- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
नवीन पाटील,सफाळे महिलांच्या टी २० स्पर्धेत भारत क्रिकेट क्लब विजयी, मुंबई क्रिकेट असो.व डॅशिंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॅशिंग सुपर वुमन कप टी २० स्पर्धेमध्ये मुंबई येथील भारत क्रिकेट क्लबने पीडीटीएस संघाचा दारुण पराभव करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंतिम सामना खेळला गेला.या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी झाले होते.ही स्पर्धा चार दिवस साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील,माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर,सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे,प्राचार्य किरण सावे,भूषण पाटील,विकास पाटील आणि मान्यवर पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून शर्वी सावे…
नाशिक प्रतिनिधी, नाशिकमध्ये मध्यरात्री थरार ; जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक, ३१ पोलीस जखमी, नाशिकच्या काठे गल्ली परिसरात काल रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली आहे.या दगडफेकीत तब्बल ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यामध्ये सहा.पोलीस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती.संबंधित धार्मिक स्थळ काढून घेण्याच्या सूचना नोटीसमधून देण्यात आल्या होत्या.दोन दिवसांत संबंधित धार्मिकस्थळ पाडण्यात येईल,असं सांगण्यात येत होतं. याबाबत अफवा पसरल्यानंतर काल रात्री उशिरा नाशिकमध्ये याचे जोरदार पडसाद उमटले. सुमारे ४००…
संजय लांडगे,वाडा शिक्षक संघटनेचा मुंबई बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा, मुंबई,ठाणे,पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नवी मुंबई वाशी येथील मुंबई बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. मुंबई विभागातील विभागीय मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी,या मुख्य मागणीसाठी हा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आपली संघटनशक्ती दाखवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळावा,अशी मुख्य मागणी आहे. प्रा.शिवाजी जगताप समन्वयक,ठाणे,पालघर जिल्हा,प्रा.सुनील पूर्णपात्रे, प्राध्यापक खोपकर,प्राध्यापक चितळे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक सदस्य या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
दीपक मोहिते, ” लाडकी बहीण योजना,” आता गटांगळ्या खाऊ लागली आहे…. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ” लाडकी बहीण योजना, “आता गटांगळ्या खाऊ लागली आहे.महिलाच्या मतांवर डोळा ठेवून महायुतीने ही योजना सुरु केली.त्याचा फायदा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. पण आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे सरकार निरनिराळॆ निकष लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करत आहेत. आतापर्यंत ९ लाख लाभार्थ्यांना सरकारने बाहेरचा रास्ता दाखवला आहे. सरकारने आता लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रु. मिळणार आहेत.ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांची कामगिरी निराशाजानक, महायुती सरकारच्या १०० दिवसातील कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाला पाठवला आहे.सरकारमधील अनेक कॅबिनेटमंत्र्यांची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे या आढाव्यात म्हंटलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे,दादा भुसे,उदय सामंत,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,नितेश राणे,गणेश नाईक,अतुल सावे,मंगलप्रभात लोढा,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार,अदिती तटकरे,माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.या सर्वांना देण्यात आलेले टार्गेट त्यांना केवळ ३० ते ४० % पूर्ण करता आले.त्यांच्या या निराशाजनक कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून त्यांनी या मंत्र्यांच्या परफार्मन्सबाबत केंद्रीय नेत्याकडे आपले म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे.त्यामुळे पुढे होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात यापैकी…
दीपक मोहिते, प्रशासनाचा हलगर्जीपणा ; निधी निधी उपलब्ध होऊनही धुपप्रतिबंधक बंधारा कागदावरच… वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधून समुद्रकिनारा गिळंकृत करण्यापासून वाचवावे,अशी मागणी या समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिक रहिवाश्यानी राज्य शासनाकडे केली आहे. सागरी जीवावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव,रानगाव समुद्र किनाऱ्याला पसंती देत असतात.पर्यटनसोबत वसईतील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात,चवळी, गवार,वाल,दुधी,विविध फुलं आदी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पर्यटन व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेले निसर्गरम्य समुद्रकिनारे जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र व राज्य शासनाने निसर्ग व तोते,या वादळानंतर कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी तब्बल ४ हजार ७०० कोटी रु.मंजूर केले.त्याअंतर्गत धूपप्रतिबंधक बंधारे,पूर संरक्षक भिंत,दरड प्रतिबंधात्मक कामे, बहुउद्देशीय निवारा केंद्र,खार प्रतिबंधक बंधारे,भूमिगत विद्युत वाहिनी…
दीपक मोहिते, गुजरातच्या समुद्रात अठराशे कोटीचे ड्रग्ज पकडले, गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटिसच्या संयुक्त कारवाईत तब्बल १ हजार ८०० कोटी रु.चा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडण्यात आली आहे.सुमारे ३०० कि.एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे. नार्कोटिक्स विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने भारतात येत होती,अशी प्राथमिक माहिती आहे.कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत ही बोट थांबवली आणि तिची कसून तपासणी केली असता बोटीत मेथॅम्पेटामिन ( एमडी ड्रग्ज ) हे ड्रग्ज असल्याचं समोर आलं आहे.ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तीन इंजिन सरकारमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला ऊत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं.मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही.अजित पवार तर राज्यापाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले.तर एकनाथ शिंदे देखील कार्यक्रमानंतर तडकाफडकी ठाण्याला निघून गेले.आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झाले आहेत. ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कोणी बदल केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्रातील रायगड दौऱ्यावर आले होते.याआधी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली.एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती.यावेळी एकनाथ शिंदे…
दीपक मोहिते, ” सत्तेचा मार्ग स्वार्थातून जातो,”आणखी एक घराणे स्वार्थापोटी दुभंगले, सत्ता,हे सुख व ऐश्वर्य भोगण्याचे साधन आहे,त्यामुळे राज्यातील अनेक नामवंत घराणी गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत.त्यामध्ये ठाकरे,मुंडे,पवार,गांधी, राणे,विजय सिंह मोहिते पाटील,वसंत दादा पाटील व इतर अनेक घराणीचा त्यामध्ये समावेश आहे.पण या सर्व घराणींना आता फुटीचे ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे.सत्तेचा हव्यास व स्वार्थापोटी ही सर्व घराणी आता दुभंगत चालली आहेत.ही घराणी फुटल्यानंतर त्यांना फायदा होत नाही,पण वर्षानुवर्षे हाती असलेली सत्ता गमावण्याची नामुष्की मात्र त्यांच्यावर आली.राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अशी एक ना अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.पण त्यातून कोणी शहाणा व्हायला तयार नाही.या घराण्यातील प्रत्येकाला ” मला का नाही,” एकाच प्रश्नाने…
