Author: दीपक मोहिते

वसंत भोईर, वाडा वाड्यात हळवार भातपिक कापणीला जोमाने सुरुवात, जिल्ह्यातील भातपिक कापणीस तयार झाले असून वाडा तालुक्यातील शेतक-यांनी हळवार भातपिक कापणीला जोमाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळवार भातपिकाची लागवड करीत असतात.हे भातपिक ९० ते ११५ दिवसांच्या कालावधीत कापणीस तयार होत असते.हळवार भातपिक कापणीची ( लाणी ) लगबग सुरु असून येथील शेतकऱ्यांना अद्याप पावसाची भीती सतावत असल्यामुळे भातकापणीच्या ( लाणी ) काही नैसर्गिक नियमांना बगल देत कापणी सोबत एका बाजुला घाईघाईने झोडणीच्या कामालाही सुरुवात केली आहे.लहरी पावसाचा काही नेम नसल्याने तो कधीही पडू शकतो.या अशा भीतीच्या सावटाखाली शेतकरी असून प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेत तात्पुरत्या स्वरुपाचे शेतखळे तयार करून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकनाथ शिंदे गटाची अवस्था सध्या ” इकडे आड,तिकडे ईडी,” अशी झाली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या भाषणात अचानकपणे ” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीमध्ये शक्यतो सोबत लढू,पण जेथे शक्य होणार नाही,तेथे समोरासमोर लढू, ” असे सांगत महायुतीमधील घटक पक्षांना एकप्रकारे गर्भित इशाराच दिला आहे.फडणवीस यांचे मुंबई,ठाणे,नवी मुंबई,छत्रपती संभाजीनगर व पुणे,या चार महानगरपालिकांवर कावळ्याची नजर आहे.कोणत्याही परिस्थितीत सोन्याची अंडी देणाऱ्या या चार महानगरपालिकेच्या सत्तेत इतर कोणी वाटेकरी होता कामा नये,यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेता,त्यांना बऱ्यापैकी यश मिळण्याची शक्यता आहे.या प्रयत्नात त्यांना जर चांगले यश…

Read More

दीपक मोहिते, शह -प्रतिशह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ; भाजप कामाला लागला… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करील,अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती.गेल्या सात दिवसापासून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लागलेल्या रांगा,लक्षात घेता तो अंदाज आता खरा ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.काल वसई व पालघर जिल्ह्यात भाजप व शिवसेनेने ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षांनी ” इनकमिंग इव्हेंटस,” चे आयोजन केले होते. गेल्या तीन महिन्यात भाजपने इतर पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याना प्रवेश देऊन पक्षफोडीला सुरुवात केली आहे.हे करत असताना,भाजपने महायुतीमधील आपला सहकारी पक्ष शिवसेनेलाही लक्ष्य केल्यामुळे शिंदे यांच्या गटात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेती उध्वस्त ; सरकार मात्र साखरझोपेत… गेल्या महिन्यात राज्याभरात झालेल्या अतिवृष्टीमध्ये राज्याच्या सुमारे बारा ते जिल्ह्यातील ७६ लाख हेक्टर जमिनीवरील शेती आडवी झाली.अंदाजे ७ लाख शेतकरी या अस्मानी संकटात देशोधडीला लागले.पण,सरकार मात्र आपल्याच धुंदीत असल्याचे पाहायला मिळत आहे.इतके असंवेदनशील सरकार आजवर तुम्हा आम्हाला पाहायला मिळाले नाही.शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या अस्मानी संकटावर उपाययोजना करण्याकामी सरकारमधील तीन प्रमुख घटक पक्षात समन्वय व एकवाक्यता नाही.त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था ” भीक नको,पण कुत्रं आवर,” अशी झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हे या अस्मानी संकटाकडे इव्हेंटच्या दृष्टिकोनातून पाहतात,ही बाब दुःखदायक आहे.राजाने जर ताळतंत्र सोडले तर रयतेने कोणाकडे बघायचे ? अशी अभूतपूर्व…

Read More

दीपक मोहिते, विरार पूर्व मनवेलपाडा येथे कोकण महोत्सवाचे आयोजन, बहुजन विकास आघाडी,श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्यातर्फे आर्टिवल फाउंडेशन यांच्या सहकार्याने रवि.१२ ते बुध.२२ ऑक्टों. २०२५ या कालावधीमध्ये ” आम्ही विरारकर,” कोकण महोत्सव व खास दीपावलीनिमित्त दिवाळी बाजारपेठेचे मनवेलपाडा तलाव,विरार पूर्व येथे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आम्ही विरारकर कोकण महोत्सवात पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धाची रेलचेल आहे. वरील नमूद विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रशांत राऊत कार्यालय, ९९२३७०९१९१, प्रशांत लाड ७३७८९२११४१, निकिता सामंत, ८६९८९९४४४२,या क्रमांकावर संपर्क साधावा. महोत्सवात आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रोज सायं.७.०० वा.सुरू होणार आहेत.काही कारणास्तव कार्यक्रमाच्या वेळेत…

Read More

दीपक मोहिते, इनसाईड स्टोरी, व्हेनेझूएलाच्या मारिया कोरीना मचाडो यांना २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान, नॉर्वेजियन नोबेल समितीने २०२५ सालचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरीना माचाडो यांना देण्यात आला आहे.हा सन्मान त्यांना “ लोकशाही हक्कांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल,” आणि “ हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे शांततामय वाटचाल करण्यासाठी २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना माचाडो या कोण आहेत ? समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की “ २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार धैर्यवान आणि निष्ठावान स्त्रीला दिला जात आहे,ज्यांनी अंधाराच्या काळातही लोकशाहीची ज्योत प्रज्वलित ठेवली.” घोषणेनंतरपूर्वी काही माध्यमांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळू शकतो,अशी…

Read More

वाडा प्रतिनिधी, बससेवा झाली सुरू,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत क्षेत्रातील निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.हा रस्ता यंदाच्या पावसाळ्यात पूर्णपणे खड्ड्यात गेला असून त्यामुळे बससेवा बंद झाली होती.सदर बससेवा तत्काळ सुरू करण्यात आली,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” अशीच असून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्ती करण्यास चालढकलपणा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत व ठाकूरपाडा असे दोन पाडे आहेत.या पाड्यावर बससेवा होती.मात्र हा रस्ता पावसाळ्यात खड्ड्यात गेला असून रस्त्यावर जागोजागी दोन ते अडीच फुटांचे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या महामार्गावरील बससेवा बंद करण्यात आली.मात्र रस्त्याच्या दुर्दशेबाबत व शाळेत जाणा-या विद्यार्थाची…

Read More

दीपक मोहिते, भाजपला रोखणे,ठाकरे बंधूंना शक्य होणार नाही,बविआ देखील सध्या संभ्रमावस्थेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राज्यस्तरावर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना,या दोन पक्षात युती होण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे.या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) सोबत घेण्यासंदर्भात सेनेचे नेते खा.संजय राऊत प्रयत्नशील आहेत.तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मात्र मनसेला सोबत घेऊन निवडणुका लढण्यास तयार नाही.त्यामुळे आजच्या घडीला भारतीय राष्ट्रीय पक्ष स्वबळावर रिंगण्यात उतरण्याच्या तयारीत आहे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील या दोघा ठाकरे बंधू सोबत जातील,असे वाटत नाही. या सर्व घडामोडीकडे भाजप मात्र बारकाईने पाहत असून सेना – मनसे यांचे एकत्र येणे,हे…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम २०२५, पालघर जिल्ह्यात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलीच हवा दिली आहे.काल विविध पक्षाचे दोन ते हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख भरत रजपूत,खा.डॉ.हेमंत सवरा व आ.हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते.आजचा हा प्रवेश सोहोळा हा आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्षासह विरोधकांना इशारा देणारा असल्याचे मानले जात आहे.या सोहोळ्यानंतर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला उत येण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सारे राजकीय पक्ष सावध झाले आहेत. मुंबईला लागून असलेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्ली प्रचंड तणावाखाली आहेत… सहकारी मंत्र्यांच्या उचापतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तणावाखाली आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटील कारस्थानामुळे हवालदिल झालेले शिंदे गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांचे वडील रामदास कदम या दोघांमुळे सध्या प्रचंड तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.आज सकाळपासून योगेश कदम हे शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याच्या आवारात गेल्या दोन तासापासून ताटकळत बसले आहेत.पण,शिंदे काही पहिल्या मजल्यावरून खाली आले नाहीत.शिंदे हे कदम पितापुत्रावर प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात आपल्या विरोधात असलेले खटले तसेच मंत्रिमंडळात फडणवीस यांचे दबावाचे राजकारण,अशा द्विधा मनस्थितीत असताना कदम पितापुत्राच्या…

Read More