Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार, काल कॉक्रोच जनता पार्टीचे ( सीजेपी ) अध्यक्ष अभिजित दिपके हे दिल्लीत आल्यानंतर जंतर-मंतरवर हजारो तरुणांनी केलेली गर्दी व आंदोलनाला जनतेचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेता येणाऱ्या काळात या ठिणगीचा चांगलाच भडका उडण्याची शक्यता आहे. काल झालेल्या या आंदोलनानंतर दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. अभिजित दिपके यांनी सुरु केलेल्या या लढ्यात त्याच्या पक्षाला सरकार व मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे. जंतर मंतरवर झालेले हे आंदोलन प्रचंड यशस्वी झाले. पण एकाही वृत्तवाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण दाखवणे टाळले. सोशल मिडियावर मात्र या घटनेच्या बातम्या व फोटोचा अक्षरशः पाऊस…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” डोनाल्ड ट्रम्प ;… तर असा मित्र नसलेलाच बरा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेल्या एका वक्तव्याने त्यांनी एकतर ताळतंत्र सोडले आहे किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असावी,असे वाटू लागले आहे. ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून भारताला कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. काल त्यांनी ” भारताने गेली अनेक दशके अमेरिकेला लुटले असून भारतीय मालावर भरमसाठ शुल्क लावण्याच्या आपल्या निर्णयावर आपण आजही ठाम असल्याचे सांगितले.” हे सांगत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी मला खूप आवडतात व ते माझे चांगले मित्र आहेत, हे देखील सांगायला विसरत नाहीत.त्यांचे हे वागणे पोटात एक आणि ओठावर दुसरेच असे आहे. भारत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कार्यकर्त्यांची ओळख ; पूर्वी ” पायपुसणी,” अशी होती, ती आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे… राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यांच्या ( घराणेशाही ) प्रथेमुळे आजवर अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आला. या विषयावर अनेक विचारवंतांनी आजवर खूप लिहिले, पण परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकला नाही. विविध पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षात सतरंज्या उचलण्याचे काम करत आहेत. अशा या कार्यकर्त्यांचा पक्षात ” अंधभक्त,” म्हणूनच वावर होत असतो. याला आज एकही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकला नाही.जवळपास सर्वच पक्षात कार्यकर्त्यांवर असे बलात्कार होत असतात. शरद पवार,अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीश…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” ममता बॅनर्जीं यांचा उद्धव ठाकरे होणार… पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे जे काही झाले तेच तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या काही राजकीय हालचाली होत आहेत, त्यावरून लवकरच भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींना वगळून नवीन टीएमसी स्थापन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे संकेत मिळत आहेत.दोन आमदारांना पक्षातून काढल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उलथापालथी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणेच टीएमसीमध्ये फूट पाडण्याचा ‘महाराष्ट्र मॉडेल’ वापरला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली, ठाणे – पालघर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. पण त्यांची निवड बिनविरोध होईल,असे कोणालाही वाटले नव्हते. शिवसेनेला ही जागा मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असेच होते.त्यांनी वनमंत्री गणेश नाईक व भाजपचे आ. संजय केळकर या दोघांना धोबीपछाड देत,ही जागा आपल्या पदरात पाडली. या सर्व घडामोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिंदे यांनी आपली राजकीय ताकद जी पणाला लावली ती नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यात अनेक वावड्या उठल्या व अफवांचे अमाप पीक आले होते. त्यामध्ये अनेक युट्युब…

Read More

दीपक मोहिते, वेळीच सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ… आज जागतिक पर्यावरण दिन, जगभरात हा दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.काही वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली वसुंधराचे अपरिमित हानी होत असल्याचे दिसून आल्यामुळे सन् १९७२ साली स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे याविषयी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्यावरणप्रेमी मान्यवरांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्य असला तरी गेल्या ५४ वर्षात या महत्वाच्या विषयी किती काम झाले ? याचा लेखा-जोगा मांडणे मला गरजेचे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच करत आहे. तप्त वातावरण,भुगर्भातील पाण्याची पातळी सतत खालावणे, अवेळी पाऊस पडणे, तप्त वातावरणामुळे जलसाठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यायाविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे, राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला काडीची किंमत नसते, अशी चर्चा सतत होत असते. त्यांची गरज केवळ सतरंज्या उचलणे, नेते मंडळींची खरकटी व उष्टी उचलणे या कामासाठी असते. हे आपण सतत अनुभवत असतो. निवडणूकीसाठी उमेदवारी देणे किंवा लाभाचे पद देताना मंत्री, खासदार, आमदार व पक्षाचे वरिष्ठ नेते यांची मुले, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येत असते. वर्षानुवर्षे हे असेच चालत आल्यामुळे पक्षात डावलल्या गेलेल्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते पहा, त्यांच्या पोस्टचे शीर्षक आहे, ” कार्यकर्त्यांनी करायचं काय ?”…

Read More

दीपक मोहिते, चबाहर बंदर व टॅरिफ ; भारताचे परराष्ट्र धोरण चांगलेच अंगलट, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपले मित्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही दावे करत असले तरी अमेरिका गेल्या सहा महिन्यांपासून भारताची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाही. मध्यंतरी आपण रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू लागल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या विरोधात ५० टक्के टॅरिफचे हत्यार उपसले. त्यामुळे आपल्या निर्यातीवर त्याचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प एवढे करून थांबले नाहीत, तर सध्या सुरू असलेल्या युद्धात त्यांनी इराणमधील चबाहर या महत्वाकांक्षी बंदर परिसरात प्रखर बॉम्बहल्ले चढवले. हे बंदर, भारत व इराण संयुक्तपणे उभारत आहेत. या बंदराच्या उभारणीसाठी भारताने अब्जावधी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” रविंद्र फाटक यांना वसईत पैकीच्या पैकी मतदान होऊ शकते, ठाणे – पालघर विधान परिषद जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली व ती आपल्या पदरात पाडून घेतली. पालघर व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात ” आपणच दादा आहोत,” हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. आपले पारंपारिक राजकीय शत्रू असलेले वनमंत्री गणेश नाईक व ठाण्याचे आ. संजय केळकर या दोघांचे त्यांच्यासमोर मात्रा न चालल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यावर त्यांचे निर्विवाद राजकीय वर्चस्व निर्माण झाले आहे. तरीही त्यांना बेसावध राहून चालणार नाही.पालघर,बोईसर या दोन तालुक्यात त्यांच्या पक्षाची चांगली बांधणी आहे. मात्र वसई तालुका,तलासरी, विक्रमगड या…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत मिळत आहेत, समान नागरी कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी उत्तराखंड व आता गुजरात व आसाम या तीन राज्यांनी हा कायदा लागू केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रही तो लागू करण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत मिळू लागले आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन देण्यात आले होते. भाजपनं जाहीरनाम्यात म्हटलंय की, ” भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून सामान नागरिक कायद्याचा समावेश केला आहे. भाजप असं मानतो की जोपर्यंत भारतात समान नागरी संहिता लागू होत नाही, तोपर्यंत महिलांना समान…

Read More