- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
वाडा प्रतिनिधी, महाविकास आघाडीचा करवाढीविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा, वाडा नगरपंचायतीतर्फे निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीशा बजावण्यात आल्या असून पूर्वीच्या करापेक्षा दुप्पट तिपटीने करवाढ केली आहे.या वाढीव करवाढीचा बोजा नागरिकांना पडणार असल्याच्या निषेधार्थ व कर वाढ रद्द करावी,या मागणीसाठी आज महाविकास आघाडीतर्फे वाडा नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.वाढीव करवाढ रद्द न केल्यास दिवाळी सण नगरपंचायत कार्यालयात साजरी करू,असा इशारा नेत्यांनी प्रशासनाला दिला. वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली व दुय्यम दर्जाची ग्रामपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबत वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता अशा अतिरिक्त करामध्ये वाढ झाली आहे.अचानक झालेल्या करवाढीमुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.…
दीपक मोहिते, आम्हाला पैश्याची उधळपट्टी करणारी मॅरेथॉन स्पर्धा नको,आम्हाला दर्जेदार नागरी सुविधांची गरज आहे… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेची १३ वी मॅरेथॉन स्पर्धा प्रशासनाने तात्पुरती स्थगित केली आहे.मनपा प्रशासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी याविषयी करदात्यांच्या मनात अनेक प्रश्नाचे काहूर उठले आहे.आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ते कारण खरं नाही.तालुक्यातील रस्त्याची झालेली पार दुर्दशा हे कारण,या निर्णयामागे असावा,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक ही मॅरेथॉन स्पर्धा आर्थिकदृष्ट्या बोजवारा उडालेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला परवडणारी नाही.पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गेली बारा वर्षे या स्पर्धेवर कोट्यवधी रु.ची उधळपट्टी झाली.गेल्या बारा वर्षात…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आपला देश कधीही ” आत्मनिर्भर,” होऊ शकणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परकीय नागरिकांसंदर्भात जी काही भूमिका घेतली आहे,ती त्यांच्या देशाच्या हिताची आहे. आज त्यांच्या देशात लाखो आशियाई स्थायिक झाले आहेत.त्याचा परिणाम रोजगार व त्यांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे.त्यामुळे ट्रम्पच्या सरकारने विजा विषयक कायदे कडक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरात सध्या स्थानिक व स्थलान्तरीत,असा वाद वेगाने रंगू लागला आहे.अमेरिकमध्ये ट्रम्प सरकार पुन्हा सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या वादाला अधिक गती मिळाली व त्याचे अल्पावधीत उमटलेले पडसाद आपण पाहिले.अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.या सर्व घडामोडीमागे बेरोजगारी व आर्थिक स्तर अशी…
वाडा प्रतिनिधी, वाडा येथे फटाके व्यापाऱ्याकडून खंडणी घेताना एकाला रंगेहाथ पकडले, वाडा शहरातील दिलीप ट्रेडर्स या फटाके विक्रेत्याकडून खंडणी वसुल करताना वाड्यातील एका इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.सदर घटना काल साडेआठच्या सुमारास वाडा मारूती मंदिराच्या मागे वाडा परळी रोडवरील प्रितम सेल्स एजन्सी यांच्या फटाका स्टाॅल समोर घडली.या घटनेने वाडा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. निलेश चव्हाण रा.पाटील आळी,वाडा असे त्या खंडणीखोराचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी निलेश चव्हाण याने त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरून फिर्यादी सुशील पातकर यांना व्हाॅटसअप करून फटाके विक्रीचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचेकडे १४ लाख ७० हजार रू.ची मागणी केली…
दीपक मोहिते, अमानुष घटना उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमजीवीतर्फे स्वातंत्र्यदूत सन्मानाने गौरव, पालघर व ठाणे जिल्ह्यांतील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सलग दोन दिवस उजेडात आल्या आहेत. आदिम कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचे तीन ज्वलंत धक्कादायक प्रकार श्रमजीवी संघटनेच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आल्या.वाड्यातील घटना उघडकीस आणणारे मोतीराम वारे,शहापूरमधील घटनेला आळा घालणारे संजय मुकणे तर जव्हारमधील घटना कमलाकर वाघ यांच्यामुळे उघडकीस आली.त्यांना आज श्रमजीवी संघटनेच्या आयोजित विशेष कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेकडून देण्यात येणारे विशेष बहुमान स्वातंत्र्यदूत या पुरस्काराने, संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित व संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत परळी परिसरातील बुधावली…
तलासरी प्रतिनिधी, तलासरी येथे कविता वाचन स्पर्धेचे आयोजन, आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी येथे कला अकादमी व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कविता वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. बी.ए.राजपूत हे अध्यक्षस्थानी होते.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात,प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे,सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे,आपली बोलीभाषा अभिमानाने बोलली पाहिजे,प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली भाषा श्रेष्ठ राहावी या हेतूने प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या मायबोलीवर प्रेम केले पाहिजे. आपल्या भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न…
वाडा प्रतिनिधी, आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांची गळफास घेऊन आत्महत्या, वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे. देविदास परशुराम नवले – १५ व मनोज सिताराम वड – १४,अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून ते बिवळपाडा व दापटी ता.मोखाडा येथे राहणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील आंबिस्ते येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेची कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे.येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सुमारे ४५० विद्यार्थी निवासी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदिवासी पालघर जिल्ह्याची ओळख वेगाने बदलत चालली आहे, सरकार दरबारी पालघर जिल्ह्याची ओळख ” आदिवासी जिल्हा,” अशी असली तरी आता त्यामध्ये झपाट्याने बदल होत असून हा जिल्हा आता ” प्रकल्पग्रस्त जिल्हा,” म्हणून ओळखू लागला आहे.केंद्र व राज्य सरकार,एका मागून एक असे अनेक विनाशकारी प्रकल्प या जिल्ह्यावर लादू पाहत आहे.या जिल्ह्याला लाभलेला निसर्गरम्य समुद्र व पूर्व भागातील विपुल वनसंपदा जिल्ह्याच्या मुळावर आले आहे. १९८० – ९० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची या जिल्ह्यावर विशेष करून वसई तालुक्यावर वक्रदृष्टी पडली व जिल्ह्याच्या वाताहतीला सुरुवात झाली.वाढवण व अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा – १ व २,वाढवण काँग्रेस व…
सचिन सावंत,वसई वसई शिवसेनेचे ( उबाठा ) तहसीलदाराना निवेदन, वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) शिष्टमंडळाने काल वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.तहसीलदाराना भेटण्यास गेलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी केले. तहसीलदाराना देण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनात राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणी शासनाकडून सतत होणारी चालढकल,अवकाळी पाऊस,गारपीटी,हमीभाव,शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनामध्ये झालेली वाढ,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत,शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणे व पीक विमा योजनेच्या जाचक अटी शिथिल करणे,इ.मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात जिल्हा संघटक किरण चेंदवणकर,तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे व पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
दीपक मोहिते, नागपूर येथे ” मराठाभुषण,” पुरस्कार सोहळा थाटात संपन्न, अखिल भारतीय मराठा महासंघाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने नागपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ,नागपूर येथे नुकतेच मराठाभूषण पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार वितरण सोहोळ्यात समाज व अन्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा ” मराठाभूषण,” पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप,राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे,राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, प्रदेश महिला अध्यक्षा वंदना रोटकर,प्रदेश युवा सचिव गौरव होणे,राम मुळ्ये, अकोला,पालघर,कोल्हापूर,व महाराष्ट्रातील इ.मान्यवर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक,उद्योजक,क्रीडा, साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या तेरा…
