- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
शुभम सावंत, विरार पाकिस्तानचा झेंडा फाडुन व जोडे मारून विरार शिवसेनेने केला निषेध, जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरार शहरातील तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन उभारून पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राऊत, शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अजहर खान, शहर संघटक शिला लष्करे, शहर समन्वयक प्रदिप साने, कार्यालयप्रमुख सुनील चव्हाण,उपसचिव प्रसाद मिर्लेकर, उपशहरप्रमुख शशी कदम,जितेंद्र खाडे,उपशहर संघटक रोशनी जाधव, उपशहर अधिकारी रोहित कदम,विभागप्रमुख गणेश धावडे,सुशांत घाग,यश चोरघे, महेश लांजवळ,अजय पिंपळे, आदि शिवसेना,युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदीम शेख,पालघर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये मुस्लिम समाजाकडून जोरदार निषेध, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पालघर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मशिदेच्या बाहेर दु.२.०० वाजता शुक्रवारची नमाज पठण केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सम्पूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पालघरमध्येही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी हातावर काळी फीत बांधून पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.या दरम्यान ” पाकिस्तान मुर्दाबाद,” व पाकिस्तानवर कारवाई करा व गुन्हेगारांना शिक्षा…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यातील चौदा गावपाड्याना टॅकरने पाणीपुरवठा, तालुक्यातील चौदा गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे लाखो करोडो रू.खर्च करून बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.या योजनांचा पुरता फज्जा उडाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ,टोकरेपाडा, जांभूळपाडा,घोडसाखरे, दिवेपाडा,फणसपाडा, गवळीपाडा,तरसेपाडा तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा,फणसपाडा पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास,मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यामुळे या गावांना टॅकरने पाणी पुरवठा सुरू केला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून या योजनांचा…
वसंत भोईर,वाडा कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील गटारे कच-याने तुडुंब भरलेली, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील गटारे प्लास्टिक व विविध कच-याने भरल्या असून त्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात यावी,अन्यथा पावसाळ्यात कुडूसमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कुडूस ग्रामपंचायतीने योग्य ती दखल घेऊन नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा. कुडूस ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.तसेच ती आर्थिकदृष्ट्या सक्षमही आहे,परंतु या ग्रामपंचायतीकडून सफाईची कामे प्रभावीपणे करण्यात येत नाहीत.येथे मोठी बाजारपेठ असून शुक्रवारी येथे आठवडा बाजार भरतो.या बाजारात अनेक छोटे मोठे व्यापारी येतात असतात.हे व्यापारी माल विक्री करून झाल्यावर उरलेला कचरा असाच अस्ताव्यस्त टाकत असतात. तसेच येथील व्यापारीही आपल्या दुकानातील कचरा गटार परिसरात टाकत असतात.त्यामुळे हा…
दीपक मोहिते, सीमेवर पाकचा गोळीबार ; भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या सैन्याने सीमेवर असलेल्या आपल्या चौक्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.भारताने पाकिस्तानवर कठोर निर्णय लादल्यानंतर पाकिस्तानने देखील ताठर भूमिका स्विकारली आहे.त्यांनीही आपल्यावर निर्बंध लादले असुन सीमावर्ती भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच आहेत.जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार झाला,परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही,असे सूत्रांनी सांगितले.…
दीपक मोहिते, ” मागच्या दाराने आणीबाणीची चाहूल,” येणार काळ,माध्यमाच्या अस्तित्वाच्या लढाईचा….. गेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४, मांडण्यात आले होते.पण विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. सध्या हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे.या विधेयकातील तरतुदी बद्दल बोलताना सरकारने विधिमंडळात स्पष्ट केले कि व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित वेकायदेशीर कृत्याचा प्रभावीपणे करण्यासाठी आणि तत्सबंधित किंवा अनुषंगिक बाबीसाठी तरतूद करण्यासाठी हे विधेयक आणण्यात येत असल्याचे सांगितले.या विधेयकमध्ये बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संघटनाविरोधात कारवाई करण्याची तरतूद देखील आहे.हे विधेयक अत्यंत धोकादायक असे असुन सरकार कोणत्याही गोष्टीसाठी गुन्हा दाखल करू शकते. यामध्ये लोकशाही…
दिपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” राष्ट्रीय संकटप्रसंगी भारत सरकार व विरोधी पक्षांची एकजूट, पाकिस्तान,गेल्या सात दशकापासून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करत आला आहे.दहशतवाद्याना पैसा व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देऊन तो दहशतवादाला सतत खतपाणी घालत आला. काश्मीरच्या प्रश्नावरून दोन्ही देशात आजवर चार युद्धे झाली.या सर्व युद्धात आपल्या देशाने पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले.पण पाकिस्तानची खुमखूमी काही कमी झाली नाही.अधूनमधून कुरापती काढण्याचे त्याचे काम सुरूच आहे.उरी व पुलवामा घटनानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना चांगलाच दणका दिला होता. पण त्यातून शहाणे न होता, त्यांनी दहशतवाद्याना रसद पुरवणे सुरूच ठेवले आहे. तीन दिवसापूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर भारताने…
नदीम शेख,पालघर २६ एप्रिल रोजी पालघर येथे माध्यमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ ) यांचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ एप्रिल रोजी पालघर शहरातील स.तू.कदम विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के. थोरात तर स्वागताध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष नरसू पाटील आहेत.या अधिवेशनाचे आयोजक म्हणून पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जबाबदारी पार पाडणार आहे. शिक्षकांच्या अडीअडचणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांची भूमिका या अधिवेशनातून मांडण्यात येणार आहे.यावेळी साधारण चार ते पाच हजार शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत.अशी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री शिंदे यांची पहलगाम भेट ; महायुती सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर, जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यावरून महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती निवारण व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन यांना पाठवल्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये दाखल झाल्यामुळे खा.संजय राऊत यांनी सरकारला चांगलेच घेरले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.त्यामुळे सरकारवर खुलासा करण्याची पाळी आली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद हुकल्यामुळे नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधून मधून आपली नाराजी वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्याना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसतात.शिंदे…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे राष्ट्रीय पंचायतराज दिन उत्साहात साजरा, लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा सन्मान आणि ग्रामविकासाची नवी दिशा देणारा २४ एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन पंचायत समिती, जव्हार येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात ग्रामपातळीवरील लोकसहभाग,योजनांची अंमलबजावणी आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देण्यात आला. सदर कार्यक्रमास पंचायत समिती जव्हार प्रशासक तथा गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते,सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,कृषी अधिकारी प्रशांत पाटील, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत मनोहर उमतोल व सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी,महिला अधिकारी, कर्मचारी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय पंचायतीराज दिनाच्या प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) टप्पा-२…
