- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आउटगोइंगला प्रचंड वेग : आम्हाला काही फरक पडत नाही,उद्धव ठाकरे यांचा हा हट्टीपणा पक्षाला मारक ठरणार, शिवसेनेची ( उबाठा ) मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले चिपळूणचे आ.भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर केलेल्या भाष्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खा.विनायक राऊत यांनी ” आ.भास्कर जाधव हे आमचे नेते आहेत,ते जर नाराज असतील तर त्यानी पक्षप्रमुखाशी बोलायला हवे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.आ.भास्कर जाधव हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात.कोकणात राणे कुटुंबियांशी सरळ दोन हात करण्यात ते कायम आघाडीवर राहीले.पण अनेक संकटप्रसंगी त्यांना पक्षाकडून कधीच मदत मिळाली नाही.यापूर्वी देखील अशाच वागणुकीमुळे सेनेला सोडचिठ्ठी…
दीपक मोहिते, सर्वच्या सर्व ४१ अनधिकृत इमारती जमिनदोस्त ; तेवीसशे कुटुंबाचे संसार रस्त्यावर…. नालासोपारा पूर्व भागातील सर्वच्या सर्व ४१ अनधिकृत इमारती महानगरपालिकेने जमिनदोस्त केल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.मात्र या कारवाईमुळे सुमारे तेवीसशे कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.याला जबाबदार कोण ? या प्रश्नाच्या खोलात शिरूनही आपल्याला उत्तर सापडणार नाही.मात्र या प्रकरणामध्ये असलेली मोडस ऑपरेंडी आपण लक्षात घ्यायला हवी. भूमाफिया,अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,दलाल व अधिकारी,कसे संगनमताने गोरगरीब जनतेची फसवणूक करतात,हे दिसून आले आहे.ज्या जमिनीवर या अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,ती जमीन शासकीय कामासाठी आरक्षित आहे.कुख्यात भूमाफिया सीताराम गुप्ता ( माजी नगरसेवक ) यांनी त्या जमिनीवर कब्जा करून विविध अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांना विकल्या.त्यांनी…
जव्हार प्रतिनिधी, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी, भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल,तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अर्जुन कुमार राठोड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक योगेश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात,संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.त्यांनी विद्यार्थ्यांना संत शिरोमणी यांचे विचार आपल्या जीवनात रुजवण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.राठोड यांनी विद्यार्थ्यांना सत्य,नम्रता आणि स्त्री सन्मान यावर आपले विचार मांडले. ” सत्य हाच खरा धर्म आहे आणि जीवनात नेहमी सत्याचे आचरण करा,”…
वसंत भोईर,वाडा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कणेर वसई तालुक्यात प्रथम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रतियोगिता २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा कणेर शाळेला वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे व इतर मान्यवरांच्या हस्ते तीन लाख रु.चा धनादेश,सन्मान चिन्ह, व प्रशस्तीपत्रक देऊन वसई तालुक्यात प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला पागी,मोहन पाटील,संदीप पाटील,राजेंद्र पाटील, अनुजा गायकवाड,बाळू पारधी,वैभव सोमवंशी,सुजित बागकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या आशाताई तुंबडा व गुरुनाथ दळवी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मान्यवरांनी कौतुक केले. या शाळेने वसई तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा होण्याचा मान देखील दोन वर्षांपूर्वी पटकावला होता.सर्व मान्यवरांनी…
संजय लांडगे, वाडा वाड्याच्या आत्मा मलिक शाळेला परदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट, वाडा तालुक्यातील अंभई येथील आत्मा मालिक शाळा आणि आश्रमास पोलंड, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली.या विशेष भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शिक्षणपद्धती आणि आश्रमातील अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला तसेच विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक आदिवासी नृत्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले.यानंतर त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य,गाणी आणि कला सादर केली. पाहुणेही मोठ्या आनंदाने या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले.विशेष म्हणजे त्यांनी आदिवासी नृत्याची मजा लुटली. या भेटीदरम्यान पाहुण्यांनी शाळेतील विविध उपक्रम, आश्रमाचे शांत आणि सात्त्विक वातावरण,तसेच ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मिक शांतीचा…
मनिष म्हात्रे,वसई, केसरीभाऊंचा अनंताचा प्रवास,वृद्धापकाळाने दु:खद निधन, पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजाचा मानबिंदू , पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच गेली ४० वर्षे ” केसरी, ” ची यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या ” केसरी, ” टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे मुंबई वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते. वयाच्या ५० वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना करून खुप कष्टाने जग विख्यात कंपनी म्हणून नावारूपास उदयास आणली.त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे.त्यांनी अनेकांना प्रेमाने मार्गदर्शन करून असंख्य हृदये जिंकली आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचा जन्म १० एप्रिल १९३५ रोजी मथाणे या…
दीपक मोहिते, वसई विरार मनपा आगामी निवडणूक ; उत्तर भारतीय व गुजराती समाजाचे मतदान ठरणार निर्णायक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिढा अद्याप सुटला नसतानाही महायुतीचे प्रमुख घटक असलेले भाजप,शिवसेना ( एकनाथ शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) हे पक्ष आता कामाला लागले आहेत.या तिन्ही पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.दिवसागणिक अन्य पक्षाचे माजी आमदार व पदाधिकारी त्यांच्या पक्षात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातही या प्रक्रियेला सध्या वेग आला आहे.दोन दिवसांपूर्वी सुमारे चारशे ते पाचशे तरुणांनी नालासोपारा येथे एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.आजपर्यंत वसईकरानी भाजपच्या प्रवेश सोहोळ्याचे अनेक इन्व्हेंट पाहिले,पण शिंदे गटात तरुणांचे इतक्या…
दीपक मोहिते, ” सरकारला कानपिचक्या,” मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे ; सरकार अडचणीत, निवडणुकीपूर्वी सरकारकडून खैरात करण्यात येणाऱ्या मोफत योजनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना खडे बोल सुनावले आहेत.या संदर्भात शहरी भागातील बेघर लोकांशी संबधित एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्या.बी.आर.गवई व न्या.ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने ” मोफत मिळत असलेल्या सुविधांमुळे लोक आता काम करण्यास तयार नाहीत.त्यांना मोफत धान्य मिळते,त्यांना कोणतेही काम न करता पैसे मिळतात.त्यांच्या अडचणी आपण समजू शकतो,पण त्यांना आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून देशाच्या विकासाला हातभार लावण्याची संधी मिळवून द्यायला हवी.त्यांना मोफत योजनांचा फायदा मिळत असल्यामुळे ते काम करण्यास टाळाटाळ करत असतात,” अशा शब्दात त्यांनी…
दीपक मोहिते, थ्री वॉर रूम वॉर : संघर्ष पराकोटीला, महायुती सरकारमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफूस सुरू असते.आता मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या तीन प्रमुख नेत्यांच्या वॉर रूमवरून घमासान सुरू झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर नजर ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे,यासाठी वॉर रूमची निर्मिती केली होती.त्यांच्या मागोमाग अजित पवार यांनीही आपली वॉर रूम सुरू केली होती,पण तीला अवघ्या काही दिवसात टाळे लागले होते. त्यांची वॉर रूम का बंद झाली,हा एक वेगळा विषय आहे.पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे.राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानकपणे याच मजल्यावर आपली…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग अंतिम, पीएमएलए कायद्याची राजकीय नेते व उद्योगपतींमध्ये प्रचंड दहशत, कालच्या भागात आपण सक्तवसुली संचालनालयाचा ( ईडी ) पूर्व इतिहास,कामकाजाची पद्धत,इ.विषयाचा आढावा घेतला.आज आपण पीएमएलए म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा,हा कसा आहे.या कायद्याची राजकीय नेते व उद्योगपतींमध्ये एवढी दहशत का आहे ? याविषयीची माहीती घेणार आहोत. मनी लाँडरिंग,हवाला,इ. प्रकरणाची चौकशी करणे व अशा आर्थिक प्रकरणातील गुन्हेगारांना या कायद्याच्या २८ ( १५६ कलम ) नुसार संपत्ती जप्त करणे,हस्तांतरण,रुपांतरण व विक्री यावर बंदी घालणे,अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार असतात.गडगंज पैसा आला कोठून ? त्याचा विनियोग कसा व कुठे झाला ? याची माहिती घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालय या कायद्यानुसार संबधित…
