- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी वसई – विरारच्या रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा
- सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, आदिवासी समाजाने ” शिका व संघर्ष,” करा,अशी निती स्विकारायला हवी… काल जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक आदिवासी संघटनानी आपली समाजव्यवस्था,संस्कृती व पारंपारीक कलेचे दर्शन विविध उपक्रमातुन घडवले.स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही हा समाज अद्याप ” वंचित घटक,” म्हणून जगभरात प्रचलित आहे.यामागची नेमकी कारणे काय आहेत ? याचा शोध ना सरकारने घेतला ना या समाजाच्या लोकप्रतिनिधीनी घेतला.निरक्षरतेचे वाढते प्रमाण हे,राज्यकर्त्यांच्या पथ्यावर पडले.”आदिवासी विकास,” या गोंडस नावाखाली राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांनी अक्षरश: लूट केली.आश्रमशाळा व आदिवासी विकास महामंडळे चराऊ कुरणे बनली.आदिवासी हा केवळ नावापुरताच ” जंगलचा राजा,” राहिला.त्यास आपली जगभरात नावाजलेली,परंतु आतून पोखरलेली ” लोकशाही व्यवस्था,” च कारणीभुत…
दीपक मोहिते, आम्हाला ” मन की बात,” नको तर ” दिलसे निकली हुई बात सुननी है,” येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ वर्षात प्रवेश करीत आहोत.बेरोजगारी,दुष्काळ, शेतकऱ्याच्या आत्महत्या,कुपोषण,शिक्षण व्यवस्थेतील विस्कळीतपणा व बालमृत्यु इ.समस्या आजही आमच्या पाचवीला पूजल्या आहेत.येणाऱ्या काळातही त्या तशाच राहणार आहेत.कारण हल्लीच्या राजकारण्यांना लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी व समस्याशी काहीही देणे घेणे नाही.कारण त्यांनी आपली घरं भरण्याचे एकमेव काम करण्यात कायम धन्यता मानली.त्यामुळे स्वातंत्र्याची आठ दशके उलटल्यानंतरही ग्रामीण भागातील जनता आजही अंधारात चाचपडत आहे.त्यांच्या जीवनात त्यांना उष्क:काल कधीच पाहायला मिळाला नाही. भारतीय संविधानाच्या २१ अ कलमाकड़े गेल्या ७९ वर्षात एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.शिक्षणाचा हक्क मंजूर…
जव्हार,प्रतिनिधी जव्हारमध्ये ” बालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा,” कार्यशाळा संपन्न. आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार आणि इंडियन सोशल सर्व्हिस युनिट ऑफ एज्युकेशन ( नागपूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने ” बाल संरक्षण प्रणाली, ” स्थापित करणे,असा डोळ्यासमोर ठेवुन नुकतीच जव्हार येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील ३० शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक सहभागी झाले होते.कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर ( भा.प्र.से ) यांनी केले. सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ शेवाळे आणि ‘ईश्यू’ संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक व संचालक राजीव थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रार्थना गीताने कार्यशाळेला सुरुवात झाली.‘ईश्यू’ या…
सुरेश काटे,तलासरी तलासरीमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा, दुर्गम डोंगरी व जंगलात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तलासरीमध्ये ही आदिवासी दिना निमित्त आदिवासी पारंपारिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य,तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन आज विद्यार्थ्यांकडून घडवण्यात आले.एकमेकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर,लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवले. आदिवासी संस्कृती व परंपरा , कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण भागातील हिरवाई वाढणे व आदिवासी सक्षमीकरणासाठी संकल्प, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण पाड्यांमध्ये वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने रिलायन्स फाऊंडेशन आणि सुखभूमी इंडिया ट्रस्ट यांच्या सहकार्याने कलम केलेल्या फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. पवारपाडा आणि नेवालपाडा येथील आदिवासी महिलांना,यावर्षीही ही फळझाडांची रोपे देण्यात आली. या उपक्रमामुळे तानसा खोऱ्यातील हिरवाई वाढणार आहे.मृदा धूप रोखण्यास मदत होईल आणि जैवविविधतेचे संवर्धन साधले जाईल. फळझाडे वातावरणातील कार्बन शोषून घेतात,ज्यामुळे हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यास मदत होते.याशिवाय,या झाडांमुळे स्थानिक पक्षी व कीटकांना आश्रय मिळेल, पाण्याचा साठा वाढेल आणि स्थानिक परिसंस्था अधिक सक्षम बनेल. स्थानिक महिलांना मिळालेल्या या रोपांमुळे केवळ पोषणाचा स्रोत उपलब्ध होणार नाही, तर…
जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे विविध उपक्रमांद्वारा संस्कृतीचे दर्शन, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज,जव्हार येथे विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रम तीन टप्प्यांमध्ये पार पडला. पहिल्या सत्रात रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विद्यार्थ्यांनीअळू,माठ,अंबाडी, तेरं,कुरडू,कोथळी,शेवग्याचे पान,पेंडरे अशा स्थानिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.यावेळी परीक्षक म्हणून दांगटे व कोरडे यांनी सादरीकरणाचे मूल्यमापन केले. दुसऱ्या सत्रात मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून तालूका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांचा तसेच नशामुक्तीचे कार्यकर्ते मिलिंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज कामडी यांनी…
वसंत भोईर,वाडा मुसारणे गावात वृक्षारोपण कार्यक्रम, गाला प्रिसीजन इंजिनिअरिंग कंपनीतर्फे वाडा तालुक्यातील मुसारणे गावात वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत फळझाडांसह पर्यावरणास लाभदायक अशा ऑक्सिजन देणाऱ्या विविध वृक्षप्रजातींचा समावेश होता. पडीक जमिनीवर वृक्षारोपण करून हिरवळीत रूपांतर करत असतात. त्यानुसार एक सुंदर वनराई उभारण्याचा मानस असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी तुकाराम बेहेरे यांनी दिली.हे वृक्ष केवळ सौंदर्यवृद्धी न करता पर्यावरण संतुलन राखण्यासही मोलाचे ठरणार आहेत.स्थानिक पातळीवर समाजहिताचे कार्य करणे, अशी आमची जबाबदारी आहे.असे बेहेरे यांनी सांगितले. यावेळी कंपनीतर्फे अवधूत पणशीकर,योगिता भोर,राजेंद्र मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पराग पाटील उपस्थित होते.स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवावेत,अशी अपेक्षा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” लाडकी बहीण,” योजनेमुळे ” आनंदाचा शिधा,” योजना होणार इतिहासजमा… आपले राज्य सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल २६ लाख महिला या योजनेच्या बोगस लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यामागे लवकरच चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.या योजनेवर आजवर झालेल्या प्रचंड खर्चामुळे अनेक विभागाची राज्यातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत,तर ठेकेदारांची हजारो कोटी रु.देयके थकली आहेत. राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून यंदाच्या गणेशोत्सवात जनतेला ” ” आनंदाचा शिधा,” ही मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रु.द्यावे लागणार असल्यामुळे आनंदाच्या शिधावर विरजण पडले आहे.दरवर्षी सणासुदीच्या काळात राज्यातील गरीब जनतेला केवळ शंभर रु.मध्ये…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता जि.प.व आठ प.स.वर महायुतीचेच वर्चस्व राहणार आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या एकूण तीन टप्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदा / पंचायत समित्या,दुसऱ्या टप्यात नगरपरिषदा / नगर पंचायती व तिसऱ्या टप्यात महानरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदेच्या ५७ व आठ पंचायत समित्याच्या एकूण ११४ जागासाठी सर्वप्रथम निवडणुका होतील.विसर्जित जिल्हा परिषदेत भाजप – सेना ( शिंदे गट ) महायुतीचे वर्चस्व होते.आगामी निवडणुकीतही त्यांचेच वर्चस्व राहील,असा अंदाज आहे. जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या तालूकानिहाय जागा… १ ) पालघर तालुका – जिल्हा परिषद…
दीपक मोहिते, स्वातंत्र्याची दुसरी लढण्यासाठी पत्रकारांनी तयारी ठेवावी…. पत्रकारीताहा लोकशाही व्यवस्थेत चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.गेली अनेक वर्षे या विषयावर खुप काही बोलले व लिहिले गेले.पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो व समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घडामोडीचे प्रतिबिंब,या आरशात उमटत असते.पण हल्ली या आरशाला तडे पडू लागले आहेत.एकेकाळी आदर्श पत्रकारिता म्हणून ओळख असलेले हे माध्यम आता ” गोदी मिडिया,” म्हणून नावारूपाला आले आहे.बदलत्या काळानुसार पत्रकारानीही आपली चौकट पार बदलून टाकली आहे.वृत्तवाहिनी व वृत्तपत्र समुहाच्या मालकानी आपल्या उद्योगाला अर्थकारणाची जोड देण्यास सुरुवात केल्यानंतर पत्रकार देखील बेफाम होत गेले.पत्रकारांचे लगाम मालकाच्या हातून राजकारण्याच्या हाती कधी गेले ते कळले देखील नाही.आता काळाच्या ओघात…
