- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, बॉटमलाईन नॅशनल डेस्क धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा, गेल्या काही वर्षात मुंबई ते थेट डहाणू परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असून पालघर जिल्ह्याची लोकसंख्या हां हां म्हणता जवळपास ५० लाखाच्या घरात पोहोचली आहे. नागरीकरणाचा हा वेग लक्षात घेऊन राज्य सरकार, जिल्हा प्रशासन,स्थानिक स्वराज्य संस्था व रेल्वे मंत्रालय, यांनी संयुक्तपणे नियोजन करण्याची गरज होती.पण त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली नाही.त्याचे परिणाम मात्र या परिसरातील जनतेला भोगावे लागले व अद्याप ते भोगत आहेत. या सर्वांच्या उदासीनतेमुळे जीवघेणा रेल्वे प्रवास,राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत रस्त्याची दुरावस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचा नियोजनशून्य कारभार हा येथील नागरिकांच्या पाचवीला पुजला आहे. पालघर जिल्हा हा मुंबईच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सोनम वांगचूक यांची अटक ; केंद्र सरकार पडले तोंडघशी, लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांची तब्बल १७० दिवसाची नजरकैद आणि अटकेनंतर १४ मार्च २०२६ रोजी सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्यावर लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा रद्द केला असून, जोधपूर तुरुंगातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. लडाखला सहाव्या अनुसूची आणि राज्य दर्जा मिळावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी न्यायालयात हे प्रकरण टिकणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे सरकारला ही उपरती तब्बल…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” युद्ध थांबण्यात जगाचे हित आहे… सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोविड – १९ या जीवघेण्या रोगाने संपूर्ण जगाचे होत्याचे नव्हते केले होते. त्या अस्मानी संकटाला जगाने यशस्वीपणे तोंड दिले.पण अवघ्या दोन वर्षांच्या काळात किमान ५ लाख लोक मृत्युमुखी पडले.हे संकट मानवनिर्मित होते की निसर्गनिर्मित हे आजही गुलदस्त्यातच आहे. सध्या जे संकट जगावर घोंगावू लागले आहे,ते मात्र मानवनिर्मितच आहे. अमेरिका – इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध, हे जगाला वेठीस धरू पाहत आहे. या युद्धामुळे जगभरात तेल व नैसर्गिक वायूची होऊ घातलेल्या टंचाईने जगातील सर्वच देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आखाती देशातून येणारे तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” घराणेशाही ; पण कुठवर ? ” घराणेशाही,” ला आपल्या समाजव्यवस्थेत पूर्वी बिलकुल स्थान नव्हते, पण हल्लीच्या काळात राजकीय नेत्यांना ही घराणेशाही हवीहवीशी वाटू लागली आहे. कालांतराने ही इ घराणेशाही घराण्यातील लोकांच्या उरावर बसू लागल्यामुळे अनेक घराणी दुभंगत गेली. ही घराणेशाही सत्ता,राजकीय पक्ष सहकार,इ. क्षेत्रातील प्रचलित व्यवस्था मोडीत काढते. तरीदेखील ती राजकीय मंडळींना ती हवीशी वाटते. आपल्या आप्तस्वकीयाना संधी देताना राजकीय पक्षाचे नेते सारे काही गुंडाळून ठेवतात व स्वतःचा स्वार्थ साधत असतात. घराणेशाही कशाला म्हणतात,हे जाणून घ्यायचे झाल्यास आपल्याला पवार कुटुंबाकडे बोट दाखवायला लागेल. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार आणि आता पार्थ…
दिपक मोहिते, न्यूजलाईन, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा ; मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्यानंतर त्यांचे क्रमांक २ चे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रु.रोजी तेहरानवर झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई व यांच्या आठ ज्येष्ठ नेत्यांचा खात्मा झाला. त्यामुळे देशाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमेरिका व इस्त्रालय या दोघांनी युद्ध पुकारल्यामुळे नवीन नेतृत्वाची निवड तातडीने करण्याची गरज लक्षात घेऊन मोजताबा खामेनेई यांची निवड करण्यात आली. पण त्यांची ही निवड तात्पुरती स्वरूपाची आहे.…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार, अमेरिका व इस्त्रायल यानी दोन दिवसापासून इराणची राजधानी तेहरानवर प्रखर बॉम्बहल्ले चढवले, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी, त्यांचे नातेवाईक व अनेक ज्येष्ठ मंत्री यांचा खात्मा झाला. इराण, अणू कार्यक्रम राबवत असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेने इस्त्रायलच्या मदतीने हे हल्ले केले, असे भासवण्यात येत असले तरी त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. अमेरिकेचा आखाती देशात असलेल्या तेलसाठ्यावर आपला कब्जा राहावा,यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेची इराक, इराण, सिरिया, अफगाणिस्तान, येमेन या तेलसंपन्न राष्ट्रावर वक्रदृष्टी आहे. सौदी अरेबिया, कुवेत, अबुधाबी व दुबई या देशांनी अमेरिकेशी मिळते जुळते घेतल्यामुळे आजच्या घडीला हे सारे देश सुरक्षित आहेत. इराण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” केजरीवाल प्रकरणी केंद्र सरकार तोंडावर आपटले, सत्तेचा हव्यास,जीवघेणे शत्रुत्व, सुडभावना व बेधुंद स्वभाव ,अशा चार कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा, हे दोघेही अक्षरशः तोंडघशी पडले. लोकशाही व्यवस्थेमध्ये वरील चार गैरप्रकाराना कधीही थारा मिळत नसतो. हे पुन्हा एक सिद्ध झाले आहे. दिल्लीच्या राऊज अँव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दोघाची सर्व आरोपामधून निर्दोष मुक्तता केली. मद्य धोरणाशी संबधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी या दोघांना तुरुंगवास भोगावा लागला होता. या सर्व घडामोडीमुळे भाजपची लक्तरे वेशीला टांगली गेली. यातून भाजप व त्यांचे अंधभक्त काही बोध घेतील, असे वाटत…
दीपक मोहिते, आमचा अभिमान मराठी टिकली, तरच महाराष्ट्र टिकेल, आज मराठी भाषा गौरव दिन,त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी २७ फेब्रु. रोजी मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी,लेखक व नाटककार वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांच्या जन्मदिनी तो साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या दिवसापासून ” राजभाषा मराठी दिन,” तर २७ फेब्रु.रोजी ” मराठी भाषा गौरव दिन,” साजरा होत असतो. २१ मे २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने हा दिन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्याचा निर्णय घेतला व तो नित्यनेमाने साजरा होऊ लागला. नव्या पिढीला मराठी भाषेचा अभिमान वाटावा, सध्याच्या डिजिटल…
दीपक मोहिते, हल्लाबोल, ग्रामीण भागातील जि.प.शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव.. महाराष्ट्र सरकार,अधून मधून राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करणार अशा बातम्या कानावर पडत असतात. पटसंख्या उतरणीला लागल्यामुळे शाळा बंद पडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे, त्यास सरकारचे शिक्षण विषयक धोरण सर्वस्वी जबाबदार आहे, असे म्हंटल्यास ते वावगे ठरू नये. आपल्या राज्याचे शैक्षणिक धोरण कायम डगमगते राहीले. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात राज्यकर्ते व सनदी अधिकाऱ्यांची बुरसटलेली मानसिकता, अंमलबजावणी यंत्रणेतील त्रुटी, आदी कारणामुळे एकेकाळी आदर्श शिक्षण व्यवस्था म्हणून नावारूपाला आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा भूतकाळात जमा होऊ लागल्या आहेत. पटसंख्या नसल्याचे कारण सांगत सरकार आता त्या बंद करू पाहत आहे. वास्तविक सरकारने बंद पडणाऱ्या…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” आता सरपंच होणार ” प्रशासक,” ; ग्रामीण भागाचा फायदा की तोटा ? राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी ग्रामीण भागाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असले तरी त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम कसे होतील, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार फेब्रु.अखेरीस मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर बाहेरचा प्रशासक नेमण्याऐवजी विद्यमान सरपंचांनाच ” प्रशासक, ” म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सरपंच व सदस्यांना सहा महिने किंवा नव्याने निवडणूक होईपर्यंत, गावाचा कारभार पाहता येणार आहे. ग्रामीण भागाचा विकास खुंटता कामा नये,तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत रहावे, असा उद्देश…
