- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” “भगव्याने गुलाबी रंग झाकण्यासाठी घेतला काळ्या रंगाचा आधार, बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.घटना होती,कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानीवर असलेला अजित पवार यांचा फोटो काळ्या पडद्याने झाकुन टाकला.या घटनेने अजित पवार गटाचे तमाम नेते व प्रवक्त्यांचे पित्त चांगलेच खवळले व ते सारे कार्यक्रमाच्या या आयोजकांवर तुटून पडले.बारामतीसारख्या मतदारसंघात असं घडावं,हे अजित पवार यांना त्रासदायक ठरणारे आहे.दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाने बारामती येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे आमंत्रण अजित पवार यांना देण्यात आले होते.तसेच त्यांनी कार्यक्रमास यावे,यासाठी आयोजकांनी त्यांना वेळोवेळी विनंत्या केल्या,तसेच मोबाईलवरून कॉल देखील केले,पण अजित पवार हे काही कार्यक्रमास उपस्थित…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नागपूर हिट अँड रन ; महायुतीला परिणाम भोगावे लागणार, राज्यात महायुती सरकारला गेल्या तीन महिन्यापासून एकामागून एक असे अपशकुन होत आहेत.पुणे व वरळी येथे हिट अँड रन,बदलापूर बलात्कार,मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे आणि आता नागपूर येथे हिट अँड रनची घडलेली ताजी घटना.या सर्व घटना महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणाऱ्या आहेत. या प्रत्येक घटनेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महायुतीच्या घटक पक्षांचा संबध आला आहे.पुणे येथे घडलेल्या हिट अँड रन घटनेतील आरोपी हा अजित पवार गटाशी संबधित आहे,या गटाचा एक आमदार आरोपीच्या संदर्भात पोलिसांनी सौम्य भूमिका घ्यावी,असे सांगण्यासाठी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेला होता.त्यानंतर वरळी मुंबई येथे घडलेल्या घटनेत…
दीपक मोहिते, ” निवडणूक पूर्व विश्लेषण,” ….अन्यथा मातोश्रीवर कायम निवांत व्हावे लागेल, देशात निवडणूक पूर्व सर्व्हेक्षण करणाऱ्या एका अग्रगण्य संस्थेचा सर्व्हे नुकताच जाहीर झाला आहे.या संस्थेने आजवर केलेल्या एकूण सर्व्हेपैकी ९० % सर्व्हे खरे ठरले आहेत.पंजाब,कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश,राजस्थान व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक सर्व्हेचा त्यामध्ये समावेश आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे.आपल्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार आहे,असे त्यांचा सर्व्हे सांगतो.त्यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीला १५५ ते १६० तर महायुतीला ११५ ते १२० जागा मिळणार आहेत.कोकण-३९ व मुंबई-३६ अशा कोकण विभागातील ७५ जागा वगळता इतर ४ विभागात ( विदर्भ -६२,उ.महाराष्ट्र-४७,प.महाराष्ट्र-५८ व मराठवाडा-४६, ) महायुतीची पीछेहाट होईल,असा अंदाज त्यांनी व्यक्त…
दीपक मोहिते, जातीपातीचे राजकारण, नालासोपारा विधानसभा ; बाहेरचा उमेदवार लादल्यास भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होणार, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंधात भाजपचा उमेदवार कोण ? या चर्चेला सध्या ऊत आला असून भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत.अशावेळी भाजप मात्र या विधानसभा मतदारसंघात हिंदी भाषिकांची लोकसंख्या लक्षात घेऊन उत्तर भारतीय उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.डहाणूचे विद्यमान नगराध्यक्ष भरत राजपूत व भाजपच्या स्थानिक पदाधिकारी ऍड.नेहा सुरेश दुबे या दोघांची नांवे चर्चेत आघाडीवर आहेत.डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांची राजकीय पार्श्वभूमी ही वादग्रस्त असून एका बँक घोटाळ्याप्रकरणी ते अडचणीत आले होते.तसेच त्यांचा राजकीय प्रवास हा देखील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय…
दीपक मोहिते, ” निवडणूक विशेष,” जागावाटपात भाजपच ” मोठा भाऊ,” गृहमंत्री अमित शहा हे सालाबादप्रमाणे, ” लालबागच्या राजा,” च्या दर्शनासाठी काल मुंबईत आले होते.या दौऱ्यात त्यांनी गणेश दर्शन व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप,असा दुहेरी कार्यक्रम आखला होता.त्यांनी विमानतळावर फडणवीस,शिंदे व अजित पवार या त्रिकुटाला चर्चेसाठी पाचारण केले होते.यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर या तिघांचे चांगलेच कान टोचले.त्यांनी महायुती ही अभेद्य राहिली पाहिजे,असा सज्जड दम या तिघांना दिला.तसेच महायुतीची भूमिका माध्यमासमोर मांडण्यासाठी केवळ तीन प्रवक्ते नियुक्त करा,अशी सूचना केली.त्यामुळे सध्या प्रवक्त्याची जी खोगीरभरती झाली आहे,ती निश्चितच कमी होणार आहे.महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपला जळीस्थळी शरद पवारच दिसतात, काल गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले होते.तर शरद पवार यांनीही आपले जावई व नातीसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.शरद पवार यांनी गणपतीचे दर्शन घेतल्यामुळे भाजप नेत्यांचा आता पोटशूळ उठला आहे.पक्षाचा प्रवक्ता कसा असू नये,याचे प्रतिक असलेले प्रविण दरेकर सध्या या विषयावर अकलेचे तारे तोडत आहेत.ते म्हणतात,शरद पवार यांचे गणपती दर्शन हे नौटंकी आहे,घसा फोडून ओरडत आहेत,शरद पवार यांचे गणेश दर्शन ही जर नौटंकी असेल तर मग गृहमंत्री अमित शहा यांचे गणपती दर्शन,हा तमाशा समजायचा का ? शरद पवार यांना हिंदुत्व विरोधी ठरवण्यासाठी भाजप कायम आगपाखड करत आला…
दीपक मोहिते, सूर्यातीर, तरच म.गांधींचे ” खेड्यातील भारत,” स्वप्न साकार होईल, ग्रामीण भागातील शासनव्यवस्था अधिक प्रभावी,बळकट करणे व लोकांचा विकसकामात थेट सहभाग,असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य सरकारानी चार दशकापूर्वी अनेक समित्या नेमल्या.त्यापैकी एल.एम.सिंघवी समितीने पंचायतराज संस्थांना घटनात्मक मंजुरी व संरक्षण द्यावे,अशी महत्वपूर्ण सूचना केली व ती तत्कालीन सरकारने स्विकारली.त्यानंतर सरकारकडून ७३ वी घटनादुरुस्ती करण्यात आली.ही घटना दुरुस्ती करण्यामागे सिंघवी समितीच्या अहवालाचे मोठे योगदान होते. १९९२ मध्ये ७३ व्या घटना दुरुस्तीने बदल करण्यात आले.पंचायतराज आता शासन प्रणाली म्हणून काम करत आहे.या व्यवस्थेमुळे महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्याचे जे स्वप्न पाहिले होते,ते एकप्रकारे प्रत्यक्षात उतरले.खेड्यापाड्यात विखुरलेल्या आपल्या देशाला विकेंद्रित शासनाची गरज…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” काका हा काकाच असतो,” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक मी बारामतीमधून लढवू इच्छित नाही,असे जाहीर केले आहे.आपल्या पत्नीचा लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,पत्नी व दोन मुले वगळता संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात जाणे,आपल्या काकांचा पक्ष,आमदार पळवणे,इ.बाबी बारामतीकरांच्या मनाला पटल्या नाहीत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जबर फटका बसला होता.त्यामुळे अजित पवार हे वारंवार नाझ्याकडून अनेक चूका झाल्याचे सांगत फिरत आहेत.विधानसभा निवडणुकीतही आपला पराभव होईल,अशा भितीमुळे अजित पवार आता चांगलेच नरमले आहेत.महायुतीमधील एकनाथ शिंदे गटही त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.काल तर एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारमध्ये विकासकामांच्या फायली वेगाने सरकत…
दीपक मोहिते, निवडणुकीचे वारे, आ.ठाकूर रिंगणात नसतील तर माजी महापौर प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी मिळावी, पालघर जिल्ह्यातील सहापैकी तीन विधानसभा जागा,आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत.तर उर्वरित पालघर-एकनाथ शिंदे गट,विक्रमगड- राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व डहाणू- मार्क्स.कम्यु.या तीन पक्षाकडे आहेत.वसई व नालासोपारा या दोन्ही मतदारसंघात ठाकूर कुटुंबियाशिवाय इतर कोणालाही मतदार स्विकारत नाहीत.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनीच उभे राहावे,अशी मागणी करण्यात येत आहे.पण हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवायची नाही,अस ठरवलं तर त्यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करत आहेत.यामध्ये व्यापारी,उद्योजक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक,नोकरदार मंडळी,महिला…
दीपक मोहिते, अजित पवार यांना झालंय तरी काय ? अजित पवार यांना झालंय तरी काय ? धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही लवकरच शरद पवार गटात सामील होणार आहे.त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांचा संताप अनावर झाला आहे.आत्राम कुटूंबातील वाद शिगेला पोहोचला असताना अजित पवार यांनी दिलेला सल्ला ऐकून आपण सारे चकितच झालो आहोत.ते आत्राम यांच्या कन्येला सल्ला देताना म्हणाले,राजकारणासाठी स्वतःचे घर फोडू नका,ती चूक मी केली,त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहे.मी केलेल्या चुकीचा मला प्रचंड पश्चाताप होत आहे.उशिरा का होईना,त्यांना पश्चाताप होतोय,हेही नसे थोडके…. स्वतःचे घर फोडताना,८५ वर्षे वयाच्या आपले वयोवृद्ध काका व ज्या बहिणीने आयुष्यभर आपल्यावर प्रेम केलं,त्या…
