Author: दीपक मोहिते

सुरेश काटे,तलासरी तलासरीत दहीहंडी उत्सव उत्सहात साजरा, तलासरीत आज दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.तलासरीतील वनवासी कल्याण आश्रमच्या मुलीं,मुलांचे तसेच वसतिगृह मुलांचे गोविंदा पथक यांनी गावात नागरिकांनी तसेच राजकारण्यांनी बांधलेल्या दहीहंड्या फोडल्या.यावेळी डहाणू विधानसभा मतदार संघांचे आ.विनोद निकोले, माजी आ.श्रीनिवास वनगा, , पंचायत समिती माजी उप सभापती नंदकुमार हडळ, तलासरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, उप नगराध्यक्ष सुभाष दुमाडा, तलासरी तहसीलदार अमोल पाठक,पोलीस निरीक्षक अजय गोरड तसेच नगर सेवक,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तलासरी नाक्यावर माकपाच्या स्टुडन्ट फेडारेशनच्या दहीहंडी उत्सवात सर्व सहभागी गोविंदा पथकांना पारितोषिके तसेच आ.विनोद निकोले यांनी प्रत्येकी पाच हजाराचे प्रोत्साहन पारितोषिके,तसेच शिवसेना…

Read More

सचिन जोशी,वसई वसई विरार शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे “ स्वातंत्र्य दिन,” मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांतर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत व राज्यगीत म्हणण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेच दीपप्रज्वलन करून वंदन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास आ.राजन नाईक,माजी आ.हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितीज ठाकूर,माजी महापौर राजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत,उपायुक्त तसेच माजी सभापती,माजी नगरसेवक, माजी नगरसेविका,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस विभागातील कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी,पत्रकार,नागरिक व इतर…

Read More

सचिन पाटील,विरार वसई विरार शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु, अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करण्यासाठी वसई विरार शहर महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर पावले उचलण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. वसई विरार शहरात खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले असून या आठवड्यात आतापर्यंत ८५४ खड्डे खडीकरण डांबरीकरणाने बुजवण्यात आले आहेत.वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून खड्डेमुक्त प्रवासाचा चांगला अनुभव देण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read More

सुरेश वैद्य,पालघर जव्हार येथे २० ऑगस्ट रोजी जनता दरबाराचे आयोजन, वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २0 ऑगस्ट रोजी सकाळी ११. ०० वाजता जव्हार येथील शासकीय विश्राम गृह समोर असलेल्या रेड सॉईल रिसॉर्ट येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.या जनता दरबारामध्ये नागरिकाच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक नागरिकाशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करुन घेण्यासाठी जव्हार येथे २० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे. या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्याच्या दहीहंडी उत्सवात मराठीचाच जागर… मराठी हिंदी भाषा वाद सुरू असून मनसे व शिवसेनेने हा मुद्दा महत्वाचा केला असतानाच आज झालेल्या दहीहंडी उत्सवावातही मराठीचा जागर पहावयास मिळाला.आम्ही नारेकर गोविंदा पथकाने ” महाराष्ट्रात फक्त मराठी “असे फलक झळकावून मराठीचा जागर केल्याचे पहावयास मिळाले. दही हंडी उत्सव आज देशभर साजरा केला जात असुन शहराप्रमाणे ग्रामीण भागातही या उत्सवात गोविंदा पथकांना हजारो रू.ची बक्षीसे ठेवण्यात आली होती.कुडूस येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गोविंद पाटील यांच्या नवनिर्माण कला क्रिडा व सामाजिक संस्थेच्या मानाच्या दहीहंडी उत्सवात ६१ हजार रू.चे प्रथम तर महिलांसाठी ११ हजार रू.चे बक्षीस ठेवण्यात आले होते.भाजपातर्फे मंगेश…

Read More

दीपक मोहिते, ” करदात्याच्या पैश्याची लूट,” वसई विरार शहर मनपा ; नालेसफाई व कचरा उचलणे,या दोन्ही कामाची ईडीने चौकशी करावी… वसई विरार शहर महानगरपालिकेचा भ्रष्ट माजी आयुक्त हा सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.४१ अनधिकृत इमारती बांधकाम,वसुली व त्याच्याकडे सापडलेली गडगंज संपत्ती,या अशा तीन प्रकरणी हा माजी आयुक्त व त्याचे कुटुंब सध्या अडचणीत आले आहेत.न्यायालयाने त्यांच्यासह अन्य चार जणांना २० ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी सुनावली आहे. त्याच्या या चौकशीची कार्यकक्षा कोणकोणत्या विभागापर्यंत विस्तारल्या आहेत,ते यथावकाश म्हणजे आज ना उद्या माध्यमांना कळू शकेल.सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये कचरा व्यवस्थापन व नालेसफाई,या दोन ज्वलंत प्रश्नाचा समावेश आहे की नाही,हे…

Read More

वाड्यात ८ कि.मी.लांबीच्या रस्त्याची झाली दुरुस्ती, वाडा तालुक्यातील निंबवली – पालसई रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले होते.त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहन चालक हैराण झाले होते.रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी भाजपचे पालघर उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर व माझी सभापती अरुण गौंड यांनी पुढाकार घेतला.त्यांनी स्थानिक खदाण मालकांच्या मदतीने ८ कि.मी. रस्त्याची खड्डे भरले. तालुक्यातील निंबवली- पालसई हा रस्ता प्रचंड रहदारीचा असुन अनेक गावांना व बाजारपेठेस जोडणारा मुख्य रस्ता आहे.या रस्त्यावर प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.तसेच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.सदर बाब लक्षात घेऊन येथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता खड्डे भरून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अखेर त्या २९ गावांचा तिढा सुटला… काल अखेर राज्याच्या नगरविकास विभागाने वसई तालुक्यातील २९ गावांचा तिढा मार्गी लावला.ही गावे महानगरपालिकेतच राहणार असल्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.त्यामुळे गेली पंधरा वर्षे वादात अडकलेल्या प्रश्नाचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला आहे.गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या मूठभर लोकांची तोंडे आता बंद झाली आहेत. राज्य शासनाने आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करून गेल्या २४ फेब्रु.२०२४ रोजी या विषयावर अधिसूचना प्रसिद्ध केली व नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या.त्या सूचना व हरकतीवर कोकण विभागीय आयुक्तांनी नुकतीच सुनावणी घेतली व आपला अहवाल नगरविकास विभागाला सादर केला होता.सदर अहवाल विचारात घेऊन राज्य सरकारने ही २९…

Read More

दीपक मोहिते, जाज्वल्य देशाभिमानच देशाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो… आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.स्वातंत्र्याच्या आठ दशकात आपल्या देशाची झालेली वाटचाल वाखणण्याजोगी नसली तरी समाधानकारक आहे.सुरुवातीच्या काळात अनेक आघाडीवर बलाढ्य देशानी आपली कोंडी केली.अन्न-धान्य,संरक्षण,परराष्ट्र धोरण,शिक्षण,आरोग्य व आर्थिक धोरण इ.क्षेत्रात मागासलेपणा होता.परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही.वरील सर्व क्षेत्रात आता आपण स्वंयपूर्ण झालो आहोत,ही अभिमानाची बाब असून प्रत्येक भारतीयाने आज आपल्या तिरंग्याला सलाम करायलाच हवा.अठरापगड़ जाती-जमाती,विविध भाषा व संस्कृती,प्रचंड लोकसंख्या असलेला लोकशाहीप्रधान देश,अशी आपली जगभरात ओळख आहे.हे सारे एकसंघ ठेवून राज्यकारभार चालवण्याची किमया आपल्या राज्यकर्त्यानी यशस्वीरित्या करून दाखवली,याची नोंद घ्यायलाच हवी. गेल्या ७९ व्या वर्षात देश विकसनशील देशाच्या रांगेत…

Read More

सचिन सावंत,वसई, वसईत नविन भूमिगत २२ के.व्ही.वाहिनीचे लोकार्पण, २२०/२२ के.व्ही.नालासोपारा उपकेंद्र ते २२ के.व्ही.पोमण स्विचिंग स्टेशन,पोमण इनकमर-२ या नविन भुमिगत २२ के.व्ही. वाहिणीचे उद्घाटन आज वसई विधानसभेच्या आ.स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पोमण स्विचिंग स्टेशन,रॉयल हब इंडस्ट्रीज,पोमण ता.वसई येथे संपन्न झाले. या स्विचिंग स्टेशनमुळे वसई विरार परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम,स्थिर व अखंड राहणार असून उद्योग क्षेत्रासोबतच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सोहळ्याला महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा,महावितरण वसई मंडळ अधिक्षक अभियंता संजय सु. खंडारे,कार्यकारी अभियंता प्रविण सूटे,अति.कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख,कनिष्ठ अभियंता इरफान शेख,पोमण ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू म्हात्रे,वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष…

Read More