- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांचे शिष्टमंडळ शासकीय कुटीर रुग्णालयाच्या भेटीवर, जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासी बहुल तालुके असून येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असलेले जव्हार हे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखण्यात येते. जव्हार येथे असलेले पतंगशहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो.इमारती,वैद्यकीय उपकरणे,बेड आणि आवश्यक साहित्य यामध्ये बरीच आधुनिक सुधारणा झाली आहे.मात्र,रुग्णालयात अद्याप तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, सर्जन नसणे,शस्त्रक्रिया न होणे,अतिदक्षता विभागाची अनुपलब्धता,तसेच डिजिटल एक्स-रे,एमआरआय यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. फिजिओथेरेपी उपकरणे असूनही त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही. या भागातील आदिवासी रुग्ण दूरवर असलेल्या डोंगरदऱ्यांतून हे रुग्णालय गाठत असतात.मात्र,गंभीर आजाराच्या रुग्णांना वापी, सेल्वासा,नाशिकसारख्या शहरांमध्ये हलवावे लागते. तालुक्याच्या…
वसंत भोईर,वाडा चिंचघर – वाडा येथे इनोव्हेटर्स फसाड कंपनीचे बेसुमार अनधिकृत बांधकाम, वाडा तालुक्यातील चिंचघर गावातील मे.इनोव्हेटर्स फसाड कंपनीने नियम धाब्यावर बसवून हजारो चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतीने कंपनीला नोटिस बजावली आहे.मात्र कंपनीने या नोटीसीला केराची टोपली दाखवली असून, ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकवला आहे.कंपनीच्या या अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात इनोव्हेटर्स फसाड ही इमारत बांधकाम साहित्य बनवणारी कंपनी कार्यरत आहे.कंपनीने आपल्या मालकीच्या भूखंड क्रमांक ४२९, ४०४/२ब ४०३/१ या जमिनीवर बांधकाम करताना जमीन महसूल संहिता कायदे, नगररचना कायदे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम यांचे उल्लंघन केले…
सचिन परब,विरार विरार येथे सौर ऊर्जा जनजागृती अभियान – २०२५ संपन्न, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ” करिअर कट्टा,” या उपक्रमा अंतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विरार येथील विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम २१ जून २०२५ रोजी विरार येथील विवा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत ५५ हजार ५५५ तरुणांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या दोन दिवसीय उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे,डॉ.…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद, विक्रमगड तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.ग्रामीण भागातील विविध पुलावरून पाणी गेल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. विक्रमगड तहसीलदार यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील शीळ-देहर्जे रोडवरील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच सारशी- शोळशेत रोडवरील सारशी येथील ओहोळावरील मोरी पुल पाण्याखाली गेला तर कुरंझे-कंचाड रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. तर वेहेलपाडा कासपाडा कडे जाणारा रस्ता ही पाण्याखाली गेला असुन वाहतूक बंद करण्यात आली आहे.परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यात सकाळपासून मुसळधार…
जव्हार प्रतिनिधी, शिरोशी कातकरीपाडा पूल पाण्याखाली,ग्रामस्थाना ५ कि.मी.चा फेरा, जव्हार तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोशी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कातकरी पाड्याचा मुख्य मार्गावरील मोरी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे या पाड्याचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि आजारी व्यक्ती यांना अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या पाड्याला कळमविहिर मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी,त्या मार्गाने नागरिकांना ५ कि.मी.चा अतिरिक्त फेरा मारून जावे लागत आहे,जो आबालवृद्ध,लहान मुले, महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे.पावसाळ्यात वाहतूक साधनांचा असलेला अभाव, यामुळे पर्यायी मार्गही अनेकदा असुरक्षित ठरतो. दरवर्षी पावसाळ्यात ही मोरी पाण्याखाली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही स्थानिक…
वसंत भोईर,वाडा मानीचा पाडा गेल्या तीन दिवसापासून नॉट रिचेबल, तालुक्यातील गो-हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मानीचा पाडा गावातील पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.येथील गांवपाडा व कातकरी वाडी अशा दोन गावातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली आहे. गो-हे ग्रामपंचायत हद्दीतील मानीचा पाडा हे गाव ३० घरांचे तर कातकरी वाडी पंधरा-वीस घरांची आहे.दोन्हीही गावे शंभर टक्के आदिवासी लोक वस्ती असलेली गावे आहेत.या गावातील नागरिकांसाठी येय-जा करण्यासाठी असलेले छोटे पूल गेल्या तीन दिवसापासून पाण्याखाली गेल्याने या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. या गावातील विद्यार्थी गो-हे येथे शाळेत जात असतात. या विद्यार्थ्यांची तीन दिवसापासून शाळा बंद असल्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जनतेची फसवणूक करणे,थांबवा आता… स्वार्थ,व राजकीय लाभ,अशा जीवघेण्या स्पर्धेत आता माणुसकी हरवत चालली आहे.सांगली जिल्ह्यात एका विद्यर्थिनीला कमी गुण मिळाल्यामुळे तिच्या जन्मदात्या बापाने बळी घेतला.ग्रामीण भागातील शेतकरी दिवसागणिक मृत्यूला कवटाळत आहे.पण आपल्या राज्यकर्त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही.फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा दिवसेंदिवस काळवंडत चालला आहे. राज्यात सर्वसामान्य माणसाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य,शिक्षण,रोजगार, कृषी,महागाई,पायाभूत सोयी-सुविधा व ग्रामविकास इ.क्षेत्राचा समावेश आहे.पण दुर्देवाने आपले राज्यकर्ते समाजकारणाऐवजी धर्मकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.समाजात गोरगरीब जनतेची पिळवणूक करणाऱ्या मूठभर शेठजींचा अपवाद वगळता प्रत्येक घटक आज उपेक्षित जीवन जगत आहे.महागाईने परमसीमा गाठली आहे.जीवनावश्यक वस्तूवर लादण्यात आलेल्या जीएसटीने तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून पडले…
दीपक मोहिते, ” बाळबोध, ” पहिलीपासून पाठ्यपुस्तकात या धड्याचा समावेश करण्यात यावा, १ ) गद्दारी कशी करतात ? २ ) गद्दारी करण्यासाठी किती मोबदला ( पेट्या किंवा खोके ) दिला जातो ? ३ ) गद्दारी केल्यानंतर लाभार्थ्यांना खोक्या व्यतिरिक्त अन्य कोणकोणते लाभ मिळतात ? ( खासदारकी,आमदारकी,मंत्रिपदे व महामंडळाची अध्यक्ष किंवा संचालकपदे ) ४ ) गद्दारी करणाऱ्यांच्या मुलाबाळाना कोणते लाभ मिळतात ? ५ ) गद्दारी करणाऱ्या गद्दारांची सारी पापे स्वच्छ धुतली जातात का ? ६ ) गद्दारांची पापे धुण्यासाठी कोणते वॉशिंग पावडर वापरले जाते ? या सगळ्या विषयांची माहिती या विद्यार्थ्यांना मिळावी,त्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने एखादी अभ्यास समिती नेमावी.हे पाठ्यपुस्तक बाजारात…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी ; विश्लेषण, जग विनाशाच्या वाटेवर…. इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची व्याप्ती आता वाढत चालली आहे.हमास व हिजबुल्लाह याना नामशेष केल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा इराणकडे वळवला आहे.वास्तविक इस्त्रायलने इराणवर हल्ला करण्याचे काहीच कारण नव्हते.पॅलेस्टाईन,हमास व हिजबुल्लाह यांना इराण,सीरिया,येमेन व तुर्कस्तान,या देशाकडून आर्थिक व संरक्षण साहित्याची मदत करण्यात येते.त्यामुळे इस्त्रायल व अमेरिका ही दोन राष्ट्रे या मुस्लिम देशांना सतत पाण्यात पाहत असतात.अमेरिका हा एक व्यापारी देश असून तो आपला व्यापार वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जात असतो.इराण,इराक कुवेत व सौदी अरेबिया,तुर्कस्तान,इजिप्त व जॉर्डन ही राष्ट्रे तेलसंपन्न राष्ट्रे असून,जगातील एकूण तेल उत्पादनापैकी ४० % तेलउत्पादन इराणमध्ये होत असते.तर इराण व इराक आपले तेल रशिया,चीन,उत्तर…
वसंत भोईर,वाडा वाडा – भिवंडी रस्त्याची दुरावस्था, भिवंडी- वाडा – मनोर महामार्गाची दुरवस्था ; रिक्षा चालकांमध्ये संताप, भिवंडी – वाडा – मनोर महामार्गाचे गेल्या सात महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.सध्या खड्ड्यातून एक दिशेने वाहतूक सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना तोंड द्यावे लागत आहे.रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. वाहनचालक व प्रवाशांना कंबर दुखी,पाठ दुखी असा असा त्रास सुरू झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भिवंडी- वाडा- मनोर या ६४ कि.मी.अंतराच्या महामार्गासाठी ८०३ कोटी रु.चा निधी देण्यात आला आहे.या कामाचा ठेका ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीकडून एका बाजूचे काम सुरू असून,तेही…
