- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आज माझे काय होणार ? काल अखेर संध्याकाळी निवडणुकीची रणधुमाळी थांबली.मतदान संपल्यानंतर आज सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होणार आहे.त्यामुळे सुमारे साडेपाचशे उमेदवारांचा जीव तब्बल १७ तास टांगणीला लागला आहे.आपलं काय होणार ? या एकमेव चिंतेने त्यांना घेरलं आहे. काल सकाळच्या सुमारास रेंगाळलेल्या मतदानाने दुपारी दोननंतर चांगला वेग घेतला व संध्याकाळी मतदान संपले तेंव्हा ते ५७.१२ % झाले होते.मतदान करण्यासंदर्भात सर्वसाधारण मतदारामध्ये असलेली उदासीनता व आपण मतदान केले काय आणि न केल्याने काय फरक पडतो.अशा मानसिकतेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता अधोगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.या निवडणुकीत भाजपने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता…
दीपक मोहिते, ” लोकशाहीचा दिखाऊ सोहोळा,” कितीही डोळसपणे मतदान करा, पण तुमची किंमत शून्य… आज महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे.सुमारे बारा लाख मतदार ११५ जागांसाठी मतदान करणार आहेत.मतदारांना देखील ठाऊक आहे,की केवळ आज आपल्याला किंमत आहे.उद्यापासून आपल्याला कुत्रंही विचारणार नाही.पण व्यवस्थेने ” मतदान हा अधिकार आहे,आणि ते आपण पार पाडलेच पाहिजे,” आपल्या मनात इतकं खोलवर रुजवले आहे की आपण हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडतो,व हे आद्य कर्तव्य पार पाडतो. असो,पण तमाम मतदार आज सकाळीच या ऐतिहासिक सोहोळ्यात सामील होण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.वास्तविक या निवडणुकीच्या प्रचारात विकासाचा मुद्दा गाजेल, अशी अपेक्षा होती. पण आरोप…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” याला म्हणतात, ” परफेक्ट टायमिंग, ” दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे क्रमांक २ चे नेते व माजी महापौर राजीव पाटील यांनी आपल्या काही समर्थक उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या.त्यांच्या या भेटीनंतर सर्वत्र वादळ उठले.नालासोपारा शहरातील त्यांचे व्यवसायिक भागीदार निलेश चौधरी यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली.या भेटीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार ” धनंजय गावडेला पाडा,” असे आवाहन केले.धनंजय गावडे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.एकेकाळी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे गावडे सध्या ठाकुरांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.राजू पाटील यांचे सहकारी निलेश चौधरी व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे सध्याचे मित्र धनंजय…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, असंख्य गुन्हे असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,तब्बल १५६ उमेदवार कोट्याधीश, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक जागांवर दिग्गज उमेदवारांच्या लढती होत आहेत.हे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरले आहेत.पण मतदार मात्र मनात काय चालले आहे,याचा थांगपत्ता काही लागू देत नाहीत.दरम्यान या दिग्गज उमेदवारांमध्ये हल्ले – प्रतिहल्याचा सिलसिला आता जोरात सुरू झाला आहे.या निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतात,हे १६ जाने.रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.प्रचार संपायला आता केवळ ७२ तास उरले आहेत.या तीन दिवसात उमेदवाराना वेगवान असा प्रचार करावा लागणार आहे.मतदानाच्या एक दिवस अगोदरच्या रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” या नाट्याचा प्रयोग होण्याची शक्यता गृहीत धरून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” उखडून फेकून द्या,” ; भूतकाळात जरा डोकावून बघा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्यात आता शह-काटशह,एकमेकांवर चिखलफेक,करणे,बॅनर्स फाडणे,असे प्रकार सुरू झाले आहेत.अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नालासोपारा येथे झालेल्या जाहीर सभेत ” येथील सत्ताधाऱ्यांना उखडून फेकून द्या,” अशी खालच्या पातळीवर उतरून टीका केली.हा प्रकार आगीत तेल ओतण्यासारखाच आहे.वास्तविक कार्यकर्त्याना चथावणी देणाऱ्या भाषेचा वापर करता कामा नये होता.पण,त्यांनी ती तशी केली.विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांना घेरणे,हे साहजिक होते,पण अशा प्रकारची भाषा वापरणे मात्र योग्य नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात आपण या भागात केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखवली.गेली पंधरा वर्षे तुमचा खासदार,पालकमंत्री देखील…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” खरी लढत भाजप व बहुजन विकास आघाडीमध्येच… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने “आम्हाला देण्यात आलेल्या सात जागांवर आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे युतीचा धर्म भाजपने पाळला नाही,असा आरोप शिंदे गटाचे आ.विलास तरे यांनी वसई येथे केला.त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाने असा आरोप करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनेही ( अजित पवार ) असाच आरोप केला होता.या सर्व घडामोडीमुळे वसई विरार मनपा निवडणुकीत महायुती मोडीत निघाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.भाजपने या महानगरपालिकेत ८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.त्यासाठी आपल्या सोबत असलेल्या घटक पक्षांना त्यांनी योग्य प्रमाणात जागा दिल्या नाही.जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ताकद नसताना पाठिंबा देण्याचे नाट्य… वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या दोघांनी अनुक्रमे बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.त्यांच्या या कृतीकडे वसई- विरारकर मतदार एक ” अफलातून विनोद,” दृष्टीने पाहत आहेत.वसई तालुक्यात या दोन्ही पक्षाची ताकद असून नसल्यासारखी आहे,या दोन्ही पक्षाना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणे आजवर कधीच शक्य झाले नाही.अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यात देखील पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी काल पक्षाने बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.त्यामुळे येथील मतदार…
दीपक मोहिते, सत्तेत कोणीही या,पण आम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा करू नका,भ्रष्ट व अनागोंदी कारभार रोखा, निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास संपल्यात जमा आहेत. उमेदवार व मतदारांना मतदान व मतमोजणी होणाऱ्या दोन दिवसाची प्रतिक्षा आहे.गेल्या तीन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच पक्षाची उमेदवारी न मिळालेले नाराज उमेदवार आता प्रचाराला लागले आहेत.प्रचार सुरू झाला असला तरी राजकीय पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हे रिंगणात उतरलेल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत.त्यांना या कामात किती यश येते हे,येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. मतविभागणी टाळण्यासाठी हे सारे काही करावे लागत असते.ही प्रक्रिया गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहे.” आम्हाला उमेदवारी का नाही ? आयुष्यभर…
वसई विरार मनपा निवडणूक ; काँग्रेस व मनसेने आपल्या निवडणूक चिन्हाना श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती…
दीपक मोहिते, कुरुक्षेत्र, वसई विरार मनपा निवडणूक ; काँग्रेस व मनसेने आपल्या निवडणूक चिन्हाना श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती… निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास पूर्ण झाले असून उद्यापासून प्रचाराचे ढोल ताशे वाजू लागणार आहेत.भाजप – शिंदे गट या दोघांची अभेद्य युती विरोधात विरोधकांची विस्कळीत आघाडी,अशी सरळ लढत होत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) घड्याळ मात्र सुरूच झाले नाही.त्यांची टिकटिक वसईच्या मतदारांच्या कानावर पडण्या अगोदरच भाजपने ते बंद पाडले. या निवडणुकीत शिंदे गटाने समंजसपणा दाखवला नसता तर त्यांचाही राष्ट्रवादी झाला असता.पण एकनाथ शिंदे यांचे वास्तवाचे भान ठेवून वागण्याचे कसब नक्कीच कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांनी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणुकीचे तिकीट,आता एटीम कार्ड बनले आहे… दोन दिवसांपूर्वी मांडवातील गोंधळ संपला आहे.गेले सात दिवस प्रतिक्षेत असलेल्या नवरा व नवरी मुलींचा संसार आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.कुटुंबातील कर्त्या धर्त्यांनी एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमात नवरा -नवरीला प्रचंड मनस्ताप दिला,त्यामुळे थकले भागलेले हे दोघे आता संसाराची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहेत.त्यांचा हा संसार १६ जाने.नंतर रुळावर येणार आहे.पण येणारा १५ दिवसाचा हा काळ,त्यांच्यासाठी अत्यंत खडतर असाच आहे.१५ जाने.रोजी होणाऱ्या अग्निदिव्यातून गेल्यानंतर मात्र त्यांना सलग पाच वर्षे रिसेप्शन साजरा करायला मिळणार आहे.या काळात त्यांना केवळ आहेराची पाकिटे घेत राहायचे आहे.त्यामुळे सध्याचा त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे.हा त्रास केवळ एक महिन्यापूरता…
