- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, भाताला हमीभाव कागदावरच ; अद्याप भातखरेदी सुरूच झाली नाही… गेल्या काही वर्षापासून शेतीव्यवसाय अनिश्चिततेच्या वातावरणात हेलकावे खात आहे.पावसाचे उशिराने आगमन,अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,परतीच्या पावसाचा फटका,नापिकी व सरकारचे कृषीविषयक दिशाहीन धोरण, इ.कारणामुळे शेती व्यवसाय उतरणीला लागला आहे.अशा परिस्थितीत सरकार उत्पादित शेतमालाला हमी भाव देणे व वेळेवर भातखरेदी केंद्रे सुरू करणे,या दोन महत्वाच्या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. खाजगी बाजारपेठेत भाताला भाव मिळत नसल्यामुळे राज्य शासनाने पालघर जिल्ह्यात आदिवासी विभाग महामंडळाच्या माध्यमातून वाडा,मोखाडा तालुक्यातील १० खरेदी केंद्रे स्थापन केली आहेत.या खरेदी केंद्रावर सुमारे १ हजार ४६५ शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली.नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना २…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, वाडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वाडा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर येथे नुकतेच आयोजित करण्यात होते.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. सदर विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट व उच्च माध्यमिक गटाने विविध विषयांवर प्रयोगांची मांडणी केली होती.यामध्ये एकुण १०४ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन या विज्ञान प्रदर्शनात करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वाडा पंचायत समीतीच्या सभापती अस्मिता लहांगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्या भक्ती वलटे,पं.स.सदस्य अमोल पाटील,सागर…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची गरज… कोंकण महसूल महसुल विभागातील पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग,या चार जिल्ह्यात शेती-बागायती सोबत मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.समुद्रकिनारी असलेल्या या चार जिल्ह्यात हजारो कुटुंबीय या मासेमारी व्यवसायावर आपला चरितार्थ चालवतात.समुद्रातील मत्स्य उत्पादनाने चारही जिल्ह्यात कोळी व मांगेला समाजाला आर्थिक वैभव मिळवून दिले.३० वर्षांपूर्वी मत्स्यउत्पादन हे माफक दरात विकण्यात येत असे व ते सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे होते.त्याकाळी मच्छिमारांना विपुल प्रमाणात मत्स्यउत्पादन मिळत असे,त्यामुळे ग्राहकांना ते वाजवी दरात विकणे शक्य होत असे.आज ती स्थिती उरली नाही,उत्पादनात घट व खर्चात वाढ,त्यामुळे माश्यांचे दर गगनाला पोहोचले आहेत, व ते ग्राहकांनाही परवडत नाही.उत्पादनात सतत घट का…
दीपक मोहिते, महानगरपालिकेच्या विकास कामांचा व योजनांचा आढावा, आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आ.स्नेहा दुबे-पंडीत यांनी महानगरपालिकेची विविध विकास कामे व योजनांसंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सदर आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा,लोककल्याणकारी योजना यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांतर्फे आ.स्नेहा दुबे-पंडीत यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर महानगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे व महानगरपालिकेच्या पुढील योजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली.आमदाराकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. या आढावा बैठकीमध्ये प्रभारी आयुक्त रमेश मनाळे,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सहा.आयुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, शेतीची राखण नव्हे,पिकाला पाणी देतोय साहेब, तालुक्यातील ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विहिरीत मुबलक पाणी असले तरी वीजेअभावी या पाण्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही. त्यामुळे पाणी देण्यासाठी झारीचा उपयोग करावा लागत आहे.भातकापणीची कामे संपली आहे,आता भाजीपाला लागवड सुरू आहे त्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. तालुक्यात दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होत असतो. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतातील वाळ,हरभरा,मुग, भाजीपाल्याला पाणी देता येत नसल्याने आम्ही झारीने पाणी देत असतो,असे गुंज गावातील शेतकरी मोहन पवार यांनी सांगितले.वीजपुरवठा सुरळीत व्हावा,अशी मागणी तालुक्यातील…
सूरज चव्हाण विरार पालघर जिल्ह्यात व्यसनाविरोधी पथनाट्य स्पर्धा २०२४ संपन्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. व्यसनांच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर विरोधी मताचे होते.सरकारने व्यसनमुक्तीची कास धरावी, यासाठी त्यांनी भारतीय संविधानात कलम ४७ च्या माध्यमातून खास तरतूद केली. व्यसनांना आळा घालणे, तसेच व्यसनी व्यक्तींचे मतपरिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनवणे,हे नशाबंदी मंडळाचे उद्दिष्ट साध्य व्हावे आणि युवकांपुढे तसेच सर्वसामान्य समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा,यासाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत, जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग,सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय,सत्पाळा,विरार यांचा मराठी विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेंट…
सद्दाम शेख मोखाडा, पालघर जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता, फेंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.सध्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरातील आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यंदाक्या हंगामात परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्यांची मोहोर प्रक्रिया लांबली आहे.दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा,तसेच परतीचा पाऊस,वातावरणात होणारा बदल,याचा परिणाम बागायती पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.साधारणपणे सप्टें. महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते,मात्र या वर्षी पावसाने नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.अशावेळी फेंगल चक्रीवादळामुळे हंगामी पिकांना फटका बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याऐवजी पानातील रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.साधारणतः नोव्हें.…
सद्दाम शेख,मोखाडा, मोखाडा तालुका ; रोजगार हमी योजनेचे तीन तेरा,आदिवासींच्या स्थलांतरणाला वेग, ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांचे स्थलांतर थांबावे, स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने रोजगार हमी योजना कार्यान्वित केली.या योजनेतून “ मागेल त्याला काम व पंधरा दिवसात दाम ” असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही महत्वकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु सुरवातीची चार ते पाच वर्षात ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली.नंतर मात्र ग्रामिण भागात योजना अंमलात आणणारे अधिकारी व कर्मचारी यांनी योजनेचा मूळ उद्देश गुंडाळून ठेवला.मोखाडा तालुक्यात जवळपास १५ हजाराहून अधिक जॉंबकार्डधारकांची संख्या असुन वर्षभरात केवळ सहा ते सात हजार कार्डधारकांना या योजनेंतर्गतकाम मिळत असून उर्वरित आठ हजार कार्डधारक…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, वाडा तालुक्यातील अनेक ग्रा.पं.चा गलथान कारभार, वाडा तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये जन्म-मृत्यूच्या नोंदी नसल्याचे श्रमजीवी संघटनेकडून उघड करण्यात आले असून त्यांनी तहसीलदारांकडे ग्रामपंचायतींच्या गलथान कारभाराची यादी सादर केली आहे. यादीची पडताळणी केल्यानंतर तहसीलदारांनी नोंदी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना पारीत केले. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याकडून जन्म-मृत्यूची नोंद वेळीच करणे,हे काम आहे.मात्र तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील जन्म मृत्यूच्या घटना निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत घटनेची नोंद केली जात नाही.ज्यावेळी रहिवासी व्यक्तीला विविध कामासाठी दाखला आवश्यक असतो,त्यावेळी ती व्यक्ती ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवते.दाखला देतांना नोंद करतांना त्या गरजू व्यक्तीला अनेक पुरावे सादर करावे लागतात.काही ग्रामपंचायत अधिकारी गरजू नागरिकाना चकरा मारायला लावतात.तसेच विविध कारणे दाखवून…
जव्हार प्रतिनिधी, धानोशी येथे महिला मेळावा उत्साहात साजरा, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प-१ तर्फे धानोशी ग्रामपंचायतीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजयाताई लहारे होत्या.यावेळी धानोशी ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पवार,उपसरपंच भगवान पालवी, व ग्रामपंचायत सदस्य ज्योती घेगड व सविता फरळे,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली.त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षिका सरला मेतकर यांनी महिला मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांना प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ.भावना घोलप यांनी महिलांना योग…
