- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, दहशतवादी हमास आपल्या देशाच्या उंबरठ्यावर… इस्रायल-हमास याच्यामध्ये युद्धविराम झाल्यामुळे दक्षिण आशियामधील देशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.पण हमास आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.भारताशी हमासची थेट दुश्मनी नसली तरी इस्त्रायलशी असलेली आपली जवळीक त्याच्या डोळ्यात सलू लागली आहे.त्यामुळे त्यांनी भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या अतिरेकी संघटनाना बळ देण्याचे काम सुरु केले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोट शहरांमध्ये ५ फेब्रु.रोजी एक कार्यक्रम झाला.” कश्मीर सॉलिडेरिटी आणि हमास ऑपरेशन,” ” अल अक्सा फ्लड कॉन्फ्रेंस, ” असं या कार्यक्रमाचे नाव होतं.या कार्यक्रमामध्ये हमास नेते डॉ.खालिद अल-कदूमी सहभागी झाले होते.आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत या मंचावर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि…
नाशिक प्रतिनिधी नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीला शासनाची मंजूरी … नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर,अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत.त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासासाठी गती मिळणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती.या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे.त्यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य होणार आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीच्या उभारण्यासाठी २०० कोटी रु.च्या निधीस मंजुरी…
भरत जोशी,मुंबई, महत्वाची अंतिम लढत, भारताची लढत न्यूझीलंडशी झाल्यास फायदेशीर ठरू शकेल… भारताणने काल ऑस्ट्रेलियाचा उपणत्या फेरीत ५ विकेट्स राखत पराभव केला.भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला. या विजयाने भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आज होत असून हा सामना पाकिस्तानमधील लाहोर येथे होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ ९ मार्च रोजी दुबईमधील मैदानावर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल. मात्र या दोन संघांपैकी भारतासाठी कोणता संघ अधिक सोयीस्कर ठरेल याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्हा पर्यावरण ; सरकारच आपल्या जीवावर उठलंय, स्थानिक प्रशासनाचा निर्लज्जपणा,खादाड वृत्ती व सरकारची उदासीनता अशा तीन कारणामुळे येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्याचे होत्याचे नव्हते होणार आहे.मातीचोरी,रेतीउपसा,वृक्षतोड व अनधिकृत दगडखाणी आदी कारणामुळे निसर्गरम्य पालघर जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे.दुसरीकडे प्रदूषणातही मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे.मात्र या गैरप्रकारात गुंतलेल्या समाजकंटकासमोर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन लोटांगण घालण्यात धन्यता मानत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पालघरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.हा जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.या दुष्टचक्रात मानवी जीवन लयाला जाण्याची शक्यता आहे. या सर्व गैरप्रकाराला केंद्र व राज्य सरकार कसं खतपाणी घालत आहे,हे अनेक घटनांवरून स्पष्ट…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ब्रेस्ट कॅन्सर चाचणी शिबिर संपन्न, महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि त्वरित निदान हे अत्यंत महत्त्वाचे असून,त्याच उद्देशाने ग्राम मैत्रीण बचत गट महासंघ, जव्हार आणि बोईसर तारापूर रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.या शिबिरात एकूण ८० महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. कार्यक्रमात डॉ.सोनम खंडेझोड (अवेन्यू चेअर ब्रेस्ट कॅन्सर ),वैशाली शिंदे ( प्रोजेक्ट इन्चार्ज,बोईसर तारापूर रोटरी क्लब ), प्रा.संध्या शहापुरे ( जागृती प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ),प्राची कडव,वैभवी धोंडगे ( टेक्निशियन,नोव्हा लॅब आणि यु.ई.लाइफ सायन्सेस ) यांनी मार्गदर्शन केले.तसेच, ग्राम मैत्रीण बचत गट महासंघाच्या अध्यक्ष प्राध्यापिका डॉ.प्रज्ञा कुलकर्णी,सचिव…
सचिन परब,विरार, जागतिक महिला दिनी वसई विरार मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना मोफत प्रवास, ०८ मार्च, २०२५ रोजी जगभरात १०० हून अधिक देशांमध्ये ” जागतिक महिला दिन,” साजरा होत आहे. महिलांचा सन्मान करण्यासाठी,महिला सक्षमीकरण आणि समानतेचे समर्थन करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात.समाज, राजकारण,अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या रॅली,परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.राजकारणापासून विज्ञान,कला,संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.तसेच महिला दैनंदिन जीवनात स्वतःच्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिलांना ०८ मार्च,२०२५ रोजी आयुक्त अनिलकुमार…
संदीप जाधव,बोईसर, तारापूर येथे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन, तारापूर अणुशक्ती केंद्र आणि जिल्हा परिषद,पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.आ.केंद्र, तारापूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये तारापूर पंचक्रोशीतील ४०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक रामदास मऱ्हाड उपस्थित होते. शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या आणि उपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.रक्तदाब,रक्तशर्करा, मुखाचा,स्तन, गर्भाशय व मुखाची कर्करोग तपासणी, तसेच गरोदर माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय सिकल सेल, सामान्य आजारांचे निदान व उपचार करण्यात आले. पालघर जिल्ह्यात गर्भवती महिलांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या (अॅनिमिया) समस्येच्या पार्श्वभूमीवर,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निदान आता तरी अलिबाबा आणि चाळीस चोरांपासून सावध रहा… गेल्या विधानसभा निवडणुकीत ” अलिबाबा आणि चाळीस चोर,” आपल्या बहिणींची फसवणूक करत पुन्हा सत्तेच्या गादीवर विराजमान झाले आहेत.आम्हीच जगज्जेते अशा आविर्भावात ते सध्या वावरत आहेत.पण धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या दोन भामट्यांनी त्यांच्यासह इतर ३९ चोरांची लक्तरे वेशीला टांगली व राज्यभरात त्यांची नाचक्की झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे ४१ आमदार ( अलिबाबा आणि चाळीस चोर ) निवडून आले.त्यामध्ये छगन भुजबळ,( महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा ) सुनील तटकरे,दस्तुरखुद्द अजित पवार,( जलसंपदा विभागाचे ७० हजार कोटी रु.फेम ) हसन मुश्रीफ,( अनेक आर्थिक घोटाळ्याचा जनक ) माणिकराव…
दीपक मोहिते, जनतेचा प्रचंड दबावासमोर सरकारला झुकावे लागले,पण सरकारची अब्रू गेली, संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.गेल्या तीन महिन्यापासून राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.पण सरकारपक्ष मात्र जोवर धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे मिळत नाहीत,तोवर त्यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही,असे सांगत होते.काल देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडियो व छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले.या हत्येतील छायाचित्रे व व्हिडियो पाहून सरकार देखील हादरून गेले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघामध्ये काल सुमारे तासभर चर्चा झाली.या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,असा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार त्यांचा…
संदीप जाधव,बोईसर वारांगडे येथे फर्निचर दुकानाना भीषण आग ; सात दुकाने जळून खाक, वारांगडे येथील फर्निचर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली.या आगीतसात एकमेकांना लागून असलेली सात दुकाने खाक झाली. आगीची भीषणता इतकी होती की संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने भरून गेला. सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मात्र आग कशामुळे लागली याबाबत कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. येथे फर्निचरची दुकाने दाटीवाटीने एकमेकांना लागुन असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली.विशेष म्हणजे,या भागात कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतात.या घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.मात्र दुकाने एकमेकांना लागून असल्याने पाण्याचा फवारा मारून…
