Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता ती वेळ निघून गेली आहे… आज अखेर अपेक्षेनुसार बहुजन विकास आघाडी व शिवसेना ( उबाठा ) गटाला गळती लागली.ही केवळ सुरुवात आहे,पुढे फार मोठे महाभारत घडणार आहे.माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्याला का सोडून जाताहेत,याचा विचार आता करून काहीही साध्य होणार नाही.मी या विषयावर दोन वर्षांपासून लिहीत होतो.पण नेतेमंडळीनी त्याची दखल घेतली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाला भाजपने अस्मान दाखवले.पण त्यानंतरही या दोन्ही पक्षात पराभवाची कारणमीमांसा व आत्मचिंतन झाले नाही.पूर्वीकाळी लोकांसमोर पर्याय नव्हता,त्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकली नाहीत.पण भाजपने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली व या दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या पायाखालची जमीन सरकली.आजपर्यंत नेतेमंडळी आम्ही ५०…

Read More

दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.३, गरजेपेक्षा अधिक पैसा आला की तो पापाला आमंत्रण देत असतो… एकेकाळी वसई विरार परिसराची ओळख,ही ” मुंबईची फूफ्फुसे,” अशी होती,ती निकामी करण्याचे पाप काही मूठभर बिल्डर्सनी केली व वसईच्या वाताहतीला सुरुवात झाली.अल्पावधीत ” ऐतिहासिक वसई,” ची ओळख ” गुन्हेगारीचे माहेरघर म्हणजे वसई,” अशी होत गेली.वसईचे नामकरण करणाऱ्या या टोळीत कालांतराने अनेक तरुण मोठ्या संख्येने सामील होत गेले.जमिनी हडप करणे,अनधिकृत बांधकामे उभारणे,या कामातून रग्गड पैसा मिळतो,हे लक्षात आल्यानंतर या टोळीत हवशे नवश्याची संख्या वाढत गेली.कालांतराने या गोरखधंद्यात पोलीस, नगरपरिषदेचे व महसूल विभागाचे कर्मचारी देखील सामील होत गेले.त्यामुळे लचके तोडण्यास वेगाने सुरुवात झाली.२००० पर्यंत वसई,नालासोपारा व…

Read More

दीपक मोहिते, ” भयावह वास्तव,” काश्मीर खोरे पून्हा अशांत होण्याच्या वाटेवर,केंद्र सरकार ठरले अपयशी, केंद्र सरकारने आजच्या दिवशी ( ५ ऑगस्ट ) वादग्रस्त ३७० कलम रद्द केले. त्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली. पण काश्मीर खोऱ्यात शांतता नांदली का ? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळते. गेल्या महिन्यात २६ निष्पाप नागरिकांची काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी दहशतवाद्द्यानी निर्घृण हत्या केली. सहा वर्षांपूर्वी केंद्रसरकारने ३७० कलम रद्द केले.त्यामुळे भारतीय जनतेने जल्लोष केला.आता खोऱ्यात शांतता नांदेल,पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार मिळेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. केंद्र सरकार देखील काश्मीर खोऱ्यात शांतता असुन पर्यटकानी मोठ्यासंख्येने काश्मीरला यावे,असे आवाहन करण्यास सुरुवात केली.पण…

Read More

दीपक मोहिते, चार वर्षांपूर्वी आदर्श सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले, श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट,शेगावचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांचे दिर्घकाळाच्या आजारपणानंतर चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निधन झाले.गेली पाच दशके भाऊंनी देवस्थानची सेवा केली.निस्वार्थपणा, पारदर्शकता सेवाभावी व देशाप्रती प्रेम, हे गुण त्यांच्या ठायी ठायी होते.गोरगरिबांना मदत,रुग्णांची सेवा व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण,आरोग्य,इ.क्षेत्रात अमूलाग्र कामगिरी त्यांनी बजावली.संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व दिले.शेगाव परिसरात आपण ते अनुभवतो.संस्थेतर्फे करण्यात येणारे अन्नदान,हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे.नीटनेटकेपणा, कामाचे योग्य व्यवस्थापन व नियोजन,यावर त्यांचा भर असायचा.कोरोना काळात संस्थेला कोविड सेंटर उभे करण्यासाठी सरकारने दहा कोटी रु. दिले.परंतु त्यांनी ते सेंटर अवघ्या दोन कोटी रु.मध्ये उभे केले व…

Read More

वसंत भोईर,वाडा शिक्षकांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली पाहीजे, सरकारी शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्याप्रति प्रामाणिक, निस्पृह व समर्पित असतात. त्यांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडली पाहीजे.,असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वारे गुरूजी यांनी चिंचघर येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात केले. गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात पुढे बोलतांना वारे गुरजीं म्हणाले,विद्यार्थ्यांच्या समृद्ध भविष्यासाठी शिक्षकांनी भेदभाव न करता केवळ त्यांच्या उज्ज्वलतेसाठी काम करावे.हेच गुरूतत्वचे खरे मर्म आहे.शाळेतील बहुभाषिक विद्यार्थी,दुर्गम भाग आणि अपु-या भौतिक सुविधा या बाबी आव्हान नसून त्याला संधी मानून काम केले पाहीजे. प्रतिकूल परिस्थितीला नावे न ठेवता,आहे ती परिस्थिती…

Read More

सुरेश काटे, तलासरी, तलासरीत मिनी मॅरेथॉन २०२५,स्पर्धेचे आयोजन, दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी आदिवासी प्रगती मंडळ तलासरी,आयोजित कॉ.शामराव परुळेकर स्मृती प्रित्यर्थ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते.या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या स्पर्धेत संस्थेच्या सर्व शाखांमधून एकूण ३४० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मिनी मॅरेथॉन प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात अशा ४ गटात घेण्यात आली. मॅरेथॉनचे उद्घाटन आ.विनोद निकोले,नगराध्यक्ष सुरेश भोये व रावजी कुऱ्हाडा यांच्या हस्ते कॉ.शामराव परुळेकर,कॉ. गोदावरी परुळेकर व स्व.कॉ.लहानू कोम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना आ.विनोद निकोले यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.ए. राजपूत,संदीप वावरे व सर्व…

Read More

वाड्यात आठवडाभर पावसाची दांडी,शेतकरी चिंतेत, वाड्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने दांडी मारली असून भात लागवड केलेली शेतजमिनी सध्या कोरड्या पडल्या आहेत.शेतजमीन पावसाअभावी सुकून भेगा पडून रोपाची मुळं तुटण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. भात लागवड केल्याच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतजमिनी पूर्णतः सुकून तडकू लागल्या आहेत.भातरोपे कोमजून गेली आहेत.याचा विपरित परिणाम भात पिकावर होण्याची शक्यता आहे.पाऊस काही दिवसात पडला नाही,तर भातशेतीचे मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते.यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून रानमाळासह डोंगरदऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हलवार भातपिकाची लागवड केली जाते.हलवार शेतजमीन ही पावसावर…

Read More

दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.२, त्यावेळी कटकारस्थाने झाली नसती तर आज हिरवीगार वसई पाहायला मिळाली असती…. त्यावेळी तयार करण्यात आलेला प्राधिकरणाचा विकास आराखडा काही आर्किटेक्टस यांनी मिळवला,त्यातील तरतुदीचा बारकाईने अभ्यास केला.हा विकास आराखडा वसई/विरार उपप्रदेशाला हानिकारक असल्याचे त्यांचे ठाम मत बनले.प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपप्रदेशाची भौगोलीक रचना लक्षात न घेता तसेच वातानुकूलित कार्यालयात बसून तयार केला होता.तसा आरोप देखील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी केला होता.सरकारने या आराखड्यात चांगलीच हातचलाखी करत बराचसा हिरवा भाग घरबांधणीसाठी मोकळा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप अनेक सामाजिक संघटनांनी केला,त्यानंतर वसईकर नागरीकामध्ये असंतोष खदखदू लागला. पाणी,सांडपाणी निचरा, मल:निसारण,डंपिंग ग्राउंड,प्रशस्त रस्ते,इ.पायाभूत…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरीत मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे, तलासरी भागात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असून ही जनावरे महामार्गांवर तसेच गावागावातील रस्त्यावर फिरत असतात,तसेच रात्रीच्या सुमारास रस्त्यावर बसत असतात.त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या वाहनामुळे या जनावरांचा अपघात होतो. महामार्गावर या मोकाट फिरणाऱ्या जनावरामुळे गेल्या काही वर्षात अनेक अपघात होऊन वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गाच्या परिसरातील हिरवा चारा खाण्यासाठी ही जनावरे दिवस रात्र फिरत असतात.या मोकाट फिरत असलेली जनावरे अपघातात मृत्यूमुखी पडू नयेत,यासाठी या मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पिवळे पट्टे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून गळ्यातील रेडियम पट्टे चमकून रात्री वाहन चालक सावध होतील व अपघात…

Read More

जव्हार, प्रतिनिधी, आदिवासी कोकणा जमात सत्कार सोहळा संपन्न, आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान, पालघर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सन २०२३ ते २०२५ या कालावधीत शासकीय सेवेत रुजू झालेल्या कोकणा समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच आचार्य भिसे हायस्कूल कासा येथे उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,जयपाल मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये,आदिवासी समाजातील पालघर जिल्ह्यातील पहिले सनदी अधिकारी डॉ.अजय…

Read More