Author: दीपक मोहिते

नवीन पाटील,सफाळे इअरफोनचे वेड विद्यार्थीनीच्या जीवावर बेतले… कॉलेज तसेच शाळकरी तरुण तरुणींमध्ये इअरफोनच्या सहाय्याने गाणी ऐकणे किंवा कॉलवर तासनतास बोलणे,हे फॅड मोठ्याप्रमाणात वाढले असून आता ते त्यांच्या जीववर बेतू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकात कानाला इअरफोन लावून फाटक ओलांडणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेल्वेएक्सप्रेसची धडक बसून आपले प्राण गमवावे लागले. वैष्णवी रावल राहणार माकणे,सफाळे ( पश्चिम ) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.वैष्णवी ही सफाळे येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती.काल दुपारी एक ते दीडच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे माकणे येथून सफाळे येथील ट्यूशनमध्ये जाण्यास निघाली.कानात इअरफोन घालून ती सफाळे स्थानकाजवळ असलेल्या बंद रेल्वे फाटक ओलांडत असताना…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल २,” बाळासाहेबांच्या विचारांचे मारक,आता त्यांचे स्मारक बांधायला निघाले आहेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे लोक बाळासाहेबांच्या विचाराचे मारक आहेत,ते बाळासाहेबांचे स्मारक काय बांधणार ? अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.ते वांद्रे येथे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. त्यांच्या या जाहीर सभेपुर्वी शिवसेना ( उबाठा ) यांची अंधेरी येथे झाली.या जाहीर सभेत,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली.त्यानंतर शिंदे यांनी आपल्या जाहीर सभेत त्याचा समाचार घेतला.यावेळी पलटवार करताना शिंदे म्हणाले,ज्यांनी बाळासाहेबांचे विचार व अस्मिता सोडली,अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये,आम्ही घरात बसून राजकारण केले नाही.गेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गद्दाराची अवस्था,” रुसूबाई रुसू,कोपऱ्यात जाऊन बसू,”- उद्धव ठाकरे, काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले.या मेळाव्यात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर चिखलफेक करत स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.त्यामुळे महाविकास आघाडी किती काळ टिकेल,याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. काल अंधेरी येथे शिवसेना ( उबाठा ) व वांद्रे येथे शिवसेनेची ( एकनाथ शिंदे ) जाहीर सभा झाल्या.या सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अफझलखान म्हणून संभावना करत मातीत तुम्हाला गाडून टाकू,असा घणाघाती…

Read More

संजय लांडगे, वाडा, वाड्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप व रक्तदान शिबीर, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना (उबाठा) वाडा तालुका व शहर शाखेच्या वतीने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करण्यात आले. तर पालघर जिल्हा उपप्रमुख प्रकाश केणी यांच्या निवासस्थानी आयोजीत कार्यक्रमात ज्योती ठाकरे, निलेश गंधे,भास्कर दळवी, वर्षा गोळे,डी.बि.पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील, यांनी केले. तसेच कुडूस विभागात शिवसेनेचे ( उबाठा ) गोविंद पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ५६ हून अधिक तरुणांनी रक्तदान केले.

Read More

सुरेश काटे,तलासरी, तलासरीत रंगल्या कब्बडी स्पर्धा, जनसवांद अभियान अंतर्गत,तलासरी पोलिस स्टेशन आणि तलासरी तालुका इंडस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या असून या कब्बडी स्पर्धाचे उदघाटन आ.विनोद निकोले यांनी केले आणि सुरुवातीच्या सामन्यात एका बाजूने कब्बडी सर्व्हिस टाकून आ. विनोद निकोले यांनी कब्बडी मधील आपले नैपून्य दाखवून दिले.यावेळी तलासरी तालुका इडस्ट्रिअल असो.अध्यक्ष अजित नार्वेकर,नगराधक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा,पोलीस निरीक्षक विजय मूतडक,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच या आयोजित कब्बडी स्पर्धाना विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कब्बडी…

Read More

अविनाश मढवी,नालासोपारा, ४१ अनधिकृत इमारतीवर कारवाई : आज  दिवसभरात, ७ इमारती जमीनदोस्त, नालासोपारा येथे आज २०० कुटुंबांनी आपली घरे गमावली,मनपाच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बुलडोझरच्या साहाय्याने बेकायदेशीर इमारती पाडल्या. नालासोपारा येथे आज ३४ बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येत आहेत.ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.प्रशासनाने आज बेकायदेशीर बांधकाम हटवताना सुरक्षा राखण्यासाठी ४०० हून अधिक पोलिस तैनात केले आहेत.या कारवाईनंतर,या वसाहतीत अनेक वर्षांपासून राहणारी सुमारे २०० कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे. वसई-विरार महानगरपालिकेने या ३४ इमारतींमधील रहिवाशांना २२ जाने.२०२५ पर्यंत घरे रिकामी करण्याची नोटीसही बजावली होती. नालासोपारा पूर्वेस लक्ष्मी नगर,अग्रवाल नगरी येथे डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर…

Read More

नदीम शेख,पालघर, जनतेच्या कामाना सर्वोच्च प्राधान्य द्या – पालक सचिव डॉ.सोनिया सेठी, शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात.शासकीय अधिकार आणि कर्मचारी यांनी जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव ( मदत व पुनर्वसन ) डॉ.सोनिया सेठी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती डॉ.सेठी यांनी आढावा बैठक घेतली.बैठकीला जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी विजया जाधव,महेश सागर , तुषार माळी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती डॉ.सेठी…

Read More

मनिष धानू,डहाणू, डहाणू – सायवन येथे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत सायवन येथे महिला मेळावा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,डहाणू पंचायत समिती सभापती प्रविण गवळी पंचायत समिती सदस्य पिंटी बोरसा,रायपूर सरपंच प्रकाश जाधव, सायवन प्रा.आ.केंद्राचे डॉ. राठोड,उपसरपंच विलास गिंभल तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच आरोग्य व बालविकास विषयक मार्गदर्शन करण्यात आले.महिलांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. बालविवाहाचे दुष्परिणाम व कमी वयात लग्न न करण्याचे महत्त्व अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याद्वारे प्रभावीपणे सादर केले.महिलांच्या आरोग्यासंबंधी जागृतीसाठी प्राथमिक आरोग्य…

Read More

नवीन पाटील,सफाळे, आजी व आजोबा हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक – जॉन रोझारीयो, निःस्वार्थ प्रेम आणि अमर्याद मायेचा ओढा असणार नातं म्हणजे ” नातवंड व आजी-आजोबांचं,” नातं असतं.वयाने मोठे अनुभवसंपन्न असणारे आजी-आजोबा हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात,असे भावनात्मक उद्गार तारापूर विद्या मंदिर,बोईसर शाळेच्या प्राचार्य जॉन रोझारीओ यांनी काढले. ” सांस्कृतिक व रचनात्मक,” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते पालक आपल्यावर रागावतात,शिक्षा करतात वेळ प्रसंगी मार ही देतात,परंतु आपले लाड,हट्ट पुरवणारे, कौतुक करणारे आजी आजोबाचं असतात,असे ते पुढे म्हणाले,हे नातं म्हणजे आनंदाचा खजिना असून उतारवयात आपण त्यांचं आरोग्य जपलं पाहिजे. आपल्या व्यस्त दिनचर्येमधून काही वेळ त्यांच्यासाठी दिला…

Read More

दीपक मोहिते, नालासोपारा येथे उर्वरित ३६ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाई सुरु, नालासोपारा पूर्वेस आरक्षित असलेल्या शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ३६ अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ इमारती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने जमिनदोस्त केल्या होत्या.पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली.आजपासून उर्वरित ३६ इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विकाकामासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर समाजकंटकांनी थेट ४१ अनधिकृत इमारती बांधल्या व त्यामधील सदनिका गोरगरीब कुटुंबाना विकल्या.या जमिनीचा मूळ मालक व महानगरपालिका या दोघांमध्ये वाद होता,त्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.मात्र जमिनीवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने…

Read More