Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, निवडणुकीचे वेध, दीपक मोहीते, ” हल्लाबोल,” सवत फार काळ संसार करू शकत नाही… लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर पालघर जिल्ह्यात भाजपने ” मिशन लोटस,” ( फोडाफोडीचे राजकारण ) दररोज कोण ना,कोण तरी आपल्या मूळ पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपच्या तंबूत स्थलांतरीत होऊ लागला आहे.पण,घाऊक पद्धतीने भाजपची वाट धरणाऱ्या या गयारामांचे राजकीय भवितव्य हमखास धोक्यात येण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याना हा सारा प्रकार म्हणजे जेवणाच्या ताटातील कडीपत्तासारखा वाटतो आणि ते साहजिकच आहे.गेली साडेचार दशके पक्षाच्या उभारणीसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली,वेळप्रसंगी अनेक गुन्हे व न्यायालयीन खटले अंगावर घेतले.त्यांना जर जेवणाच्या ताटातील कडीपत्याप्रमाणे बाहेर टाकले जात…

Read More

संपादकीय लेख, उर्जानिर्मिती ; गेल्या आठ दशकात सरकारचे दिशाहीन धोरण, दीपक मोहिते, गेल्या आठ दशकात अनेक सरकारे आली आणि गेली,काँग्रेस,संपुआ व आता रालोआच्या काळात वित्त व मोदी सरकारच्या काळात नामकरण झालेले निती आयोग,असे एकूण १८ आयोग खर्ची पडले.पण ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न मात्र सुटू शकला नाही.आजही ग्रामीण भागातील भूमिपुत्र,शेतकरी वीज व शेतीसिंचनाच्या पाण्यावाचून तडफडत आहे.आजवर एकाही सरकारला हे दोन्ही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत,असे वाटले नाही आणि आजही या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. रयतेची आशा व अपेक्षाना पायदळी तुडवणाऱ्या सरकारला आपण आपले हक्काचे सरकार असे म्हणू शकतो का ? ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील बनत चालला आहे.शहरी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची ” बी,” टीम,वसई तालुक्याच्या उंबरठ्यावर… ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादू मुसलमीन,या पक्षाचे पालघर जिल्ह्यात झालेले आगमन व त्यांच्या काल झालेल्या जाहीर सभेला तरुणांची झालेली लक्षणीय गर्दी,ही भल्याभल्या राजकीय नेत्यांची झोप उडवणारी अशीच होती.त्यांचे प्रदेशाध्यक्ष व छ.संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाझ जलील यांनी केलेले पहिले भाषण तरुणांमध्ये उत्साह वाढवणारे असेच होते.त्यांच्या या आगमनाचे भाजपने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपली ” बी,” उतरवल्याची चर्चा सर्वत्र होत होती.तशी ती ” बी,” टीम असेल तर वसई तालुक्याची राजकीय समीकरणे बदलण्याची ती चिन्हे आहेत,असे समजायला हरकत नाही. वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात मुस्लिम व दलित समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून हा समाज पूर्वी…

Read More

दीपक मोहिते, निवडणुकीचे वेध, वसई विरारमध्ये आम्ही मोठे भाऊ ; ठाकुरानी फासे फेकले… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शह – काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.बहुजन विकास आघाडीने पराभवाच्या भितीमुळे महाविकास आघाडीशी सोयरीक करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.पण,ते कितपत यशस्वी ठरतील,हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे.पण,बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हितेंद्र ठाकूर यांनी ” वसई विरारमध्ये आम्ही मोठे भाऊ,तर जिल्ह्यात लहान भावाच्या भूमिकेत असू,” असे जाहीर केल्यामुळे ही सोयरीक किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.लग्नाच्या बोहोल्यावर चढण्यापूर्वीच मांडव तुटून पडण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी हे दोघेही एकमेकांच्या कुबड्या…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” भाग क्र.१, वर्चस्वाची लढाई कुठवर ? अवघे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर… आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या पाच वर्षात घडत असलेल्या अनेक घटनांमुळे जग हे आता तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल तर करू लागले नाही ना ? असा प्रश्न साहजिकच तुम्हा – आम्हा सर्वांच्या मनात उभा राहतो.रशिया – युक्रेन व इस्त्रायल – पॅलेस्टाईन दरम्यान सुरू असलेले युद्ध,हे संपूर्ण जगाची वाटचाल,ही त्याच दिशेने सुरू झाल्याचे पावलोपावली जाणवत आहे.दुसरीकडे अमेरिका देखील अधूनमधून इराणच्या इस्लामिक सरकार व अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर हल्ले चढवत असते.ही सर्व परिस्थिती जगाला युद्धाच्या खाईत ढकलणारी अशीच आहे.वरील चार देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आजवर प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला व आजही…

Read More

पालघर विशेष प्रतिनिधी, शिंदे गटाचेही भाजपापाठोपाठ फाडाफोडीचे राजकारण सुरु, भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटानेही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याना आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.दोनच दिवसापूर्वी वसई,नालासोपारा व नायगाव परिसरातील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याना भाजपने प्रवेश दिल्यानंतर काल शिंदे गटानेही ” हम भी कुछ कम नही,” हे दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. काल नालासोपारा शहरातील आचोळे विभागातील बहुजन विकास आघाडीच्या एका माजी नगरसेविकासह तीन माजी नगरसेवकांची मुले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश करते झाले. आचोळे,हा भाग बहुजन विकास आघाडीचा गड म्हणून ओळखला जात असे,पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांची चांगलीच पीछेहाट झाली.या प्रभागात फारशी विकासकामे न झाल्यामुळे हा…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पापाचा घडा भरतो,तेंव्हा नियतीची कुऱ्हाड कोसळतेच…. दोन दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एका वादग्रस्त व भ्रष्ट असलेल्या प्रभारी सहा.आयुक्ताला पोलिसांनी गजाआड केले.हा अधिकारी गेल्या काही वर्षांपासून आपल्या भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरला होता.वास्तविक त्याच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती.पण,त्याला सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याचे संरक्षण असल्यामुळे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नव्हते.या नेत्यामुळेच त्याला अनेक मलईदार प्रभाग समित्या लाभल्या.या अधिकाऱ्याला पोलिसांनी आपला हिसका दाखवला तर त्याच्या पाठीशी असलेल्या राजकीय नेत्याचा काळाकुट्ट चेहरा समोर येऊ शकेल. या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे १७ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला.एकेकाळी नवघर – माणिकपूर नगरपरिषदेत लिपिक पदावर काम करणाऱ्या नालायक माणसाला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” … मग हे सरकार,” गतिमान,” कसे ? गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचे सोहळे राज्यात वाजत गाजत साजरे होत आहेत.त्यासाठी राज्यात सर्वत्र मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत.त्यांचे सरकार किती गतिमान आहे,याविषयी महायुतीचे नेते सध्या गोडवे गात आहेत.अनेक नेत्यानी आपल्या सरकारला दहापैकी दहा गुण देखील देऊन टाकले.परंतु फडणवीस सरकारच्या राज्यात सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे किती प्रश्न मार्गी लावले,शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का ? महागाई कमी झाली का ? वर्षभरात किती रोजगारनिर्मिती झाली ? राज्यातील गुन्हेगारी कमी झाली का ? भ्रष्टचारावर नियंत्रण आले का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे केवळ नकारार्थीच मिळतात.मग हे सरकार गतिमान कसे,असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजप,बहुजन विकास आघाडीला खिंडीत पकडत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने बविआला खिळखिळा करण्याचा जणू विडाच उचलला आहे.गेल्या महिन्याभरात त्यांचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी आपल्या जाळ्यात ओढले.वास्तविक, भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणकुण लागताच बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्वरित हालचाल करण्याची गरज होती.आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी,त्यांना ओळखता यायला हवी होती.गेली तीन दशके तालुक्यात वर्चस्व राखणारे तसेच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले हितेंद्र ठाकूर हे गेल्या दोन वर्षांपासून चांगलेच गाफील राहिले.तसेच प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी पक्षाची धुरा हळूहळू आपल्या मुलाकडे सोपवली.त्यामुळे पक्षाच्या दोन जनरेशनमध्ये मोठी दरी निर्माण झाली.राजकारण व समाजकारण करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणे,अनिवार्य असते.पण…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” मतमोजणी पुढे ढकलणे,मतदारांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करण्यासारखे…. केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार दिवसेंदिवस सैरभैर होत असून त्याचा फटका सर्वसामान्य मतदार व राजकीय पक्षांना बसत आहे.अशा या बदनाम केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आगपाखड करत असतात.यंदा भाजप,हा प्रथमच आयोगावर तुटून पडला आहे.एरवी भाजप आयोगाची बाजू घेऊन विरोधकांना खडे बोल सूनवत होता.तोच भाजप आता आयोगाला खडे बोल सूनवु लागला आहे.भाजपच्या वागण्यात अचानक झालेला बदल हे सारे विस्मयजनकच आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गेल्या बारा वर्षातील कारभार पाहता या संस्थेची विश्वासार्हता व पारदर्शकता पार रसातळाला गेल्याचा अनुभव मतदारांनी पावलोपावली घेतला.अनेक प्रकरणी त्यांनी संशयास्पद निर्णय दिले.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे त्यांच्याविषयी असलेले ममत्व…

Read More