- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” आर्थिक दुरावस्था,” मोफत योजना ; आर्थिक घडी विस्कळीत करणाऱ्या, देशात कर्जमाफी,मोफत वीज अल्पदरात गॅस सिलिंडर,मोफत घरे व पैसे वाटप,या योजना भविष्यासाठी धोकादायक असून पायाभूत सुविधा व अन्य विकासकामावर विपरीत परिणाम करणाऱ्या ठरतील,असा इशारा रिझर्व्ह बँकेने राज्यांना दिला आहे.देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे निरीक्षण नोंदवले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी देशातील अनेक राज्य सरकारानी अनेक मोफत योजना सुरू केल्या आहेत.त्यामध्ये लाडकी बहीण योजना,मोफत वीज,मोफत घरे व कर्जमाफी,याचा समावेश आहे.सरकारच्या या कृतीवर रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली असून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर जाहीर केलेल्या अहवालात या सर्व खर्चाचा परिणाम सामाजिक व आर्थिक विकासावर होऊन अनेक महत्वाच्या क्षेत्राचा विकासही…
वसंत भोईर,वाडा, वाड्यात तरूणीवर अत्याचार,तरुण अटकेत, तालुक्यातील कुडूस येथे परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला वाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी गाळाचा पाड्यातील जंगलात सायंकाळच्या सुमारास घडली.या घटनेनेब सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडूस येथे सदर तरूणी राहत असून ती परिचारिकेचे शिक्षण घेत आहे.तरूणीचे वडील तिला भेटण्यासाठी कुडूस येथे आले होते.तरूणीच्या गावातील तरूणही तेथे दुचाकीवरून आला होता.मी तुम्हाला घरी सोडतो,असे सांगुन त्यांनी दोघांना गाडीवर बसवले आणि त्यानंतर गावाच्या जवळपास नेल्यानंतर त्यांनी तरूणीच्या वडीलांना अर्धा रस्त्यावर सोडले. त्यांना शाॅटकट रस्त्याने घरी जाण्यास सांगितले व तरूणीला मोटारसायकलवर तो…
सुरेश काटे,तलासरी, अणवीर गावात चार बंधाऱ्याचे भूमिपूजन, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून तलासरी तालुक्यांतील अणवीर गावात गेल्या चार वर्षांपासून सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे.याच कामाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून संस्थेने पाणलोट विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून तलासरी तालुक्यांतील अणवीर गावात गेल्या 4 वर्षांपासून सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. याच कामाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून संस्थेने पाणलोट विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो,परंतु गावा – गावांमध्ये जलसंधारण यंत्रणा पुरेशी आणि मजबूत नसल्याने पाणीसाठा होत नाही.त्यामुळे पावसाळा…
नवीन पाटील,सफाळे, केळवेरोड येथे मोफत आरोग्य शिबिरा संपन्न, लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व ढवळे हाँस्पिटल पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम केळवेरोड येथे आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परीसरातील शंभरहुन अधिक रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली व गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. याप्रसंगी संघाचे कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक,विश्वस्त नमिता राऊत, संघाचे चिटणीस विविध पाटील, वैद्यकीय सल्लागार डॉ.भार्गव ठाकूर,डॉ.विलास सावे, विश्रामधाम समितीप्रमुख अशोक राऊत,ढवळे हाँस्पिटलचे डॉ.अभिजित त्यांची टीम व परीसरातील मान्यवर उपस्थित होते. आरोग्यधामचे कार्यवाह पंकज म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आरोग्यधामाच्या कार्याची माहीती दिली व समिती प्रमुख जितेंद्र राऊत यानी आरोग्य शिबिर यशस्वी…
सुनावणीस उपस्थित न राहिलेल्या अर्जदारांसाठी पुन्हा सुनावणी तारखा जाहीर, वसई विरार शहर महानगरपालिकेतील ५५ गावाच्या प्रकरणी अधिसूचनेनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुन्हा समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रू.रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार १४ ते दि.१४ मार्च या कालावधीमध्ये हरकती अर्जांवर जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे १६ ते २० डिसें.पर्यंत सुनावणी सुरु होती. सदर सुनावणीसाठी हरकती अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहणे कामी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ज्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहता आले नाही,त्यांच्यासाठी पुन्हा सुनावणी तारखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.सदर सुनावण्या जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे २३ ते २६ डिसें.दरम्यान कार्यालयीन…
संदीप लहांगे, डहाणू, अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश, पंचायत समिती सभागृह डहाणू येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रवींद्र शिंदे,यांनी गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी ( पंचायत ),विस्तार अधिकारी ( सांख्यिकी ), सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रुपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा,आणि पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रवीण भावसार,गट विकास अधिकारी पल्लवी सास्ते,पंचायत समिती डहाणू, तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन २०१६-१७ ते २०२३-२४…
संजय लांडगे,वाडा, परभणी येथे घडलेल्या घटनेचा वाड्यात जाहीर निषेध, परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली होती.त्या घटनेच्या निषेधार्थ लढा देणारा भिमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी,या तरुणाचा पोलीसांच्या अमानुष मारहाणीत जेलमध्येच मृत्यू झालेला आहे.महायुती सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशानस यांनी सुडबुध्दीने भिमसैनिकाला अमानुषपणे मारहाण केली,या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला.ही घटना अतिशय निंदणीय आहे.ज्या पोलीसांनी मारहाणी केली आहे.त्या पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून निलंबीत करावे.अशा मागणीचे निवेदन संविधान सन्मान विचार मंच वाडा तालुक्याच्या वतीने देण्यात आले. वाडा तालुका संविधान सन्मान विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आज वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देऊन भिमसैनिकाच्या मृत्यूप्रकरणी एस.आय.टी.चौकशी करावी. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना…
संदीप जाधव,बोईसर, बोईसर येथे तलाठ्याला धक्काबुक्की : तीन ट्रक ताब्यात, बोईसर पूर्व भागात अनेक दगडखाणी आणि क्रशर उद्योग करण्यात येतात.त्यामुळे या परिसरात जडवाहनाची सतत येजा सुरु असते.अत्यंत बेदरकारपणे धावणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी मौजे गुंदले सजाचे तलाठी हितेश राऊत यांनी पुढाकार घेतला व कारवाईचा बडगा उचलला. तलाठी हितेश राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतुकीवर कारवाई सुरू केली. दरम्यान,एका वाहन मालकाने त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तलाठी राऊत यांनी पोलिसांच्या मदतीने अनधिकृत दगड वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी अशा घटना त्वरित रोखण्यात याव्यात ,अशी मागणी केली आहे.बोईसर पूर्व भागात जवळपास वीस ते पंचवीस अनधिकृत दगडखाणी…
संदीप लहांगे,डहाणू, पालघर येथे कोस्टल रिसिलियन्स’ व जलवायू बदलावर चर्चासत्र संपन्न, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ” कोस्टल रिसिलियन्स आणि स्ट्रेंथनिंग डिझास्टर अँड क्लायमेट चेंज अडक्शन इन पालघर डिस्ट्रिक्ट,” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमास पालघरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडसइंड बँकच्या सीएसआर इनिशिटिव्ह अंतर्गत संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या कोस्टल रिस्क रिडक्शन,या उपक्रमाला पाठिंबा देत,या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात पालघर व डहाणू तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक नागरिक सहभागी उपस्थित होते.यामध्ये ग्रामविकास अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी,प्राध्यापक आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी…
दीपक मोहिते, ” भयाण वास्तव, ” देशातील पंधरा कोटी असंघटित कामगारांना मिळायला हवा, जगभरातील अनेक देशात कामगार क्षेत्र,हे संघटित व असंघटित,अशा दोन भागात विभागले आहे.आपल्या देशात असंघटित कामगाराची संख्या ही संघटीत कामगारापेक्षा अनेक पटीने जास्त आहे.संघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अटी,शर्ती मान्य केल्या आहेत,कामाची हमी दिली जाते.मासिक वेतन,वार्षिक बोनस,भविष्य निर्वाह निधी,इ.कायदे लागू केले जातात,ते क्षेत्र संघटित क्षेत्र म्हणून ओळखले जाते.तर असंघटित क्षेत्र,हे ज्याची सरकार दरबारी नोंद नाही,रोजगाराची हमी नाही,सरकारी कायदे व नियम लागू होत नाही व कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात,ते क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र होय. अशा या असंघटित क्षेत्रात आजमितीस कोट्यवधी कामगार,आपले हलाखीचे जीवन जगत आहेत.संघटित कामगारांच्या हिताचे अनेक…
