- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर, वाडा वाडा तालुक्याच्या खानिवली गावात किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग, तालुक्यातील खानिवली गावातील ” जय हरी प्रसाद किराणा अँड जनरल स्टोअर्स, ” या दुकानाला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून या आगीत लाखो रू.चे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे ही आग अपघाती नसून कोणीतरी लावली असावी,असा संशय दुकान मालकाने व्यक्त केला आहे, मिळालेल्या माहितीनुसार,खानिवली बाजारपेठेत ‘ जय हरी प्रसाद किराणा अँड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून या दुकानात खाद्यपदार्थ,किराणा साहित्य,रोजच्या वापराच्या घरगुती वस्तू,जनरल वस्तू तसेच काही महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री होत असते.काल रात्री दुकानाला अचानक आग लागली,आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण…
वसंत भोईर,वाडा भिवंडी – वाडा रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने थांबवले, भिवंडी – वाडा रस्त्याचे काम गेल्या चार पाच दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत,निधी मिळाला नसल्याने हे काम बंद असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.शासन व ठेकेदार कंपनीमुळे प्रवासी व सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे.या प्रकारामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या सिमेंट क्राॅकीटीकरणाचे काम ईगल या ठेकेदार कंपनीला मिळाले असून यासाठी ८०२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कंपनीने हे काम सुरू केले असून तानसा पुल ते कुडूस या दरम्यानचे काम काही टप्पे वगळता पुर्ण झाले आहे.तर शिरीष पाडा ते वाडा खंडेश्वरी नाकापर्यंत…
सुरेश काटे,तलासरी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात ; अकृषिक जमिनीचा बेकायदेशीर वापर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असताना,तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आदिवासी आणि बिगर-आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका ‘ ” गोळा प्लॉट,” मधील जमीन बिगर-आदिवासी खातेदाराने, मे. साई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीशिवाय तिचा व्यवसायिक वापर करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशेषतः आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून,…
दीपक मोहिते, ” विचारमंथन,” स्व.आ.गणपतराव देशमुख ; असा लोकप्रतिनिधी आता होणे नाही, गणपतराव देशमुख,हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून पाच दशके निवडून गेले.चार वर्षांपूर्वी ३० जुलै २०२१ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व.आ.गणपतराव देशमुख हे राज्यातील सर्वात वयस्कर आमदार होते.निधन समयी गणपतराव देशमुख ९४ वर्षांचे होते.गणपतराव देशमुख यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूका जिंकल्या.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून येत असत.तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल बारा वेळा विजयी झाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. २००९ च्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” मुन्नी बदनाम हुई,” बलात्कार आता थांबायला हवेत… ” मुन्नी बदनाम हुई,” हे गाणे जसे सिने रसिकांच्या पसंतीला उतरले,त्या पार्श्वभूमीवर ” हमारी मनपा हुई बदनाम,करदाते हुए कंगाल,बाकी सारे हुए मालामाल,” हे नवीन गाणे लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे. आमची ही ” मुन्नी,” जन्माला आल्यापासून बिचारी बदनाम होत आली.राजकारणी,अधिकारी,ठेकेदार यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. त्यामुळे ती सध्या व्हेंटिलेटर पोहोचली आहे.तिची प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर असताना अनिलकुमार पवार नावाचा व्हायरस दाखल झाला.या व्हायरसने मुन्नीला छीन्नविछिन्न करण्याचा जणू विडाच उचलला.त्यापूर्वी जे काही लहान मोठे व्हायरस सक्रिय होते,त्याची मोलाची साथ या व्हायरसला मिळाली आणि आमची मुन्नी आज अत्यावस्थेत व्हेंटिलेटरवर पोहोचली आहे.तिला…
वसंत भोईर, कौटुंबिक वादातून काकीनेच दिली पुतण्याला मारण्याची सुपारी, वाडा शहरातील आगरआळी या भागात राहणाऱ्या ऋषिकेश मनोरे या तरूणावर काल अज्ञात हल्लेखोरांनी रात्री साडेआठच्या सुमारास घरी जात असताना जैन मंदिराजवळ उभ्या असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात तो गंभीर जख्मी झाला.त्याच्यावर सध्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारा सूरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. सुशांत चिडे, तुषार मनवर, यश करंजे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाॅरेन्सीक व्हॅन व अंगुली मुद्रा तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.सदर गुन्ह्य़ाचे घटनास्थळी असलेले साक्षीदारंकडे पोलिसांनी विचारणा केली व शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.त्यामध्ये मोटारसायकलवरून तीन…
दीपक मोहिते, करदात्यांची हलाखीची परिस्थिती, फक्त अलीबाबा गजाआड होऊन चालणार नाही,तर रांजणात लपून बसलेल्या ४० चोरानाही पकडा… सर्वसामान्य नागरिकांच्या हजारो कोटी रु.चा चुराडा करणाऱ्या माजी आयुक्त अनिलकुमार पवार याला काल आपल्याच घरात चोरासारखे लपून बसावे लागले.यालाच आपण नियतीचा खेळ असे म्हणतो.आंदोलनातील नेत्यांना आपल्या कार्यालयात प्रवेश करू न देणाऱ्या या भ्रष्ट माणसाला आयुष्यभराचा धडा मिळाला.सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून त्याला ताब्यात घेतले व सलग दहा ते बारा तास त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.या भडीमारात तो व त्याचे कुटुंबीय पार कोसळून गेले होते.महानगरपालिकेची ९०० कोटीची एफडी कोणी तोडली व ते पैसे कुठे गेले ? याची चौकशी केली पाहिजे.तसेच आपल्या कार्यकाळात कोणकोणत्या बिल्डर्सवर…
दीपक मोहिते, आणखी एका अति. आयुक्तांचा गळा आवळला जाणार…. अखेर आज वसई विरार शहर महानगरपालिकेत दुसरी महत्वाची विकेट पडली.आयुक्त अनिलकुमार पवार यांची नुकतीच बदली झाली होती.त्यानिमित्ताने काल त्यांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.या समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी भले पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा गळा आवळला.यापूर्वी आयुक्त राठोड यांचीही पवार यांच्यासारखीच सत्कार सोहळ्याच्या दिवशीच नगरविकास विभागाने गळा आवळला होता.त्यांचा निरोपसंमारभ ज्या दिवशी आयोजित करण्यात आला होता,त्याच दिवशी त्यांच्या हाती निलंबनाची नोटीस पडली.त्यामुळे ते समारंभ स्थळी फिरकले नाहीत.बिचारे त्यांचे चाहते कित्येक तास ताटकळत उभे राहून अक्षरशः कंटाळून गेले होते.त्यानंतर मनपा प्रशासनाने तो कार्यक्रम सरळ गुंडाळून टाकला होता.वास्तविक अनिल पवार या महाभागाने गेल्या तीन वर्षात…
वाड्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण….. पहील्या श्रावण सोमवारी भाविकांची शिवमंदिरात मोठी गर्दी, वसंत भोईर,वाडा यंदा श्रावणाची सुरुवात गेल्या शुक्र.पासून झाली असून आज पहील्या सोमवारच्या निमित्ताने शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी कुडूस,कोंढले,नारे, घोडमाळ,नागनाथ मंदिर व तिलसेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त मध्यरात्री पासूनच अभिषेक व सर्पदर्शन घेण्यासाठी शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती.शिवभक्तांना त्रास होऊ नये,म्हणून ग्रामस्थ व मंदीर प्रसानाने विशेष खबरदारी घेतली होती.पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त वाडा तालुक्यातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजून गेली होती.भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार सर्वात महत्वाचा मानण्यात येतो.पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, डमरु आणि शंखनाद करण्यात आला.दर्शनासाठी…
दीपक मोहिते, ” जनतेच्या पैश्याची उधळपट्टी,” तीन इंजिनच्या निर्लज्ज सरकारने राज्य भिकेला लावायचे ठरवले आहे… ” गतिमान सरकार,” व ” महाराष्ट्र आता थांबणार नाही,” अशा दोन गोंडस टॅगलाईनचा आधार घेत देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेच्या पैश्याची कशी उधळपट्टी चालवली आहे,हे ” मुख्यमंत्री लाडकी बहीण,” योजनेतील गैरव्यवहारातुन समोर आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीन इंजिन सरकारने ” मुख्यमंत्री लाडकी योजना,” धुमधडाक्यात सुरू केली.अपेक्षेप्रमाणे सरकारला त्या निवडणुकीत प्रचंड फायदा झाला.पण आता या योजनेत झालेले आर्थिक घोटाळे पाहून दस्तुरखुद्द फडणवीस देखील चक्रावून गेले आहेत. ही योजना बहिणीसाठी लागू असताना १४ हजार २८९ लाडक्या भावांनी २१ कोटी रु.वर डल्ला मारत सरकारला…
