Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” धुपप्रतिबंधक बंधारा नसल्यामुळे भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरील वनसंपदा धोक्यात, ५ जून रोजी राज्यात सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.जनजागृती,चर्चासत्रे, भित्तीपत्रके तसेच अनेक उपक्रम या दिनी राबवण्यात आले.त्यानंतर मात्र सर्वत्र सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यात दररोज पर्यावरण विषयक असलेल्या कायद्याची पावलोपावली पायमल्ली होत असते.वृक्षतोड,वाळूचोरी,जंगल परिसरात होणारी मातीचोरी व अनधिकृत दगडखाणी इ.गैरप्रकारामुळे पालघर जिल्हा अत्यंत संवेदनशील असा बनला आहे.गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस,वादळी वारे व प्रचंड उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्याची प्रचंड धूप होत आहे.गेल्या आठवडाभरात भुईगाव या निसर्गरम्य समुद्रकिनारी आदळलेल्या लाटांमुळे झाडांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली.या समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा,अशी मागणी गेल्या तीन…

Read More

वसंत भोईर, वाडा शेतीचे शिवारे भरली तुडूंब ; भातपेरणीची कामे पडली लांबणीवर, तालुक्यात गेल्या १३ जून पासून मान्सून सक्रिय झाला असून गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.शेतीची कामे योग्य वेळेत होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाडा तालुक्यात पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून शेतं,ओहोळ,नदी, नाले,दुथडी भरून वाहत आहेत तसेच शेतीची शिवारे देखील तुडूंब भरली आहेत. पेरणी कशी आणि कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.सततच्या कोसळणाऱ्या पावसाने भातपेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत.तर काही शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केल्यामुळे आता ती कुजून वाया…

Read More

सचिन परब,वसई वसई – नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट, नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत एका औद्योगिक गाळ्यात स्फोट झाला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमध्ये एकजण जखमी झाला आहे.येथे काम करणाऱ्या पाच जणांना वाचवण्यात आले आहे. वस‌ई पुर्वेस औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत शेकडो लहानमोठे कारखाने आहेत.काल मनीष इंडस्ट्री नं.१ मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर ११४ मध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास अचानक एक भीषण स्फ़ोट झाला.प्रथमदर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की गाळाचे ग्रील,सज्जे उडून शेजारच्या दुस-या इमारतीवर जाऊन धडकले.या दुर्घटनेत ११३ नंबर तसेच…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यातील तीन ब्रिटिशकालीन पुल धोकादायक अवस्थेत, भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर तानसा नदीवरील डाकीवली फाटा,वैतरणा नदीवरील गांधरे,पिंजाळ नदीवरील पाली असे ब्रिटिशकालीन तीन पूल आहेत.यापैकी पाली येथील पुलाची थोडीफार डागडूजी करण्यात आली आहे.परंतु डाकिवली फाटा आणि गांधरे येथील पुलांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे या दोन्ही पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत.जड वाहनांचे सतत हादरे बसत असल्यामुळे पुलांची परिस्थिती धोकादायक झाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वैतरणा आणि तानसा या दोन नद्यांवर असलेले हे दोन्ही पूल ब्रिटिशकालीन असून त्यांची दुरुस्ती झाली न झाल्यामुळे या पुलांची दुरावस्था झाली आहे. या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते.त्यामुळे प्रशासनाकडून या दोन्ही पुलांची पाहणी…

Read More

सुरेश काटे,तलासरी रसायनाची वाहतूक करणारा ट्रेलर टँकर उलटला,तीन तास वाहतूक विस्कळीत, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी गावाच्या हद्दीत, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर धोकादायक वळणावर ट्रेलर टँकर उलटून अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलर टँकर मधून हायड्रोक्लोरिक ऍसिडची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली.त्यामुळे परिसरातील नागरिक आणि चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्याने गळती झालेले रसायन परिसरातील शेतीत गेल्यामुळे झाडे जळली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातातील ट्रेलर टँकरमधून हायड्रोक्लोरिक ॲसिडची गळती सुरु झाली. ट्रेलर टँकर मधून निघणार्‍या धुरामुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

वसंत भोईर,वाडा सततच्या पावसाने नेहरोली येथे रस्ता खचला, वाडा -भिवंडी महामार्गावरील नेहरोलीस्थित पेट्रोल पंपाजवळ रस्ता खचल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या एकेरी महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा द्यावा,अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या मार्गावर प्रचंड खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. हा मार्ग नेहरोली येथे खचला असुन, रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता प्रशासनाची पोलखोल झाली आहे.पावसाची जर संततधार अशीच सुरू राहिली तर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होईल,अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवाय मुंबई- अहमदाबाद…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” सुज्ञ नागरिक म्हणून गांभीर्याने विचार करा, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसरी सार्वत्रिक निवडणुक तोंडावर आली आहे.या विभागाचे सुज्ञ नागरिक पण डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या मतदारांनी निदान या निवडणुकीत तरी साखरझोपेतून जागे झाले पाहिजे,अन्यथा तुमच्या आमच्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात सापडणार आहे.आपल्या भागातील अनेक नामचिन बिल्डर्स व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या निसर्गरम्य व हरित वसईचे अक्षरशः लचके तोडले.या विनाशाला हे दोघे जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच मतदार म्हणून आपणही जबाबदार आहोत. या लेखात आठ ते दहा एक्सक्लूसिव्ह फोटो तसेच सोबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.या प्रश्नांची तुमच्याकडून उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा नाही.पण हे फोटो व छायाचित्रे तुम्ही नजरेखालून घालावीत,अशी मात्र…

Read More

दीपक मोहिते, ” वास्तव,” अस्वस्थ बळीराजा हा खरीप हंगामासाठी सज्ज, राज्यात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असून खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे कायम भितीच्या सावटाखाली वावरणाऱ्या शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली आहे.राज्याच्या काही भागात मशागत व पेरणीची कामे वेगाने करण्यात येत आहे.कोकण,प.महाराष्ट्र,उ.महाराष्ट्र,विदर्भ व मराठवाडा या पाचही विभागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमजूर मिळवणे,बी-बियाणे व खते-खरेदी करणे,अशी शेतीची प्राथमिक कामे हातावेगळी करण्यात आली.मात्र कोकण व काही अंशी विदर्भ हा भाग वगळता अन्य विभागात पावसाचे प्रमाण अद्याप अत्यल्प राहीले.त्यामुळे या विभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण उतरणीवर लागले आहे.अवकाळी व परतीच्या पावसाचा…

Read More

दीपक मोहिते, शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन ; अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होतोय साजरा… शिवसेनेला ( उबाठा ) आज ५९ वर्षे पूर्ण होत आहेत.या प्रदीर्घ वाटचालीत या पक्षाने खूप काही सोसले.अनेक वादळे अंगावर घेतली.त्यातून तावून सुलाखून निघालेल्या या पक्षाने राज्याच्या राजकारणात स्वतःचा असा दबदबा निर्माण केला होता.पक्षाचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायाखाली इवलाश्या रोपट्याचा अल्पावधीत वटवृक्ष झाला.या वटवृक्षाच्या सावलीत हळूहळू भाजपचे झाडही वाढत गेले.कालांतराने भाजपच्या या झाडांच्या पारंब्यांनी सेनेचा गळा आवळण्यास सुरुवात केली.अवघ्या तीन वर्षात या वटवृक्षाचे सुकलेल्या झाडात रूपांतर झाले.सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने २०१९ साली दिलेला शब्द न पाळल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युती मोडीत काढली व राज्यात महाविकास आघाडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात…

Read More

जव्हार प्रतिनिधी, थकीत अनुदान द्या – आ. विलास तरे, “बोईसर – तारापूर एमआयडीसीमधील वस्त्रोद्योगांचा झोन बदलून संबंधित उद्योगांना थकीत असलेले भांडवली व विजेचे अनुदान तात्काळ द्यावे,” अशी ठाम मागणी आ.विलास तरे यांनी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी आ.तरे यांनी संबंधित विभागाची विद्यमान स्थिती स्पष्ट करताना सांगितले की, ” बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या अनेक वस्त्रोद्योगांना शासनाच्या अनुदान योजनेचा योग्य लाभ मिळत नाही. कारण,या भागाचा वस्त्रोद्योग झोन ” मुंबई क्षेत्र,” म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे, ज्यामुळे मिळणारे अनुदान अत्यल्प असून त्याचे वेळेवर वितरणही होत नाही.” या झोनिंगमुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत असून, अनेक उद्योजकांमध्ये…

Read More