- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जागतिक पर्यटन दिन ; देशात पर्यटनाला चांगला वाव आहे, आज जगभरात जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होत आहे.पाच वर्षांपूर्वी कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राची अक्षरशः वाताहत झाली होती.परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय,अद्याप सावरलेला नाही.या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येण्यासाठी किमान ५ वर्षे लागणार आहेत.कोरोनाचा प्रभाव नाहीसा झाल्यामुळे पर्यटन विकासाला हळूहळू गती मिळू लागली व आज हा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरावला आहे.त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये पर्यटनाचे फार मोठे योगदान आहे.आपले राज्य,पर्यटन क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असून बऱ्यापैकी परकीय चलन मिळवून देणारे आहे.महाराष्ट्र हे राज्य पर्यटन स्थळांनी समृद्ध,असे राज्य आहे.इतर राज्यातही बऱ्यापैकी पर्यटनस्थळे आहेत.उदा.राजस्थान, तेलंगणा,केरळ,काश्मीर, हिमाचल…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका ; वेळीच सावध व्हा,अन्यथा कपाळमोक्ष ठरला आहे… स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो,त्यामुळे काही राजकीय पक्ष जुळवाजुळवीच्या कामाला लागले आहेत.जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे,जी राजकीय पक्षाची आर्थिक गरज भागवू शकते.त्यामुळे ही महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी,यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले देव पाण्यात टाकून बसले आहेत.पाण्यात टाकलेले देव कोणाला पावतात,हे येत्या जाने.महिन्यात स्पष्ट होणार आहे. या महानगरपालिकेच्या ११५ जागांवर निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान १ कोटी रु.चा निधी आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जमेल त्या मार्गाने गोळा करण्याच्या कामात गर्क आहे.अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,ठेकेदार, विकासक,मनपाचे वरिष्ठ अधिकारी,उद्योजक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मणिपूर /लेह/लडाख हिंसाचार ; केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे, दोन आठवड्यापूर्वी लेह/ लडाखमध्ये जो काही हिंसाचार झाला,त्यावरून केंद्र सरकारने बोध घ्यायला हवा.एरवी शांत असलेला चीनच्या सीमेवर असलेला व कायम महात्मा गांधींच्या अहिंसेचा पुरस्कार करणारा हा प्रदेश या थराला कसा काय गेला,याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनी आत्मचिंतन करायला हवे.ते न करता सरकारने नेहमीप्रमाणे आंदोलनाचे नेते सोनम वांगचुक व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांमुळे हा हिंसाचार झाल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचुक यांना आता अटक केली आहे.सोनम वांगचुक हे गांधीवादी नेते असून त्यांनी आपले प्रत्येक आंदोलन अहिंसेच्या मार्गाने चालवले.पण आज केंद्र सरकारने त्यांना…
दीपक मोहिते, वसईच्या विकासासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांचा जोरदार पाठपुरावा, वसई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण रस्ते,उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिज संदर्भातील विकास कामांचा वेग वाढवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत खालील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला : बाफाने फाटा–उमेळा फाटा,वसई फाटा–वसई गाव, सातिवली फाटा–रेंज ऑफिस,तिवरी फाटा – वामन ढाबा,तसेच,गोखिवारा रेंज ऑफिस,एव्हरशाई – वसंत नगरी व माणिकपूर नाका येथील उड्डाणपुलांचे डिझाईन व अलाइनमेंट निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.ही तिन्ही कामे आठवड्याभरात प्रस्तावित होणार आहेत. याशिवाय,उमेळमान–नायगावसह चार महत्त्वाच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा समावेश शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या बैठकीमुळे वसईतील पायाभूत…
वाडा प्रतिनिधी, वाडा येथे शिंदीचा पाडा रस्त्याची दुरावस्था, तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दीत शिंदीचा पाडा या गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून,संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर,भाविकांची मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून ये-जा सुरू आहे. मात्र खराब रस्त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिंदीचा पाडा येथे देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.परिसरातील तसेच इतर गावांतील असंख्य भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.परंतु, रस्त्याची दुरवस्था ही त्यांच्यासाठी मनस्ताप ठरली आहे.वाहनचालकांना व पादचाऱ्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ” गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे. पावसाळ्यात तर…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पंचायत समिती,रणसंग्राम जव्हार तालुका, जव्हार तालुका ; सरकारचे तालुक्याच्या विकासासंदर्भात अक्षम्य दुर्लक्ष, ज्या तालुक्याच्या नावाने आता नवीन जिल्हा स्थापन होणार आहे,असा हा जव्हार तालुका निसर्गरम्य तालुका आहे.तालुका डोंगर माथ्यावर वसला असल्यामुळे येथील वातावरण हे महाबळेश्वरच्या तोडीचे आहे,त्यामुळे या परिसराला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.मात्र गेल्या काही वर्षात या तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व या तालुक्याचा चेहरा मोहरा पार बदलून गेला.या परिसराला पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे.पण त्याविषयी सरकार पातळीवर कोणतीही हालचाल होऊ शकली नाही.दरम्यान तालुक्यात बांधकामांना चांगलाच वेग आला.जव्हार नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरी तर जिल्हा परिषद/ पंचायत…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२०, प्रचंड महसूल देणारा प्रभाग,पण बकाल, या प्रभागामध्ये अनेक औद्योगिक वसाहती असून हजारो तरुणांना येथे रोजगार उपलब्ध होत असतो.पण या प्रभागात स्थानिक नागरिक व चाकरमान्यांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.औद्योगिक वसाहतीमध्ये धड रस्ते नाहीत,साफसफाईची कामे वेळेवर होत नाहीत,विस्कळीत परिवहन सेवा व रिक्षाचालकांचा मनमानीपणा,आदी कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांची अवस्था ” भीक नको,पण कुत्रं आवर,” अशी झाली आहे.दर पावसाळ्यात तर या प्रभागातील नागरिकांचे हाल कुत्रे खात नाही.नियोजनशून्य औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यामुळे या प्रभागाला एकप्रकारचा बकालपणा आला आहे.या वसाहतीमधील हजारो कारखान्याकडून महानगरपालिकेला मालमत्ताकराच्या रूपाने प्रचंड महसूल मिळतो,पण त्या बदल्यात त्यांना पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. येथील…
जव्हार प्रतिनिधी, जव्हारच्या शिरोशी ग्रामपंचायतीमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन, राष्ट्रीय पोषण महिना ( १ ते ३० सप्टें. ) तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत शिरोशी येथे रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक,रोजगार सेवक,पेशा मोबीलायझर,गावातील महिला बचत गट तसेच चारही अंगणवाडींच्या सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.ऍक्शन अगेन्स हंगर या संस्थेचे प्रतिनिधी भोये यांनी रानभाज्यांचे पोषणमूल्य व मुलांच्या आरोग्यासाठी त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. तर निखंडे यांनी “आहाराचा तिरंगा,” याबाबत मार्गदर्शन करत विविध भाज्यांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.समारोप प्रसंगी सरपंच योगीता शेंडे यांनी ग्रामपंचायतीतर्फे सहभागी महिला,अंगणवाडी…
वाडा प्रतिनिधी, वाड्यात नमो विकास मॅरेथॉन उत्साहात संपन्न, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत तसेच युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी व सुदृढ,समर्थ सशक्त भारत घडवण्यासाठी सेवा पंधरवडा अभियान नुकताच वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात नमो विकास मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार व नरेश आक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपला भारत देश, खेळामध्ये सुद्धा महासत्ता बनावा,या स्वप्नाला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चळवळ सुरु केली आहे.या चळवळीला विविध माध्यमातून देशभरात उत्तम प्रतिसाद लाभत आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमो रन विषयी मार्गदर्शन करतांना युवकांनी नशेपासून दुर राहून सुदृढ भारत घडवण्याचे आवाहन करण्यात…
वाडा प्रतिनिधी, भरपावसात कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कोकाकोला या कंपनीतील कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले असून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.वारंवार सांगूनही ठेकेदार, कामावर घेण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापलेल्या कामगारांनी आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंकल चौधरी,समाधान देहाडे,रूपेश चौधरी,संजय कातवारे व प्रकाश सोनावणे अशी कुटुंबासह उपोषणास बसलेल्या कामगारांची नावे आहेत. वाडा तालुक्यातील कुडूस येथे शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत सदर कामगार अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने क्विस क्रोप प्रा. लि.या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून काम करीत होते.सदर कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या मे महिन्यापासून कामावरून काढून टाकण्यात आले…
