- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ‘ अमृत सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना,
- चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात रास्ता रोकॊ, हजारो महिला रस्त्यावर,
- अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,
- मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर वाहनाच्या प्रचंड रांगा,
- जांभूळ विहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
- भालीवली गावातील सिंचन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवा,
- एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा,
- आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत,
Author: दीपक मोहिते
वाडा प्रतिनिधी, श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन, तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या प्रश्नांवर आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी ‘ कोण म्हणतो देणार नाय;घेतल्याशिवाय राहणार नाय,’अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील निराधार महिलांना के.वाय.सी. करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच सरसकट योजनांचा लाभ देण्यात यावा,अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांना अमृत आहार देण्यासाठी टाळाटाळ केली जात असुन या महिलांसाठी तत्काळ आहार उपलब्ध करून देण्यात यावा, तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये परिचारिका निवासी राहणे आवश्यक आहे मात्र निवासी राहत नसल्याने रूग्णांची हेळसांड होते निवासी राहत नसलेल्या डाॅक्टर व परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात…
वाडा प्रतिनिधी, वाडा नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर,ख़ुशी कम,जादा गम, वाडा नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समितीच्या सभागृहात वाड्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व ५० टक्के महिला आरक्षणाची सोडत चीट्ठीच्या माध्यमातून काढण्यात आली.यावेळी प्रभाग क्रमांक -१,२,८,११ हे प्रभाग अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून यापैकी प्रभाग क्रमांक-२ व ८ हे अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित झाले आहेत.तर प्रभाग क्रमांक-१४ हा प्रभाग अनुसूचित जाती महिला असा आरक्षित झाला आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक-३,७,११,१३,१६ व १७ हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक -३,७,१७ हे प्रभाग महिला…
वाडा प्रतिनिधी, कुडूस येथे अज्ञात इसमांकडून शिक्षकाला बेदम मारहाण, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रमोद थालके यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून लाठी काठ्या सळईने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात थालके हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सदर घटना काल सायं.६.०० च्या सुमारास डोंगस्ते गावच्या हद्दीत घडली.या हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेत प्रमोद थालके हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेतआज सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना डोंगस्ते गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी अडवून त्याच्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी लाठ्या काठ्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे, नगरसेवक हा नेमका कसा असावा ? आपल्या नगरसेवकाबाबत आपल्या अपेक्षा कशा असायला हव्यात ? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत ? निवडणुकीविषयी जागृत असणे,हे आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते,ती आपण पार पाडली तरच परिसराचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. नगरसेवक,या शब्दाची व्याख्या कशी आहे ? ते आपण जाणून घ्यायला हवे.नगरसेवक हा लोकसेवक असतो,आणि त्याला जाब विचारणे,हे आपले प्रथम कर्तव्य असते. नगरसेवक आपल्याच परिसरातील प्रभागात राहणारा असावा,तसा तो असल्यास,त्याला त्या भागातील अडचणी व समस्याची जाणीव असू शकते. नगरसेवकपदाची निवडणूक लढवणारा उमेदवार हा लोकांच्या अडचणी व सुखः दुःखात सहभागी होणारा असावा.स्वतःची…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यथा,ही केवळ नौटंकीच ठरेल… रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात वसई तालुक्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे,साऱ्या राजकीय पक्षांना नागरिकांची घोर चिंता लागली आहे.त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.त्यामुळे आम्हा वसई – विरारकर नागरिकांचा उर अक्षरशः भरून आला आहे.सत्ताधारी पक्ष आपल्याच सत्तेविरुद्ध आंदोलन करू शकत नाही,त्यामुळे ही मंडळी सध्या रील बनवण्यात मग्न आहेत.तर दुसरीकडे काँग्रेसचा पर्यावरणवादी नेता चार ते पाच कार्यकर्त्याना सोबत घेऊन अधून मधून रास्ता रोको करत असतो.प्रशासनातील अधिकारी देखील अशा आंदोलनाकडे ” पावसाळ्यातील बेडूक,” या उद्देशाने पाहत असतात.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले राजकीय पक्ष जागे झाले आहेत,हे न समजण्याइतके वसईकर नागरिक नक्कीच दुधखुळे…
तलासरी प्रतिनिधी, पूरग्रस्त वडवली गावाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी तलासरी तालुक्यातील पूरग्रस्त वडवली गावाची पाहणी करून बाधित शेतकऱ्याकडून नुकसानीची माहिती घेतली.यावेळी त्यांच्या सोबत खा.हेमंत सावरा, आ.राजेंद्र गावित,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड,तलासरी तहसीलदार अमोल पाठक,वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे,माजी सभापती नंदू हाडळ,त्यांच्या सह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते तलासरी भागात गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस आणि कुरझे धरणाचे चे दरवाजे उघडले होते.त्यामुळे वेरोली नदीला पूर येऊन नदी काठच्या वडवली,सवणे,वंकास गावातील ८९ घरात पाणी शिरून नुकसान झाले तर २५ घरांची पडझड झाली होती. यामदध्ये वडवली गावातील नवापाडा -२७ ओझरपाडा – २६, हडळपाडा -१३,सवणे पाटिलपाडा…
वाडा प्रतिनिधी, ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसेंडरपदी मोहन पाटील, वाडा तालुक्यातील चिंचघर येथील रहीवासी व पेशाने शिक्षक असलेले मोहन पाटील (गुरुजी) यांची मुंबई येथील एका कार्यक्रमात ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी निवड करण्यात आली.यावेळी फाउंडेशनतर्फे पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी झालेली निवड ही त्यांची प्रतिभा,मेहनत आणि समर्पणाचे हे एक उत्तम फळ आहे.मोहन पाटील हे गेली ३० वर्ष आदिवासी भागात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. गेल्या काही वर्षांपासून ग्रीन सोल फाउंडेशनमध्ये कोऑडिनेटर म्हणून काम करत असताना पालघर व ठाणे जिल्ह्यातील हजारो…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा, जव्हार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व संस्थेचा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष विनायक शेळके यांच्या अध्यक्षतेखाली, “नवतरुण” प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेने सुरुवात झाली. संस्थेचे दिवंगत सभासद यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. वर्धापनदिना निमित्त स्मरणिका २०२५ प्रकाशन करण्यात आले.प्रा. हर्षद मेघपुरिया सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून मला माझ्या वडिलांची आठवण झाली.ते या संस्थेचे सभासद होते व ते आनंदाने जगले.आपण सर्वांनी संस्थेच्या माध्यमातून जो एकोपा निर्माण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरन्यायधीशांवर हल्ला ; हा संविधानाच्या मूलभूत गाभ्यावर हल्ला, आजवर धर्माने न्यायदान क्षेत्र वागळता इतर सर्व क्षेत्रात घुसखोरी केली.काल घडलेल्या घटनेने न्यायालये देखील आता सुटू शकलेली नाहीत,हे स्पष्ट झाले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे न्यायालयात काही काळ गोंधळ उडाला होता.या वकिलाला बाहेर काढताना, त्याने ” सनातनचा अपमान भारत सहन करणार नाही, ” असं म्हटलं आहे. ही घटना घडत असताना सरन्यायाधीश गवई मात्र शांत होते आणि त्यांनी खटल्याची सुनावणी तशीच सुरू ठेवली. तो बूट सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती चंद्रन यांना लागून त्यांच्या मागच्या बाजूला पडला. नंतर त्या वकिलाने न्यायमूर्तींची माफी मागितली आणि सांगितलं…
दीपक मोहिते, बविआचा मनपा मुख्यालयावर धडक मोर्चा, वसई,नालासोपारा व वसई शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काल बहुजन विकास आघाडीने नालासोपाऱ्याचे माजी आ. क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मनपा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे लोकांचे जीव जात असून अधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही,असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात नागरिकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.या तीन शहरातील रस्त्याची अवस्था ” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,” अशी बिकट अवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट…
