Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, आम्ही काय पाप केले ? जिल्हावासियांच्या मनात एक ना अनेक प्रश्नांचे वादळ घोंगावत आहे.या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकार व नवनिर्वाचित लोकप्रतिधीनीकडून अपेक्षित आहेत.पण सरकार व लोकप्रतिनीधीची या सर्व प्रकरणी असलेल्या उदासीनतेमुळे ती मिळतील,असे वाटत नाही. १ ) गेल्या वर्षभरात सरकारने वसई तालुक्याच्या विकासासाठी कोणत्या योजना मंजूर केल्या ? २ ) वसई / विरार उपप्रदेशाची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना विविध कारणामुळे गेली अनेक वर्षे रखडली आहे,तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढणे,अपेक्षित होते.ते का झाले नाही ? आजही ही योजना मार्गी लागू शकलेली नाही. ३ ) वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या व नागरी सुविधांची गरज लक्षात घेऊन एखादे आर्थिक पॅकेज द्यावे,…

Read More

नदीम शेख,पालघर शिवसेनेच्या ज्योती मेहेर यांची अध्यक्षपदी निवड, गेली पंचवीस वर्षे राजकीय,सामाजिक, सहकारी,शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या सेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर यांची महाराष्ट्र राज्य सह.सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आल्या.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. यापूर्वी त्या सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीवर निवडून आल्या होत्या.त्यांची सहकार क्षेत्रातील सुरुवात सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून झाली.त्यानंतर त्या ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ,ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी अध्यक्ष व विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सचिव होत्या.सध्या त्या विद्यमान सदस्या आहेत. मच्छिमार कृती समितीच्या पालघर ठाणे जिल्हा महिला संघटक व महाराष्ट्र राज्य मच्छीमार…

Read More

दीपक मोहिते, नायगाव – चंद्रेपाडा गावात ” पाणी बचत,” चे यशस्वी मॉडेल, दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस तळ गाठणारा चंद्रपाड्याचा पाझर तलाव यंदा मे महिन्याच्या अखेरीसही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा टिकवून आहे.ही कामगिरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनबद्ध कारभारामुळे शक्य झाले आहे. दरवर्षी चंद्रपाडा व आजुबाजूच्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो. नायगाव पूर्वेस असलेल्या चंद्रपाडा परिसरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली.त्याचा परीणाम पाणीपुरवठ्यावर होत असतो.पाऊस पडेपर्यंत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते.तर शेकडो नागरी संकुलाना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदा स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार लोकरे यांच्या नेतृत्वाखाली या भीषण समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आल्या.यंदा…

Read More

वसंत भोईर,वाडा आवंढे गावात जमिनीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला, जमिनीच्या वादातून तालुक्यातील आवंढे गावात तुफान हाणामारी झाली असून लोखंडी सळया,लाठ्याकाठ्या दगडाने चढवलेल्या हल्ल्यात दीर व वहिनी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.दरम्यान या हल्ल्यातील आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. निखिल पाटील ( वय ३३ ) भाविक पाटील, एकनाथ पाटील,जगन्नाथ पाटील,धिरज पाटील,रोहीणी पाटील,काया पाटील,निलम पाटील,हस्ती पाटील सर्व रा.आवंढे अशी आरोंपींची नावे आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आवंढे गावाच्या हद्दीत गट नंबर ११८ येथे नविन बांधकाम सुरू असलेल्या घरावर पाणी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वादग्रस्त भुजबळ यांना ओबीसी समाजाने तारले, राज्याचे वादग्रस्त नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल मंत्रीपदावर वर्णी लावल्यामुळे भुजबळ यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.हा निर्णय घेताना अजित पवार यांनी नैतिकता गुंडाळून ठेवत,त्यांची माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लावली आहे.या घटनेचे वर्णन करायचे झाल्यास एक वादग्रस्त बाहेर पडला,तर दुसरा वाजतगाजत त्याच्या मंत्रीपदावर विराजमान झाले,असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टोळीत स्वतः अजित पवार,खा.सुनील तटकरे, खा.प्रफुल्ल पटेल,हसन मुश्रीफ,माणिकराव कोकाटे,व आता छगन भुजबळ यांची वर्णी लावून त्यांनी भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.अजित पवार…

Read More

दीपक मोहिते, अस्मानी संकट, अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक व्यवसाय डबघाईला, गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने सुमारे अडीच हजार हे. जमिनीवरील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले.तर पाचशेहून अधिक वीटभट्ट्या आणि पन्नास ते साठ मिठागर मालकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. तसेच या नैसर्गिक संकटातून मच्छिमारही सुटू शकले नाहीत.डहाणू तालुक्यातील डहाणू,धाकटी डहाणू,चिंचणी व बोर्डी येथील दहा मासेमारी बोटींचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात सुक्या मासळी व्यवसायासह मच्छिमारांचे साठ कोटी रु.चे आर्थिक नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात शेतकरी, बागायतदार,मच्छिमार, वीटभट्टी व मिठागर व्यवसाय मोठ्याप्रमाणात करण्यात येतो.ऐन उत्पादनाच्या हंगामात वळवाचा पाऊस झाल्यामुळे मीठ उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. केळवे…

Read More

नवीन पाटील,सफाळे बॉम्बची ती धमकी अखेर ठरली अफवा… लघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.हा सर्व प्रकार ” मॉक ड्रिल,” चा प्रकार असावा,असे सुरुवातीला वाटत होते.परंतु नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आकाश भास्करन डीएमके केविंग केअर,या नावाने हा ई-मेल आल्याचे अधिकृतपणे सांगण्यात झाले.अखेर बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे सायं.पाच वाजता निष्पन्न झाल्यावर दिवसभरातील घडामोडीवर अखेर पडदा पडला.त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची मुभा देण्यात आली. मुंबईतील ताजमहल हॉटेल आणि विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी गेल्या दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर आता पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने आणि हा ई-मेल खरा असल्याचे स्पष्ट झाले व मुख्यालय संकुलातील…

Read More

वसंत भोईर,वाडा वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,निसर्गाशी जोडणारा उपक्रम संपन्न, वनशक्ती संस्थेमार्फत दिनांक १६ ते २० मे २०२५ या कालावधीत ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण ४२ विद्यार्थी सहभगी झाले होते. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी,हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. या शिबिरात मुलांनी भाजीपाला शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक साहित्याचा वापर करून हस्तकला तयार करणे, सकाळी ध्यानधारणा करणे व पक्षीनाद निरीक्षण,नदी परिसंस्थेचा अभ्यास, जलशुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती,वनस्पती व कीटक निरीक्षण,तसेच स्थानिक रोपवाटिकेला भेट देणे,असे अनेक उपक्रम राबवण्यात आले.रोपवाटिकेत कंपोस्ट निर्मिती, रोपांची लागवड व कुंडी…

Read More

दिपक मोहिते, पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा इमेल, पालघर जिल्हा मुख्यालयात संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल आल्यामुळे मुख्यालय संकुलात प्रचंड गोंधळ उडाला.ईमेल खरा असल्याचे पोलिसांची खात्री पडल्यानंतर पोलीस यंत्रणेने जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकामी करण्यास सुरुवात केली. आज सकाळी अकराच्या सुमारास पालघर शहराच्या पश्चिमेस असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली.पालघर पोलिसांकडून या ईमेलची तपासणी केल्यानंतर हा ई-मेल खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली. जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यास आरंभ केला.अधिकारी,कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयांपासून काही अंतरावर…

Read More

दीपक मोहिते, बुलेट ट्रेन : ” ब्यू-ग्रीन,” इकॉनॉमीच्या तत्त्वावर विरार स्थानकाचा मास्टर प्लान, विरार येथील ” हायस्पीड रेल, ” ( बुलेट ट्रेन ) रेल्वे स्थानकांसाठी योजना ( एल.ए.पी. ) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ” जिका,” सोबत झालेल्या बैठकीत स्थानिक क्षेत्र विकास योजना ( एल.ए.पी.) करता ब्यू-ग्रीन इकॉनॉमीच्या तत्त्वाचा उपयोग करून परिपूर्ण असा मास्टर प्लान व डिझाइन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे वसई-विरार महापालिका अंर्तगत नगरविकास विभागाने या कामासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले बी-आर्च व एम-आर्च पात्रताधारक दोन आर्किटेक्ट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ” हायस्पीड रेल, ” ( बुलेट ट्रेन ) स्टेशन क्षेत्र विकास ‘प्रोजेक्ट स्मार्ट` अंतर्गत ठाणे,…

Read More