- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, समाज माध्यमावर धुमाकूळ ; ” चलता है,चलने दो,” प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर अर्वाच्च भाषेत टीका टिप्पणी करत असतात.वास्तविक ही टीकाटिप्पणी मतदारांसाठी मनोरंजनाचे साधन असते.मतदार त्यावरून आपले ” मत कोणाला ? ” हे ठरवत नसतो.पण कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र सतत वाढत असतो.एकीकडे अशाप्रकारची धुमश्चक्री सुरू असताना दुसरीकडे नेतेमंडळी मात्र निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज व विजयाची गणिते जुळवण्यात गर्क असतात.वसईत सध्या तेच चालले आहे. समाजमाध्यमावर कार्यकर्ते सध्या एकमेकांची उणी दुणी काढण्यात धन्यता मानत आहेत.टीका टिप्पणीचा हा खेळ निवडणूक होईस्तोवर चांगलाच रंगत असतो.एकदा का निवडणुका संपल्या कि जेवणातील कडीपत्याना जसे ताटाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो,तसे या कार्यकर्त्यांचे होत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मराठा समाजाच्या मोर्च्याची फलनिष्पत्ती कशी असेल,हे सांगणे कठीणच आहे, सात वर्षांपूर्वी एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाना शिक्षा व्हावी,यासाठी मराठा समाज एकवटला होता व त्यांनी मुंबईत न भूतो न भविष्यती,अशा क्रांती मोर्चा काढला होता.या मोर्चात सुमारे दीड लाख लोक सामील झाले होते.या प्रकरणी आम्हा मराठ्यासह अन्य समाज बांधवांच्या भावना देखील तीव्र होत्या.या मोर्च्यादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.पोलीस यंत्रणेवरही ताण पडला नाही.त्यावेळी मुंबईच्या नागरिकांना या मोर्च्याच्या रूपाने शिस्तबद्ध,संयम व शांतता,असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला.या घटनेची दखल जगभरातील देशांनी घेतला.मराठा समाज आक्रमक असला तरी तो कधीच स्वकीयाविरोधात नसतो,हे या समाजाच्या आजवरच्या वाटचालीवरून सिद्ध झाले आहे.पूर्वजांनी समाजावर केलेले संस्कार,समाजात…
वसंत भोईर,वाडा, गणरायाच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न आराध्य दैवत गणरायाचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे.शिवाय यावर्षी गणेश उत्सवाला महाराष्ट्र उत्सवाचा अर्थात राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यानुसार गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, हा विघ्नहर्ता ज्या मार्गावरून घरी येणार आहे, किंवा त्याचे भक्त ज्या मार्गावरून ये-जा करणार आहेत.त्या मार्गावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे गणरायाच्या मार्गातील विघ्न कायम आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वाडा -भिवंडी- मनोर या मुख्य रस्त्यांसह तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची ही प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे,हे समजणे मुश्किल होऊन बसले आहे.मुख्य रस्त्यावर गुडघाभर मोठ-मोठे खड्डे पडल्याने…
जव्हार, प्रतिनिधी जव्हार पोलीसातर्फे नियोजन बैठक संपन्न, गणेशोत्सव २०२५ शांततेत,सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी पालघर जिल्हा पोलीसातर्फे जव्हार शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृह जव्हार येथे नियोजन सभा पार पडली. सदरनियोजन बैठक पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ( जव्हार ) एस.एस.महेर व पोलीस निरीक्षक ( जव्हार ) विजय मुर्तडक यांनी उपस्थित राहून गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शन केले.या बैठकीस तहसीलदार, नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,जव्हार नगरपरिषद प्रतिनिधी, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग,पोलीस पाटील,तसेच परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी,…
वसंत भोईर, वाडा वाडा येथे प्रदूषणकारी टायर कंपनीच्या परवानगीचा उफाळला वाद, तालुक्यातील कोनसई या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आशा इंड्रस्टीज या टायर कंपनीने परवानगी मागीतली होती.या परवानगीच्या ठरावाला ग्रामस्थांचा सक्त विरोध असताना राजकीय दबावापोटी ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी ती देण्याची तयारी चालवली होती.त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना काही तास ग्रामपंचायत कार्यालयात घेराव घातला.ग्रामस्थ आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रदूषणकारी कंपनीला देण्यात आलेल्या परवानगीमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील कोनसई या गावातील नागरिकांनी ग्रामसभेत प्रदूषणकारी कंपन्या कायमच्या बंद करण्याकरिता व भविष्यामध्ये प्रदूषण कारी कंपन्याना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव क्रमांक १ (…
दिपक मोहिते, भान असायला हवे, …अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आहे, गेल्या आठवड्यात वसई तालुक्यात अतिवृष्टी होऊन वसई,विरार व नालासोपारा या तीन महानगरात हाहाकार उडाला.अनेकांच्या घरात,दुकानात पाणी शिरले व सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान व हाल झाले.या दुर्देवी प्रसंगात तालुक्याचे जनजीवन तीन ते चार दिवस पार विस्कळीत झाले.सध्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे या महानगरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशा या अस्मानी संकटात सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असताना सोशल मिडियावर एक व्हिडियो क्लिप व्हायरल झाली व लोकांच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले.नालासोपारा पूर्व भागात असलेल्या एका गटारामधून सांडपाणी निचरा न झाल्यामुळे लोकांच्या घराघरात पाणी शिरल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.स्थानिक पातळीवर काम करणारी गाव संघर्ष…
दिपक मोहिते, महायुतीमध्ये मिठाचा खडा, भाजपने प्रकाश निकम याना पक्षात घेऊन शिंदे गटावर एकप्रकारे सूडच उगवला, गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते व पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन चांगलाच सूड उगवला आहे.त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक नेत्यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे.त्यांच्या जिल्हाप्रमुखानी भाजपने असे फोडाफोडीचे राजकारण,यापुढे असेच सुरू ठेवल्यास आम्हीही त्याला जसेच्या तसेच उत्तर देऊ,अशी थेट धमकी दिली आहे. पालघर येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अशाप्रकारची धमकी दिली.पण त्यावर भाजपकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. राज्यात महायुती असली असली तरी स्थानिक पातळीवर शिंदे गट व भाजपचे…
सुनील पाडवी,वसई मध्यरात्री धुमाकूळ घालणाऱ्या बारवर वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांची धाड, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान आ.स्नेहा दुबे पंडित यांनी दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली. यावेळी मॉलमधील विंग्स ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे डिजेच्या कर्णकर्कश आवाजात धुमाकूळ सूरू होता.तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मध्यरात्री २.३० वाजता हे बार कायदा मोडून सर्रासपणे सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. या संदर्भात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. “आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही, मात्र कायदा मोडून रात्री २.३०…
सचिन पाटील,वसई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.दुबे-पंडीत यांची मध्यरात्री रस्त्यांची पाहणी, आज वसईच्या आ.स्नेहा दुबे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री प्रत्यक्ष प्रत्येक स्थळांवर भेट देऊन रस्त्यांच्या पॅचवर्क,पेव्हर ब्लॉक व दुरुस्ती कामांची पाहणी केली. यामध्ये १ ) अग्रवाल नाका परिसर,२ ) स्टार सिटी जूचंद्र, ३ ) वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व व ४ ) वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन वसई पूर्व या रस्त्यांचा समावेश होता.रात्री १.०० वाजता सुरु झालेला पाहणी दौरा पहाटे ०४.०० वाजेपर्यंत सूरू होता.या दरम्यान अखंड पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. कामाची गती व गुणवत्ता तपासून नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने आणि…
वसंत भोईर,वाडा आठ दिवसांच्या अतिवृष्टीने भातशेतीचे मोठे नुकसान वाड्यात गेले आठ दिवस विश्रांती न घेता धो-धो कोसळणा-या पावसाने अखेर आज उसंत घेतली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना आज सुर्यदेवाचे दर्शन झाले. गेले आठ दिवस सतत मुसळधार कोसळणा-या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.या अस्मानी संकटात शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.नदी,नाले,ओहोळ तुडूंब भरून दुथडी भरून वाहत असल्यामुळे येथील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते.भातलागवड करण्यात आलेल्या शेतजमिनीला अक्षरश : पुराने विळखा घातला होता.आठ दिवस शेतजमीन पाण्याखाली राहील्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम भातशेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक शेतकऱ्यांची भात लागवड कुजून वाया गेली.शासनाने नुकसानीचे तातडीने…
