- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, साळसूदपणा, धनगर-धनगड प्रकरण ; ” र,” चा ” ड,” कसा झाला ? सरकारच कमकुवत आहे, पेशवाईच्या काळात ” ध,” चा ” मा,” झाला आणि पेशवाईला ग्रहण लागले.या इतिहासाची आठवण राज्यात घडलेल्या एका घटनेमुळे आपल्याला नुकतीच झाली. राजकारणात अधून-मधून असे प्रकार सतत होत असतात.त्यावर ओरड झाली कि राज्यकर्ते टायपिंग मिस्टेक झाली,म्हणून सारवासारव करत असतात.किंवा आम्हाला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढल्याचे सांगत आपली कातडी वाचवत असतात.तसाच प्रकार धनगर आरक्षणासंदर्भात झाला आहे.राज्यशासनाने धनगर आरक्षणासंदर्भात काढलेले शुद्धीपत्रक या समाजाने आंदोलन छेडल्यानंतर घाईघाईने रद्द केले. या शुद्धीपत्रकात ” धनगर ऐवजी धनगड,” असे म्हंटले होते.त्यावरून धनगर समाज आक्रमक झाला व त्या समाजाच्या नेत्यांनी…
दीपक मोहिते, राज्यसरकारची ” अशी ही बनवाबनवी,” आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील १५ जातीचा इतर मागास वर्गात समावेश करणे व पत्रकारांसाठी महामंडळ नेमणे,असे दोन निर्णय घेतले आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने केंद्र सरकारला तशी शिफारस केली आहे.राज्यात काही पोटजाती आहेत,त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात यावा,असा निर्णय आयोगाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला होता.त्यानंतर आयोगाने याविषयी केंद्र सरकार दरबारी प्रस्ताव दाखल केला आहे.या आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयासोबत राज्यसरकारने पत्रकारांसाठी महामंडळ नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.२०१४ साली ” १५ लाख तुमच्या खात्यात जमा करणार,” हा जसा जुमला होता,त्याच धर्तीवर शिंदे सरकारची…
दीपक मोहिते, पालघर व ठाणे जिल्ह्याला परतीच्या पावसाचा दणका, काल सांयकाळी पालघर व ठाणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.विजेचा कडकडाट व प्रचंड गडगडाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग पार हडबडून गेला आहे.आजही अतिवृष्टी होईल,असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.त्यामुळे शेतकरी सावध झाले आहेत. सलग चार दिवस पाऊस पडेल,असा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.काल सांयकाळी सलग चार तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यातील भातशेतीचे किती नुकसान झाले,याबाबत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी अनेक हेक्टर शेतीमधील तयार झालेली भाताची रोपे आडवी झाल्याचे समजते.काल झालेल्या पावसाचे रौद्र रूप पाहिल्यानंतर शेतकरी आता भितीच्या सावटाखाली आले आहेत.अशा परिस्थितीत…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, शिवसेनेचा दसरा मेळावा ; भावी राजकारणाची दिशा ठरणार का ? सालाबादप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा,हा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बिकेसी मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.या दोघांच्या दसरा मेळाव्यासोबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे देखील आता दसरा मेळावा घेण्यासाठी सरसावले आहेत,त्यांचा मेळावा कुठे होणार आहे,याविषयी अद्याप माहिती उपलब्ध नाही. या दसरा मेळाव्याचा इतिहास व अविभक्त सेनेची वाटचाल,याविषयी आपण माहिती घेऊया.अविभक्त शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा सेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ३० ऑक्टो.१९६६ रोजी शिवाजी पार्कवर घेतला होता.तेंव्हापासून सेनेचा दसरा मेळावा व शिवाजी पार्क,असे अतूट नाते निर्माण झाले होते.ते…
दीपक मोहिते, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी काल रात्री मुंबईच्या बीच कँडी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.ते गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.२८ डिसें.१९३७ रोजी त्यांचा जन्म झाला होता.रतन टाटा हे केवळ उद्योगपतीच नव्हते तर ते सामाजिक बांधिलकी जपणारी महनीय व्यक्ती अशी त्यांची जगभरात ओळख होती.देशावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी ते कायम मदतीसाठी पुढाकार घेत असत. एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी जगात नाव कमावले,टाटा समूहातील अनेक कंपन्यांचा विस्तार करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.सन २००० मध्ये त्यांना पद्मभूषण व २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून केलेली कामगिरी प्रशंसनीय होतीच,पण…
दीपक मोहिते, समजूतदारपणा, पक्षांतर ; वावगं काही नाही,पण धोके अनेक, पक्षांतर,ही एक निरंतर प्रक्रिया आहे,ती सतत चालूच असते.ती योग्य कि अयोग्य ? याविषयी मत मतांतरे आहेत.प्रत्येकाला सत्तेच्या राजकारणाची गरज असते,तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो.तशी इच्छा असणे,हे गैर नाही.कारण तो मानवी स्वभाव आहे.स्वार्थ आणि सत्ता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यातून एकही राजकारणी सुटलेला नाही. २०१४ साली मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची पळापळ सुरू झाली.ते वादळ इतके भयावह होते कि प्रत्येक राजकीय नेत्याला या वावटळीत आपले अस्तित्व टिकणे कठीण आहे,असे वाटू लागले व त्यांची पळापळ सुरू झाली.समुद्रात जहाज बुडू लागलं कि सर्वप्रथम जहाजातील उंदीर पळू लागतात.कारण प्रत्येकाला…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अजित पवार यांना बारामती विधानसभेची भिती वाटतेय, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पत्नीच्या पराभवामुळे पार खचून गेले आहेत.आपण जर आपल्या बारामती या परंपरागत मतदारसंघातून निवडणूक लढवली तर आपल्यासोबत धोका होऊ शकतो,अशा भितीने त्यांना सध्या ग्रासले आहे.गेली तीन दशके आपल्या काकासोबत वावरल्यानंतर आपले काका काय करू शकतात,याचा प्रत्यय गेल्या लोकसभा निवडणुकीत आल्यानंतर त्यांची दातखीळच बसली होती.त्याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होईल,असा अंदाज त्यांना आल्यानंतर मी जो उमेदवार देईन,त्याचे काम सर्वाना करावे लागणार आहे,असे पालुपद ते आळवू लागले आहेत.त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत सापडले आहेत.ते स्वतः बारामतीमधून उभे राहायला घाबरत असताना त्यांचे बोलके पोपट मात्र अजित पवार हे…
दीपक मोहिते, लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेचे मोठे योगदान- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ग्रामसभा ही केवळ गावकऱ्यांची सभा नसून लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे.लोकशाही बळकट करण्यासठी ग्रामसभेचे मोठे योगदान असल्याचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी सांगितले. जव्हार येथे ग्रामसभा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,त्या वेळी राज्यपाल के.सी.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर,सत्यम गांधी,वयम संस्थेचे अध्यक्ष विनायक थळकर, , विश्वस्त मिलिंद थत्ते,ग्रामसभेच्या अध्यक्षा संगिता कुवारा,तसेच नागरिक उपस्थित होते ग्रामसभा ही एक छोटी लोकसभा आहे,जेथे लोकांचे प्रश्न,समस्या ऐकल्या जातात,जेथे समाजाच्या…
दीपक मोहिते, वसई विरार महानगरपालिकेच्या १२ व्या राष्ट्रीय मॅरेथॉनचे ८ डिसें.२०२४ रोजी आयोजन, वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्षे असून मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनकामी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया-दिल्ली,महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन व पालघर जिल्हा ॲथलेटिक असोशिएशन या तीनही क्रीडा संस्थांची मान्यता मिळाली आहे.मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग हा अेम्स ( association of international marathons and distance races) या संस्थेने मोजमाप करुन प्रमाणित करुन दिला आहे. तर आर्यन्स स्पोर्ट्स पी.आर.इव्हेट,हे मॅरेथॉनचे इव्हेन्ट मॅनेजमेन्ट करत आहेत. वसई-विरार महापालिकेने अंतर्भुत केलेल्या नवीन स्पर्धा आणि इतर माहिती देण्यासाठी तसेच…
दीपक मोहिते, टेक्सटाईल पार्कविरोधात पालघरवासीयांचा आक्रोश मोर्चा, केंद्र व राज्यसरकार पालघर जिल्ह्यावर एकामागोमाग प्रकल्प लादू लागले आहे.१९७० च्या दशकात महा.औ.विकास महामंडळ,तारापूर अणू ऊर्जा केंद्र,वाढवण बंदर,मुरबे बहुद्देशीय बंदर व आता रिलायन्स टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पाचा त्यामध्ये समावेश आहे.त्यामुळे पालघरवासीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.काल अनेक गावातील भूमीपुत्रांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला.या मोर्च्यात माहीम,केळवे,वाकसई, ठोकराळे व कमारे या गावातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माहीम ग्रामपंचायतच्या सरपंच प्रीती पाटील,कमारे ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली पडवळे आणि वाकसई ग्रामपंचायतचे सरपंच माधवी हाडळ या तिघींनी आणि केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किणी हे या आंदोलनात सहभागी झाले होते.या परिसरात टेक्स्टाईल पार्क प्रकल्प उभारून परिसरात पर्यटनवाढी ऐवजी जलप्रदूषणामुळे…
