- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात,
- आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता,
- यशस्वी जीवनाचे रहस्य,
- ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार, वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघर मधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार,
- मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय,
- काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे,
- गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट,
- सारासार विचार करण्याची गरज आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, राजकीय वाव व्यवसायिक स्वार्थापोटी अनेक कुटुंबे दुभंगली, हल्लीच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेचा हव्यास व स्वार्थ मोठा ठरला आहे.राजकारणात शिरलेल्या घराणेशाही प्रवृत्तीमुळे आज अनेक कुटुंबे दुभंगली गेली आहेत.भाजप हा काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर आजवर टीकेची झोड उठवत होता,पण आज त्या पक्षालाही घराणेशाहीचा शाप लागला आहे.मात्र याच घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्रात वावरणारी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली.त्यामध्ये गांधी,ठाकरे,मुंडे ही तर व्यवसायिक क्षेत्रातील अंबानी,हिरानंदानी,केसरी पाटील टूर्स,सिंघानिया व हावरे कुटुंबाचा त्यामध्ये समावेश आहे.सत्ता व अधिकार यांचे समान वाटप होत असेस्तोवर ही कुटुंबे एकत्रित होती.पण कालांतराने गृहकलहाची वात पेटली व कुटुंबे दुभंगली.सत्ता व स्वार्थ,अशा दोन कारणामुळे हे सारं घडतंय.आपल्या कुटुंब व्यवस्थेत आता मी व माझे कुटुंब…
दीपक मोहिते, ” ये रे माझ्या मागल्या,” …आणि आमच्या मराठी अस्मितेचा कडेलोट झाला, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पुन्हा कोलांटी उडी मारल्यामुळे मनसे सैनिक सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसे सैनिकांना आदेश दिला होता की ” बँकेचे व्यवहार मराठी भाषेत होतो की नाही तपासा,आणि नसेल होत तर त्यांच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्या.” त्यांच्या या आदेशानुसार मनसे सैनिकांनी बँकेत ” खळखट्याक,” सुरू केले. सलग दोन दिवस हा खेळ सुरू होता.दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी डोळे वटारत ” कोण कायदा हातात घेत असेल तर कठोर कारवाई करू,” असा इशारा दिल्यानंतर राज ठाकरे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ ” ट्रम्प,ट्रम्प,” असे कोकलणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना ट्रम्प यांनी चांगलाच धोबीपछाड दिला.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवली आहे.त्यांच्या एका निर्णयाने अमेरिकेशी व्यापार करणारे सारे देश भितीच्या सावटाखाली आले आहेत.ट्रम्प यांनी २६ % आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक देशाची आर्थिक घडी विस्कळीत होण्याची भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या बाजारात भारतीय वस्तू प्रचंड महाग होतील व त्याचा थेट फायदा त्यांच्या देशातील उत्पादकांना होणार आहे.यातून ट्रम्प सरकारला प्रचंड असा महसूल मिळणार आहे.या सर्व घडामोडीमुळे भारतीय व्यापारी व शेतकरी उध्वस्त होणार आहेत.मोदी सरकारच्या कृषीविषयक दिशाहीन धोरणामुळे कृषी क्षेत्र गेल्या दहा वर्षांपासून…
वसंत भोईर,वाडा नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या-आ.दरोडा, वाडा तालुक्यासह पालघर व ठाणे जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास चक्रीवादळाने मोठे थैमान घातले होते.तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांच्या घराचे पत्रे शेतकरी कडधान्य व आंबा बागायतदरांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी,अशी मागणी आ.दौलत दरोडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे. या नुकसानीबाबत आपल्या शासनाने गंभीर दखल घेऊन वाडा व शहापूर या दोन्ही तालुक्यातील नागरिक,शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून मोठी मदत करण्यात यावी अशी आ.दरोडा यांनी विनंती केली आहे.
संजय लांडगे,वाडा गारगाव आश्रम शाळेत व्यवसाय मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न, वाडा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शाळेत काल १० वी व १२ वी नंतर करियरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.एम. बनसोडे होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली,त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ईश्वरस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.वाघ-उच्च माध्य.शिक्षक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला.तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांमध्ये अक्षय इंगळे, अध्यक्ष शांताई नर्सिंग कॉलेज पालघर,राहुल बनसोड सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालय ओंदे,प्रा.डॉ. चांदोजी गायकवाड-वरिष्ठ महाविद्यालय ओंदे,प्रा.गौरव मोहिते,विभाग प्रमुख,हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय हारोसाळे,सोनाली वेखंडे-संगणक प्रशिक्षिका वाडा,विजय डाखोरे-पोलीस उपनिरीक्षक…
सुरेश काटे,तलासरी, ” मोबाईलकडून मैदानाकडे, ” अभियानाला युवकांची साथ, यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे अणवीर गावातील युवकांसाठी मोबाईलकडून मैदानाकडे अभियान राबवण्यात येत असून या अभियानाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.अणवीर प्रीमियर लीग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी तलासरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे,तलासरी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी रत्नाकर अंबात,सावरोली अणवीर गावचे उपसरपंच जयवंत खुलात आणि यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड उपस्थित होते. यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी एप्रिल महिन्यात अणवीर गावातील युवकांसाठी व्हॉलिबॉल आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते.या स्पर्धांचा उद्देश हा फक्त खेळापुरता मर्यादित नाही,तर खेळाच्या माध्यमातून गावातील…
दीपक मोहिते, अश्विनी बिद्रे हत्या : अभय कुरुंदकर सह अन्य दोन जण दोषी तर अन्य एकाची निर्दोष सुटका, सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज पनवेल येथील सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर,महेश फाळणीकर व कुंदनलाल भंडारी या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.सहा.पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर निकाल लागला आहे.आरोपी अभय कुरुंदकरसह अन्य दोघांना हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.तर आरोपी क्र.दोन राजू पाटील याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.पनवेल येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. १४ जुलै २०१६ रोजी अश्विनी बिद्रे…
नाशिक प्रतिनिधी, आदिवासींच्या आंदोलनानंतर नाशिक पंचायत समितीकडून आदिवासी वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू, आदिवासींना पाणीपुरवठा करण्यास नाशिक पंचायत समिती आर्थिक आणि प्रशासकीय कारणे सांगून पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करत होती.त्यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुक्यातील विविध वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासींनी नाशिक पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन आंदोलन केले. पंचायत समितीकडे आदिवासींना पाणी देण्यास पैसे नसतील तर आम्ही भीक मागून पंचायत समितीला पैसे देऊ,असे सांगून आदिवासींनी ” भिक मागो, ” आंदोलन करत निधी गोळा केला आणि तो पाण्यासाठी पंचायत समितीला दिला.आदिवासी या देशाचे नागरिक नाहीत का ? त्यांना पाणी मिळण्याचा हक्क नाही का ? असा प्रश्न आदिवासी कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विचारला.आदिवासींच्या…
वसंत भोईर,वाडा वाड्यात किती शेतकऱ्यांनी केली मातीची आरोग्य तपासणी ? आपल्या शेतीची माती भरघोस पीक घेण्यायोग्य असावे,यासाठी किमान एक वर्षआड तरी माती परीक्षण करावे यासाठी जनजागृती केरण्यात येत असते.परंतु अनेक शेतकरी या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांनी मातीची आरोग्य तपासणी केल्यास मातीतील खनिजांच्या प्रमाणानुसार खत व्यवस्थापन करणे,सोयीचे होत असते. मात्र अनेक शेतकरी माती परीक्षण न करताच रासायनिक खतांचा वापर करत असतात.सामान्यत: शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षातून एकदा माती परीक्षण करायला हवे.मात्र, वर्षानुवर्ष शेतात तेच पीक घेत असल्यास दरवर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते. तालुक्यात काही शेतकरी माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करीत असल्यामुळे त्यांचे पीक जोमात येते…
दीपक मोहिते, ” केवळ कोडगेपणा,” मंत्र्यांच्या संवेदना स्मशानातील सरणावर जळून केंव्हाच खाक झाल्या आहेत…. राज्यात असलेल्या महायुतीच्या असंवेदनशील सरकारकडून शेतकऱ्यांची वारंवार क्रूर चेष्टा करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आठवड्यापूर्वी घुमजाव केले असताना दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना विचारतात की सरकार तुमच्या प्रत्येक कामासाठी पैसे देत असताना,तुम्हाला कर्जमाफीच्या पैश्यातून आपल्या मुला- मुलींची लग्ने का करावीशी वाटतात ? हा निव्वळ कोडगेपणाच नाहीतर निर्लज्जपणा देखील आहे. महायुतीच्या असंवेदनशील सरकारमध्ये बिनडोक व ज्यांच्या संवेदना मेल्या आहेत,असे अनेक मंत्री आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन इंजिनच्या सरकारने ” आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ,” असे जाहीर आश्वासन दिले…
