे.दरवर्षी मान्सुनच्या तोंडावर अशाप्रकारची यादी प्रसिद्ध करून मनपा प्रशासन कोणाचे व कसले हित साधत असते,हे कळायला मार्ग नाही. मनपा प्रशासन दरवर्षी आपल्या हद्दीतील धोकादायक इमारतीच्या नावाची यादी जाहीर करत असते.तसेच अशा इमारतीमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसाही बजावते.पण रहिवाशी या नोटीसाना केराची टोपली दाखवतात. कारण या महानगरपालिका क्षेत्रात पर्यायी व्यवस्था ( संक्रमण शिबीर ) नसल्यामुळे रहिवाशी आपल्या इमारती रिकाम्या करत नाहीत.तसेच या रहिवाश्यानी इमारती रिकाम्या कराव्यात,यासाठी प्रशासन देखील आग्रही नसते,कारण…
वसंत भोईर,वाडा उन्हातान्हात किती काळ ठिगळं लावत बसायचे ? चर्मकार समुदायातील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोचींसाठी गटई स्टॉल योजना राबवण्यात येत असते. या योजनेत टिन स्टॉलच्या उभारणीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.परंतु माहितीच्या अभावी अनेक जण या योजनेपासून वंचित आहेत.अजूनही साधा कपडा टाकून किंवा हातगाडीवर उन्हातान्हात चप्पल शिवण्याचे काम करणारे चर्मकार समाजबांधव प्रत्येक चौकात हमखास पाहायला मिळतात. या योजनेची माहिती नसल्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.या चर्मकार बांधवांनी उन्हातानात किती दिवस ठिघळं लावायची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील( चर्मकार,मोची) आदी व्यक्तींना त्याचे जीवनमान उंचावणे,समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळावे व त्यांचा शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक…
वसंत भोईर,वाडा सरकारच्या फसव्या घोषणेमुळे खरीप हंगामाचे शेतकरी अडचणीत, सध्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.काही शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरीप हंगामातील पीक कर्जाची उचलही केली आहे. तर काहींची कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.परंतु सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल,अशी भाबडी आशा असलेल्या शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे.त्याचा परिणाम यंदा पीक कर्जाच्या नूतनीकरणावर होण्याची शक्यता आहे. ठाणे पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते.काहींना तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज वेळेत मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात कोंडी होत आहे.शेतात पेरणी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आयुक्ताच्या बॉडीगार्डची दहशत ; उर्मट बॉडीगार्डवर कारवाई करण्याची मागणी, वसई विरार शहर महानगरपालिकेत सध्या कायद्याचे राज्य राहिले नसून पोलीसराज निर्माण झाले आहे.काल एक आंदोलक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना आयुक्तांच्या बॉडीगार्डने त्याला धक्काबुक्की करत आंदोलन बंद करायला लावले.त्यानंतर त्या आंदोलकाने आक्रमक पवित्रा घेत,त्या पोलिसाला खडे बोल सुनावले.त्या तरुणांच्या आक्रमक पवित्र्याने त्या बॉडीगार्डची बोबडी वळली व तो कॅमेऱ्यापासून सतत पळ काढताना दिसला. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर एका तरुणाने आयुक्तांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बॅनर्स लावले व तो प्रवेशद्वारानजीक धरणे आंदोलनास बसला.त्याच सुमारास आयुक्तांचा बॉडीगार्ड आर.डी.मेश्राम हा घटनास्थळी आला आणि त्याने सदर तरुणास धक्काबुक्की करत आंदोलन बंद करायला लावले.तसेच…
दीपक मोहिते, आम्ही काय पाप केले ? जिल्हावासियांच्या मनात एक ना अनेक प्रश्नांचे वादळ घोंगावत आहे.या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकार व नवनिर्वाचित लोकप्रतिधीनीकडून अपेक्षित आहेत.पण सरकार व लोकप्रतिनीधीची या सर्व प्रकरणी असलेल्या उदासीनतेमुळे ती मिळतील,असे वाटत नाही. १ ) गेल्या वर्षभरात सरकारने वसई तालुक्याच्या विकासासाठी कोणत्या योजना मंजूर केल्या ? २ ) वसई / विरार उपप्रदेशाची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना विविध कारणामुळे गेली अनेक वर्षे रखडली आहे,तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढणे,अपेक्षित होते.ते का झाले नाही ? आजही ही योजना मार्गी लागू शकलेली नाही. ३ ) वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या व नागरी सुविधांची गरज लक्षात घेऊन एखादे आर्थिक पॅकेज द्यावे,…
नदीम शेख,पालघर शिवसेनेच्या ज्योती मेहेर यांची अध्यक्षपदी निवड, गेली पंचवीस वर्षे राजकीय,सामाजिक, सहकारी,शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या सेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर यांची महाराष्ट्र राज्य सह.सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आल्या.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. यापूर्वी त्या सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीवर निवडून आल्या होत्या.त्यांची सहकार क्षेत्रातील सुरुवात सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून झाली.त्यानंतर त्या ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ,ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी अध्यक्ष व विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सचिव होत्या.सध्या त्या विद्यमान सदस्या आहेत. मच्छिमार कृती समितीच्या पालघर ठाणे जिल्हा महिला संघटक व महाराष्ट्र राज्य मच्छीमार…
