Author: दीपक मोहिते

सचिन पाटील,वसई, नालासोपारा येथे वारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नालासोपारा यंग स्टार ट्रस्टतर्फे आयोजित आषाढी एकादशी निमित्त ” वारी विठ्ठलाची,” या उपक्रमाला भर पावसात नालासोपाऱ्याच्या चे नागरिकांनी प्रतिसाद दिला. ” विठ्ठल माझा….. मी विठ्ठलाचा,” या नादाने संपूर्ण नालासोपारा शहर दुमदुमले.बार्शी येथील वारकरी गुरुकुलमधील लहान वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर तमाम वारकऱ्यांना उत्साहीत केले. यावेळी निघालेल्या दिंडीत लहान मुले,शालेय विद्यार्थी,तरुण,ज्येष्ठ नागरिकानी सहभागी झाले होते.यातील काही मुलांनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,वासुदेवाची वेशभूषा केली होती. सदर कार्यक्रमास माजी आ.क्षितीज ठाकूर इतर सहकाऱ्यासह सहभागी झाले होते.तसेच सदर कार्यक्रमास अतुल साळुंखे, किशोर पाटील,नरेश जाधव, शुभांगी गायकवाड हे उपस्थित होते.सदर…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात मनसे व शिवसेनेकडून ( उबाठा ) सरकारचा निषेध, मीरा – भाईंदरमध्ये एका गुजराती व्यापा-याला मारहाण केल्यावरून मोर्चा काढण्यात आला होता.त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा भाईंदर शहरात मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांच्यातर्फे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धडपकड केल्याच्या निषेधार्थ वाड्यात मनसे व शिवसेनेकडून वाडा बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली., सरकार व पोलीस यांचा निदर्शकानी जोरदार निषेध केला.कार्यकर्त्यांनी यावेळी हाताला काळ्या रिबीनी बांधल्या होत्या. या आंदोलनात मनसेचे तालुकाप्रमुख कांतीकुमार ठाकरे,शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, मनसे व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी दिपक ठाकरे,…

Read More

जव्हार येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न. जव्हार प्रतिनिधी- श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ( ता. अलिबाग,जि.रायगड ) यांच्या प्रेरणेने आणि सौजन्याने तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री बैठक कळमविहिरा येथील सदस्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला.या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाशी नाळ जुळवणारा,भावी पिढीला शुद्ध पर्यावरण देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण पूरक वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत शिरोशी सरपंच कु.योगिता यशवंत शेंडे,उपसरपंच दीपक शंकर पवार,प्रमोद गोविंद शेंडे, तुकाराम गणपत मुकणे,मोहन कामडी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री बैठक सदस्य,ग्रामस्थ तसेच जयेश्वर विद्यामंदिर,डेंगाचीमेट येथील विद्यार्थीनी या…

Read More

दीपक मोहिते, मनसेचा भव्य मोर्चा ; सरकारची अब्रू गेली… आज मनसेने मीरा-भाईंदर शहरामध्ये मोर्चाचे आयोजन केले होते.पण त्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मनसेच्या सैनिकांचा संताप अनावर झाला व मराठी भाषिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.सकाळी पोलीस व मनसे सैनिक यांच्यात सुमारे दोन तास झटापट झाली.मनसे सैनिक मागे हटण्याचे नाव घेत नव्हते.अखेर सरकारला झुकावे लागले व त्यांनी मोर्चाला परवानगी दिली. आज पहाटे मनसेचे नेते अविनाश जाधव यांना व त्याच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली.या घटनेनंतर आज सकाळी मराठी भाषिकांचा मीरा रोड परिसरात जनसागर लोटला.सुरुवातीला पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती,पण अचानक त्यांनी दिलेली परवानगी रद्द केली.या घडामोडीमुळे पोलीस यंत्रणेवर सरकारचा दबाव असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर मनसेचे…

Read More

दीपक मोहिते, पळा,पळा,कोण पुढे पळे तो… राजकारणात आता नीतिमत्ता,तत्व विचारधारा व स्वाभिमान,यांस काडीचीही किंमत उरली नाही.सत्ता प्राप्त करण्यासाठी ” काय पन,” ही नवीन संस्कृती उदयाला आली आहे.भाजपने तर ” कंबरेचे सोडून डोक्याला बांधले, ” आहे.यापूर्वी काँग्रेसने देखील हेच केले होते.त्यांच्या काळातच आयाराम – गयाराम संस्कृतीला खतपाणी घालण्यास सुरुवात झाली होती.आता फक्त बाजू बदलली गेली आहे.त्या काळात भाजप ” आम्ही इतरापेक्षा वेगळे,” ( party with difference,) अशी पोपटपंची करत असत,आज त्याच भाजपने मळकटलेली अंतर्वस्त्रे धुण्यासाठी भलेमोठे वॉशिंग मशीन आणले आहे. त्याकाळी काँग्रेसजनांना सत्तेशिवाय श्वास घेववत नव्हता,आज तशीच स्थिती भाजपची झाली आहे.पक्षांतर कायदा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी मोडीत काढला आहे.दर दिवशी इकडून…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यातील सुमारे ४० गावांना सतर्कतेचा इशारा.. पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस होत पालघर,डहाणू, वाडा,विक्रमगड,या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पावसाच्या संततधारेने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सूर्या प्रकल्पा अंतर्गत धामणी धरणात २२८ दशलक्ष घ.मी. ( ८२ % ) पाणीसाठा निर्माण झाला असून धरणातील पाण्याची पातळी स्थिर राखण्यासाठी तीन दिवसांपूर्वी धरणाचे तीन दरवाजे ४० सें.मी.ने उघडण्यात आले असुन सूर्या नदीपात्रात १४ हजार ३३७ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला असून मागील २४ तासात २५४ मि.मी.पाऊस पडला.धरण प्रकल्प क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण १ हजार ५३०…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कितीही बदल होवो,पण वसईकरांचे हाल काही थांबत नाहीत, गेल्या काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून वसई/विरार अनेक परिसर पाण्याखाली गेले आहेत.” नेमेची येतो पावसाळा,” उक्तीप्रमाणे यंदाही वसई विरार महानगरपालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत.नालेसफाईची बोगस कामे सुरू असताना त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणाऱ्या लोकप्रतिनिधीवर आता तोंड लपवण्याची पाळी आली आहे. सात महिन्यापूर्वी वसई तालुक्यात सत्ताबदल झाल्यानंतर वसईकरांनी आपल्याला सुगीचे दिवस येतील,अशी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती.पण तालुक्यातील सद्यस्थिती पाहिल्यानंतर त्यांची ही स्वप्ने ” मुंगेरीलालके हसीन सपने,” ठरली आहेत.यंदाही नालेसफाईच्या कामात ठेकेदार व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले हात. चांगलेच धुवून घेतले आहेत. गेल्या चार दिवसात झालेल्या…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण जनतेची दैन्यावस्था, देवाभाऊ ” अजब तुझे सरकार आणि बेधुंद तुमचा कारभार,” हिंदीची सक्ती प्रकरणी ठाकरे बंधूनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे फडणवीस सरकार अक्षरशः तोंडावर पडले.मराठी भाषा,आम्ही बोलणार नाही,असे उर्मटपणे बोलणाऱ्या अन्य भाषिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्यानंतर त्याचे अन्य राज्यात जोरदार पडसाद उमटत आहेत.ही आग आता अन्य राज्यातही पसरण्याची शक्यता आहे.सरकारला या प्रश्नी माघार घ्यावी लागल्यामुळे सेना – मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडे विजयी मेळाव्याला मराठी भाषिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपच्या नेत्यांच्या पोटातील जळजळ सतत वाढत आहे.स्था.स्व.संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.मात्र,मराठी व अन्य भाषिकांना…

Read More

वसंत भोईर, वाडा येथे आषाढीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या पालख्या व दिंड्या, वाडा शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शनिवारी टाळ – मृदुंगाचा गजर करत पालखी व दिंडीचे सोहळे आयोजित केले होते. वाडा शहरात व ग्रामीण भागात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वारकरी संप्रदाय,महाराष्ट्राची संतपरंपरा,महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख मुलांना लहान वयातच व्हावी,या हेतूने शाळेतर्फे दरवर्षी आषाढी एकादशीला दरवर्षी हा उपक्रम साजरा करण्यात येत असतो . तालुक्यातील मौजे खानिवली येथील संगिता पाटील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खानिवली गावातून पायी दिंडी आयोजित केली होती.या पायी दिंडीतील विठ्ठल – रुखमाई यांचा पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, युवा अध्यक्षपदी संदीप माळी तर युवती अध्यक्षपदी सुवर्णा रावते यांची सर्वानुमते निवड, सालाबादप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदाही जव्हार शहरात युवा आदिवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन भक्कम आणि प्रभावी करण्यासाठी युवा आदिवासी संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड सभा काल हनुमान पॉईंट,जव्हार येथे पार पडली. या निवड सभेला कोर कमिटी सदस्य,विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेत सर्वानुमते संदीप माळी यांची युवा अध्यक्षपदी,तर सुवर्णा रावते यांची युवती अध्यक्षपदी आणि सोनाली महाले यांची युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार विक्रमगड विधानसभा आ.हरिश्चंद्र भोये यांच्या…

Read More