Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” भाजप चांगलाच सक्रिय ; अनेक नाराज गळाला लागण्याची शक्यता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या चार महिन्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून भाजपची यंत्रणा आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप आता वसई विरार महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या घाऊक इनकमिंगमुळे भाजप चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.शिवसेनेचे पंकज देशमुख व किशोर पाटील हे दोघे पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये ( उबाठा ) प्रवेश केला.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांना पक्षात आल्या आल्या जिल्हाप्रमुखपद दिले.त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली व त्यांना विरोध होण्यास सुरुवात झाली.सेनेचे नवघर-…

Read More

सुरेश वैद्य,पालघर सोहम घरत ” मिस्टर मुंबई युनिव्हर्सिटी २०२४-२५, ” तर श्रेया गायकवाड ” मिस मुंबई युनिव्हर्सिटी,” सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सोहम कल्पेश घरत याने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ” मिस्टर युनिव्हर्सिटी २०२४-२५,” हा मानाचा किताब पटकावून संपूर्ण महाविद्यालयाचा, संस्थेचा आणि विभागाचा गौरव उंचावला आहे.विशेष म्हणजे,” मिस युनिव्हर्सिटी,” या स्पर्धेतही महाविद्यालयाच्या कु.श्रेया गायकवाड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या या वार्षिक युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक कला, व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरण आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ३५० महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.त्यामध्ये सोहम घरत याने ” जॅकपॉट इव्हेंट, ” मध्ये आपला ठसा उमटवत ” मिस्टर…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणुक रणसंग्राम,” बविआ व शिवसेना ( उबाठा ), गटात प्रचंड अस्वस्थता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट संकेत दिले असून या निवडणुका डिसें.किंवा जाने.महिन्यात होण्याची शक्यता आहे.या निवडणुका तीन टप्यात होणार असून त्या दृष्टीने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.महत्वाचा विषय म्हणजे प्रभाग रचनेचा तिढा नुकताच सुटला असून विद्यमान सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग ११ ने वाढण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीत एकूण ११५ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या,त्यामध्ये आता नव्याने ११ जागा वाढणार आहेत.यंदा एकूण १२६ जागावर निवडणुका होणार आहेत.गेल्या निवडणुकीत बविआ – १०८,शिवसेना – ०५,भाजप -०१,मनसे -०१,…

Read More

दीपक मोहिते, निवडणुकीचा रणसंग्राम, स्थानिक स्वराज्य निवडणुका ; सर्वसधारणपणे नोव्हें.किंवा डिसें.मध्ये होतील… निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सर्वसाधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर दरम्यान होणार आहेत.या निवडणुकांमध्ये व्हिव्हिपॅट मशीनचा वापर करण्यात येणार नाही,तसेच निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेस नुकतीच मंजुरी मिळाल्यानंतर,निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका नुकत्याच फेटाळल्या,त्यामुळे निवडणुका आता नव्या आराखड्यानुसार पार पडणार आहेत.राज्यातील मुंबई,पुणे, नाशिक,ठाणे,नागपूर,नवी मुंबई,पिंपरी चिंचवड,वसई-विरार, कल्याण-डोंबिवली,छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या बाबतीत मात्र पूर्वीप्रमाणेच २२७ प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हे २३६ प्रभागांपर्यंत…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यात राख्यांनी बाजारपेठा सजल्या, रक्षाबंधन सणासाठी वाडा तालुक्यातील वाडा शहर, कंचाड,खानिवली,शिरीष पाडा,कुडूस,अबिटघर परिसरातील बाजारपेठेतील अनेक दुकाने विविध प्रकारच्या राख्यांनी फुलली आहेत.भाऊरायाच्या पसंतीस उतरेल,अशी राखी घेण्यासाठी महिलांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी विविध भेटवस्तू खरेदी करण्यात युवा वर्ग व्यग्र झाला आहे. यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांनी सांगितले. कुंदनवर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. चिमुकल्यांसाठी लाइटिंग राख्या,छोटा भीम,डोरो माॅन, मोटू पतलू,श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत.लाइटिंग,लाकडी पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखीला ही मागणी आहे. यंदाही स्पिनर लाइटिंग राकेश असलेले बटन दाबले की विविध रंगीत लाइटिंग…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता ती वेळ निघून गेली आहे… आज अखेर अपेक्षेनुसार बहुजन विकास आघाडी व शिवसेना ( उबाठा ) गटाला गळती लागली.ही केवळ सुरुवात आहे,पुढे फार मोठे महाभारत घडणार आहे.माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्याला का सोडून जाताहेत,याचा विचार आता करून काहीही साध्य होणार नाही.मी या विषयावर दोन वर्षांपासून लिहीत होतो.पण नेतेमंडळीनी त्याची दखल घेतली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाला भाजपने अस्मान दाखवले.पण त्यानंतरही या दोन्ही पक्षात पराभवाची कारणमीमांसा व आत्मचिंतन झाले नाही.पूर्वीकाळी लोकांसमोर पर्याय नव्हता,त्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकली नाहीत.पण भाजपने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली व या दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या पायाखालची जमीन सरकली.आजपर्यंत नेतेमंडळी आम्ही ५०…

Read More

दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.३, गरजेपेक्षा अधिक पैसा आला की तो पापाला आमंत्रण देत असतो… एकेकाळी वसई विरार परिसराची ओळख,ही ” मुंबईची फूफ्फुसे,” अशी होती,ती निकामी करण्याचे पाप काही मूठभर बिल्डर्सनी केली व वसईच्या वाताहतीला सुरुवात झाली.अल्पावधीत ” ऐतिहासिक वसई,” ची ओळख ” गुन्हेगारीचे माहेरघर म्हणजे वसई,” अशी होत गेली.वसईचे नामकरण करणाऱ्या या टोळीत कालांतराने अनेक तरुण मोठ्या संख्येने सामील होत गेले.जमिनी हडप करणे,अनधिकृत बांधकामे उभारणे,या कामातून रग्गड पैसा मिळतो,हे लक्षात आल्यानंतर या टोळीत हवशे नवश्याची संख्या वाढत गेली.कालांतराने या गोरखधंद्यात पोलीस, नगरपरिषदेचे व महसूल विभागाचे कर्मचारी देखील सामील होत गेले.त्यामुळे लचके तोडण्यास वेगाने सुरुवात झाली.२००० पर्यंत वसई,नालासोपारा व…

Read More

दीपक मोहिते, ” भयावह वास्तव,” काश्मीर खोरे पून्हा अशांत होण्याच्या वाटेवर,केंद्र सरकार ठरले अपयशी, केंद्र सरकारने आजच्या दिवशी ( ५ ऑगस्ट ) वादग्रस्त ३७० कलम रद्द केले. त्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली. पण काश्मीर खोऱ्यात शांतता नांदली का ? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळते. गेल्या महिन्यात २६ निष्पाप नागरिकांची काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी दहशतवाद्द्यानी निर्घृण हत्या केली. सहा वर्षांपूर्वी केंद्रसरकारने ३७० कलम रद्द केले.त्यामुळे भारतीय जनतेने जल्लोष केला.आता खोऱ्यात शांतता नांदेल,पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार मिळेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. केंद्र सरकार देखील काश्मीर खोऱ्यात शांतता असुन पर्यटकानी मोठ्यासंख्येने काश्मीरला यावे,असे आवाहन करण्यास सुरुवात केली.पण…

Read More

दीपक मोहिते, चार वर्षांपूर्वी आदर्श सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले, श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट,शेगावचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांचे दिर्घकाळाच्या आजारपणानंतर चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निधन झाले.गेली पाच दशके भाऊंनी देवस्थानची सेवा केली.निस्वार्थपणा, पारदर्शकता सेवाभावी व देशाप्रती प्रेम, हे गुण त्यांच्या ठायी ठायी होते.गोरगरिबांना मदत,रुग्णांची सेवा व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण,आरोग्य,इ.क्षेत्रात अमूलाग्र कामगिरी त्यांनी बजावली.संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व दिले.शेगाव परिसरात आपण ते अनुभवतो.संस्थेतर्फे करण्यात येणारे अन्नदान,हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे.नीटनेटकेपणा, कामाचे योग्य व्यवस्थापन व नियोजन,यावर त्यांचा भर असायचा.कोरोना काळात संस्थेला कोविड सेंटर उभे करण्यासाठी सरकारने दहा कोटी रु. दिले.परंतु त्यांनी ते सेंटर अवघ्या दोन कोटी रु.मध्ये उभे केले व…

Read More

वसंत भोईर,वाडा शिक्षकांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली पाहीजे, सरकारी शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्याप्रति प्रामाणिक, निस्पृह व समर्पित असतात. त्यांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडली पाहीजे.,असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वारे गुरूजी यांनी चिंचघर येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात केले. गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात पुढे बोलतांना वारे गुरजीं म्हणाले,विद्यार्थ्यांच्या समृद्ध भविष्यासाठी शिक्षकांनी भेदभाव न करता केवळ त्यांच्या उज्ज्वलतेसाठी काम करावे.हेच गुरूतत्वचे खरे मर्म आहे.शाळेतील बहुभाषिक विद्यार्थी,दुर्गम भाग आणि अपु-या भौतिक सुविधा या बाबी आव्हान नसून त्याला संधी मानून काम केले पाहीजे. प्रतिकूल परिस्थितीला नावे न ठेवता,आहे ती परिस्थिती…

Read More