- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकार,खनिज संपन्न जिल्हे उद्योजकांच्या घश्यात घालत आहेत…. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ” चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळे राज्यात समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार असल्याचे म्हंटले आहे.या दोन्ही जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या खनिज विकास निधीतून अनेक महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे आपल्या भाषणात सांगितले.कॅन्सर इस्पितळ,कौशल्यावर आधारीत रोजगार निर्मिती,पायाभूत सुविधांचा विकास,शिक्षण व अन्य क्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे.सरकारचा उद्देश चांगला आहे.पण तो केवळ कागदावर राहता कामा नये.कारण,आजवरचा अनुभव लक्षात घेता या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र नागवला गेला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार…
सुरेश काटे,तलासरी कुरझे धरणातून पाण्याचा विसर्ग,८५ घरांचे नुकसान.. तलासरी तालुक्यातील कुर्जे धरणातुन काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमूळे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे वेरोली नदी लगत असलेल्या वडवली, सवणे,वंकास गावातील जवळपास ८५ घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्यासह, सामानाचे नुकसान झाले. कोणतीही आगाऊ सूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.घरात पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे तसेच पोलिसांकडून देण्यात आली. गावातील घरात पाणी घुसल्याचे माहिती मिळताच महसूल कर्मचारी, पोलीस घटना स्थळी पोहोचून मदत कार्य सुरु केले, दोन दिवसापासून तलासरी भागात मुसळधार पाऊस पडत आहे,या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत,तलासरीत…
वसंत भोईर,वाडा वाड्यात भातपीक नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात, वाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने भात पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.या नुकसानीची पाहणी करण्यास आज दुपारनंतर सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम,वाडा झिणी हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे.या वाणाबरोबरच गुजरात ४,गुजरात ११,सुरती, पुनम,जया,कोलपी,रत्ना, कर्जत ३,कर्जत ४ आदी वाणांची लागवड तालुक्यात केली जाते.१५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड तालुक्यात होत असते.यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते,मात्र गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने तसेच तानसा, वैतरणा व मोडकसागर…
तलासरी प्रतिनिधी, तलासरी भागात मुसळधार पाऊस, तलासरी भागात काल संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्याना पूर आला आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची नोंद नाही. पावसामुळे गरबा खेळता येत नसल्यानमुळे तरुणाई हिरमूसली आहे,मंडप, डेकोरेशन,डीजे,ऑर्केस्ट्रा यावर केलेला लाखो रु.चा खर्च वाया गेला आहे. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे गरब्या साठी टाकलेले मंडप उडून गेले. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या,त्यामुळे भागातील अनेक पूल पाण्याखाली गेले व वाहतूक बंद पडली.अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे बाजारपेठेत शुक शुकाट दिसत होता.
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे शैक्षणिक साहित्य व पोषण आहाराचे वाटप, सकल आदिवासी संस्था, कल्याणच्या महिला पदाधिकारी आणि दात्यांतर्फे आज शिरोशी व तळ्याचापाडा तसेच ग्रामपंचायत जुने जव्हार येथे गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात गरोदर माता-भगिनींसाठी पूरक आहार आणि नवरात्र भेट कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी तारपा नृत्याने करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा डेकाटे, सचिव योगिनी कोसराबे,कोषाध्यक्षा संगीता निनावे,तसेच सदस्या कांता आष्टीकर व वृषाली मसुरकर यांनी विद्यार्थी आणि गरोदर माता-भगिनींची आपुलकीने विचारपूस करून मार्गदर्शन केले.यावेळी ते म्हणाले की, “आम्हीही आपल्या आदिवासी समाजाचे असून,जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी प्रगती करून उज्ज्वल भविष्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नवे जिल्हे नंतर निर्माण करा,सर्वप्रथम बोईसर नगरपरिषदेचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लावा… जे सरकार बोईसर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करू शकत नाही,ते सरकार आता २० नवीन जिल्हे व ८१ तालुके निर्माण करण्याच्या घोषणा करत सुटले आहे.राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच याविषयी घोषणा केली आहे.त्यामुळे बोईसर व अन्य सहा गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायतीने नगरपरिषदेची निर्मिती होण्यासंदर्भात सर्व निकष पूर्ण केले आहेत.वाढते नागरीकरण ( लोकसंख्या – जवळपास सव्वा लाखाच्या घरात ) नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा व प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण झालेला विस्कळीतपणा लक्षात ग्रामपंचायतीने नगरपरिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करून काही वर्षांपूर्वी मंत्रालयात…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व -प्रभाग क्र.२२, प्रभाग क्र.२२ मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, या प्रभागात विविध समाजाचा भरणा आहे.येथे वाढत्या नागरीकरणामुळे मराठी भाषिक आता अल्पसंख्याक झाले आहेत.नव्याने निर्माण झालेल्या नागरी संकुलात विविध जाती धर्माच्या लोकांचा भरणा सर्वाधिक आहे.जलाराम बापू नगर परिसरात भलीमोठी झोपडपट्टी असून काठियावाडी व श्रमिक वर्ग या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने राहतो.एकंदरीत या प्रभागात मिश्र लोकवस्ती आहे.गेल्या काही वर्षात येथे मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले.पूर्वी या भागात अनेक मिठागरे होती,पण त्याचे क्षेत्र आता कमी झाले आहे.या खारटन जमिनीची मालकी केंद्रीय सॉल्ट विभागाकडे आहे.पण,१९९० पासून मीठ व्यवसाय हळूहळू इतिहास जमा झाला. त्यामुळे या जमिनीवर बिल्डर लॉबीची वाकडी नजर आहे.पण या जमिनीची…
दीपक मोहिते, जिल्हा प्रशासन व वसई विरार मनपा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव, पालघर जिल्ह्यात काल रेड अलर्ट असताना पहाटे पाचच्या सुमारास विरार पूर्वेस चंदनसार विभागातील बरफपाडा येथे अचानक ५० घरामध्ये पाणी शिरले व एक घर पाण्याचा प्रवाहात वाहून गेले.या दुर्घटनेची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाला थांगपत्ता नव्हता. तर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या घटनेचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. या घटनेवरून महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये बिलकुल समन्वय नसल्याचे दिसून आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या ३० कुटुंबाना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करत ३० चटया व रेशनिंग किटचे वाटप केले. काल पालघर जिल्ह्यात विरार पूर्व…
दीपक मोहिते, कामण येथे पोषण महाकार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,वसई – कामण चंद्रपाडा येथे आई चंडिका नवरात्र उत्सवात आठव्या पोषण महाकार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.स्थानिक स्वराज्य संस्था महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्यामध्ये आहाराचे प्रात्यक्षिक व आहाराविषयी मार्गदर्शन,प्रभात फेरी,स्वच्छता ही सेवा,आदिशक्ती अभियान,महिलांचे आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शन, महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती,मातृवंदना योजना, नारी सशक्त अभियान,लेक लाडकी योजनाबाबत प्रचार, प्रसिद्धी,बालविवाह कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व बालसंगोपन योजना याविषयी माहिती देण्यात आली.उपस्थित महिला बालविकास संरक्षण अधिकारी संभाजी पवार, तसेच ग्रामपंचायत चंद्रपाडा मधील सरपंच, उपसरपंच,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर,एएनएम, आशा वर्कर,सर्व विभागाच्या मुख्य सेविका,ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ अंगणवाडी सेविका…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सोनम वांगचूक यांना रासुकाखाली अटक करणे,सरकारच्या हुकूमशाहीचे लक्षण, सोनम वांगचुक यांना दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे.लडाखमध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले होते.२४ सप्टें.२०२५ रोजी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले.उपोषण करत असलेले तरुण,विद्यार्थी आणि काही समुदायांनी बाहेर पडून कार्यालये,राजकीय कार्यालये, वाहने जाळली.आंदोलनात जाळपोळ,लाठीचार्ज व गोळीबार होऊन काही लोकांना प्राण गमवावे लागले. या घटनेत सोनम वांगचुक यांना काल अटक झाली आहे. लडाखमध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले होते.२४ सप्टें.२०२५ रोजी आंदोलन हिंसक झाले.उपोषण करत असलेल्या काही तरुण,विद्यार्थ्यांनी आंदोलनातून बाहेर पडून राजकीय कार्यालये,सरकारी…
