- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” रविंद्र फाटक यांना वसईत पैकीच्या पैकी मतदान होऊ शकते, ठाणे – पालघर विधान परिषद जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली व ती आपल्या पदरात पाडून घेतली. पालघर व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात ” आपणच दादा आहोत,” हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. आपले पारंपारिक राजकीय शत्रू असलेले वनमंत्री गणेश नाईक व ठाण्याचे आ. संजय केळकर या दोघांचे त्यांच्यासमोर मात्रा न चालल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यावर त्यांचे निर्विवाद राजकीय वर्चस्व निर्माण झाले आहे. तरीही त्यांना बेसावध राहून चालणार नाही.पालघर,बोईसर या दोन तालुक्यात त्यांच्या पक्षाची चांगली बांधणी आहे. मात्र वसई तालुका,तलासरी, विक्रमगड या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत मिळत आहेत, समान नागरी कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी उत्तराखंड व आता गुजरात व आसाम या तीन राज्यांनी हा कायदा लागू केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रही तो लागू करण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत मिळू लागले आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन देण्यात आले होते. भाजपनं जाहीरनाम्यात म्हटलंय की, ” भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून सामान नागरिक कायद्याचा समावेश केला आहे. भाजप असं मानतो की जोपर्यंत भारतात समान नागरी संहिता लागू होत नाही, तोपर्यंत महिलांना समान…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकणार, विधान परिषदेच्या १७ जागासाठी २२ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचे जागावाटप पूर्ण झाले असून महायुतीमधील भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट ) या तीन प्रमुख पक्षांनी एकेक पाऊल मागे घेत ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भाजप – ११,शिवसेना ( शिंदे गट ) – ०४ व राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प. गट ) – ०२ ,असे जागावाटप झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सात जागा मिळाल्या हव्या, अशी मागणी करत दिल्ली गाठली होती. पण गृहमंत्री अमित शहा यांनी धुर्तपणे चर्चेचा चेंडू मुख्यमंत्री…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अखेर शांतता करार दृष्टिक्षेपात, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार झाला आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे उभय देशात होणाऱ्या सामंजस्य करारावर आता चर्चा अधून मधून खंडित होत असते.पण इराणच्या कडवट भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान बरेचसे खाली आले आहे.त्यामुळे शांतता करार अंतिम टप्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमानी स्पष्ट केले आहे इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी हटवून भागात शांतात आणि स्थैर्य निर्माण, यासाठी ट्रम्प यांनी आता प्रशासनाला कराराची चर्चा अंतिम टप्याकडे नेण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल असीम मुनीर या प्रकरणी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक ३० दिवसांत…
दीपक मोहिते, कृषी पर्यटन तरुणांना वरदान ठरू शकते, समुद्रकिनारी वसलेला पालघर जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा असून शेती, बागायती व विपुल वनसंपदा असलेल्या जिल्ह्यात आता नागरीकरणाला चांगला वेग आला आहे. नागरी, डोंगरी व समुद्री अशा तीन भागात विखुरलेला असा हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील भूमिपुत्र हे भातशेती व बागायती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. मात्र,गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा, बदलते हवामान,अवकाळी पाऊस व पर्जन्यमानाचे प्रमाण उतरणीवर जाणे, आदी कारणामुळे भूमीपुत्राची मुले शेती व बागायती व्यवसायात आपले नशीब आजमवण्या ऐवजी इतर व्यवसायात स्थिरावू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषीक्षेत्र आता दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अनेक तरुण आता रिसॉर्टस व फार्महाऊस या व्यवसायात…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण झालंय, भारतीय राजकारणांच्या इतिहासात गेल्या १२ वर्षांचा काळ हा अनेक राजकीय घडामोडी, उलथापालथी, साधनशूचिता व अशांततेचा काळ म्हणून ओळखला गेला. ” सत्तेसाठी काय पन, ” ही नवीन विचारधारा उदयाला आली, सत्तांतर झाले, लोकांना वाटले होते की, आपल्याला ” अच्छे दिन, ” येतील. पण प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडले. मूठभर धनदांडग्याच्या हितासाठी राबणारे सरकार तुमच्या आमच्या नशिबी आले. खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत विक्रीला महत्व येत गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचे जे स्वप्न आपल्या नेत्यांनी त्याकाळी उराशी बाळगले होते, त्याला तडा गेला. १९७५ ते १९८०…
दीपक मोहिते, मान्सूनने यंदा चांगलाच इंगा दाखवला… यंदा मान्सून अपेक्षा नसताना वेळेआधी दाखल झाला होता, नंतर मात्र तो कुठे गायब झाला, हे कळायला मार्ग नाही. मान्सून राज्यात कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतो,असा अंदाज व्यक्त करणारे हवामान तज्ञ देखील बुचकळ्यात सापडले आहेत. सद्यस्थितीत तो कुठवर पोहोचला आहे, हे सांगणे कठीण झाले आहे. तो पुन्हा कधीही दाखल होऊ शकतो, असे मोघम खुलासे करण्यात येत आहेत. मान्सूनने वाकुल्या दाखवल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत. २७ मे रोजी मान्सूनने बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात प्रवेश केला होता. तत्पूर्वी १६ मे रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्याचे अंदमान – निकोबार बेटावर आगमन झाले होते. या बेटावर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विलीनीकरण व उमेदवारी देणे,हे दोन्ही विषय कडीकुलपात बंद, गेल्या चार दिवसांपासून बहुजन विकास आघाडी हा शिवसेनेत ( शिंदे गट ) विलीन होणार व भाजप,सेनेच्या क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात माजी महापौर राजीव पाटील यांना उतरवणार, अशा वावड्या उठत होत्या. या वावड्या आता हवेतल्या हवेत विरल्या आहेत.आजच्या घडीला महायुतीमधील तिन्ही पक्षाकडे अपुरे संख्याबळ असले तरी फडणवीस व शिंदे हे दोघेही मॅनेज संस्कृतीमघ्ये माहीर असल्यामुळे ते शेवटच्या क्षणी काही करू शकतात. या दोन्ही पक्षाना बविआच्या कुबड्याचा आधार घ्यावा लागेल,असे वाटत नाही. विधान परिषदेच्या या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडे असलेले ७१ सदस्य आपल्या बाजूला वळवण्यासाठी हे दोघे कोणत्याही थराला जाऊ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” स्थलांतरण ही निरंतर प्रक्रिया असून त्यास संविधानाचा आधार आहे… मुंबई शहरातील वांद्रे येथील अनधिकृत बांधकामे तोडल्यानंतर विस्थापित कुटुंबे वसई तालुक्यातील नालासोपारा शहरात स्थलांतरित होतील, अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. एका राजकीय नेत्याने याविषयी दिलेल्या मुलाखतीमध्ये अशाप्रकारची शक्यता वर्तवल्यानंतर या चर्चेला चांगलेच उधाण आले. अनेकानी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. पण हे स्थलांतरण सरकार रोखू शकते का ? तशी तरतूद आपल्या संविधानात असती तर गेल्या तीस ते चाळीस वर्षात मुंबई शहरात जे परप्रांतीयांचे लोंढे आदळले ते सरकारने रोखले असते. पण भारतीय संविधान त्यास अनुमती देत नाही. भारतीय संविधानातील कलम १९ ( भाषण स्वातंत्र्य व विविक्षित हक्काचे…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, ( नॅशनल डेस्कसाठी ) ” अब्राहम अकॉर्डस,” च्या सक्तीमुळे, पाकिस्तान संतापला, अमेरिका व इराण दरम्यान शांतता करार होण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने सकारात्मक पावले पडत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तान अमेरिकेवर संतापला आहे. दोन राष्ट्रात बोलणी सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकरित्या इराणसोबत शांतता करार करण्यासाठी पाकिस्तानला ” अब्राहम अकॉर्डस,” सामील होण्याची अट घातली, पण पाकिस्तानने अमेरिकेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इस्त्रायल सोबत राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी असलेला हा करार आमची मूळ विचारधारा व धोरणाच्या विरोधात आहे. अशी स्पष्ट भूमिका पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहंमद आसिफ…
