- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बडगुजर यांनी नितेश राणे यांचा पोपट केला, बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत पार्टी करणारे सुधाकर बडगुजर हे आज कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांच्या नाकावर टिच्चून भाजपवासी झाले.त्यांच्या या प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांची अवस्था पाहून अक्षरशः कींव करावीशी वाटली.म्हणून राजकारणात वावरताना खूप सांभाळून बोलावे लागते,वागावे लागते.नितेश राणे हे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.ते जी काही भूमिका घेतात,त्यांच्या प्रत्येक भूमिकेला स्वपक्षातूनच विरोध होत असतो.आजच्या घटनेने त्यांचे सर्वत्र हसं झाले.गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिका जिंकण्यासाठी बडगुजर यांचे कार्ड वापरण्याचे ठरवले व प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला.यावेळी महाजन यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ” अबकी बार शंभर पार,” अशी घोषणा…
जव्हार प्रतिनिधी, ग्रामस्थाच्या श्रमदानातून विहिरीची यशस्वी दुरुस्ती, पावसाळा सुरू झाला की अनेक ग्रामीण भागांतील पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होत असतो. या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातील पिंपळशेत/कोतीमाळ गावात नागरिकांनी स्वखर्चातून आणि श्रमदानातून एक प्रेरणादायी उपक्रम राबवत नादुरुस्त विहिरीची दुरुस्ती करण्यात आली.या उपक्रमामुळे गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा स्रोत पुन्हा कार्यान्वित झाला आहे. गावातील जुनी विहीर गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून होती. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचा वापर करावा लागत असे. परिणामी आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती.याचा थेट फटका महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ता कु. कमलेश पागी यांनी पुढाकार घेऊन गावातील…
वसंत भोईर,वाडा खेकड्यांसाठी ( मुठे ) खवय्यांची सर्वत्र भटकंती सुरू, पावसाच्या दमदार आगमना नंतरही खेकड्यांचे ( मुठे ) बाजारात अद्याप आगमन झालेले नाही.खेकड्यांची चव घेण्यासाठी आतुर असलेल्या खवय्यांवर खेकड्यांच्या शोधात बाजारपेठांत, गांव-पाड्यात तसेच रात्रीच्या वेळी पळींदा व बॅटरी घेऊन रानमाळावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. पावसाच्या आगमनानंतर जमिनीत ओलावा निर्माण झाला की खोलवर बिळांमध्ये असलेले मुठे बाहेर पडतात. अत्यंत चपळ असलेल्या या मुठ्यांना पकडून ते शिजवून जेवणातील एक चांगला गुणकारी व चवदार खाद्य पदार्थ भाजी म्हणून बनवून खाण्यात येतो.जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस अधूनमधून सुरु झाला आहे. जंगल भागात व माळरानावर गवताचे प्रमाण अधिक झाले आहे.खेकड्यांचे खाद्य असलेले गवत अगदी…
दीपक मोहिते, आयुक्त सुस्त ; करदाते नागरिक बेहाल, वसई व नालासोपाऱ्यामध्ये कोणताही पक्ष निवडून आला तरी नागरिकांचे हाल मात्र संपायचे नांव घेत नाही.गेली अनेक वर्षे ही दोन्ही शहरे दरवर्षी जलमय होत असतात. नियोजनशून्य बांधकामे,नाल्यात होणारी अनधिकृत बांधकामे, पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले अरुंद होणे व नालेसफाईच्या नावाखाली मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांकडून होणारी लूट आदी कारणामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना दरवर्षी अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते. यंदाही लोकप्रतिनिधीनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना शेकडो सेल्फी काढले व ते सोशल मिडियावर पोस्ट केले.पण गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने या लोकप्रतिधीनी व आयुक्ताचे चांगलेच वस्त्रहरण केले.नालासोपारा शहरातील अनेक नागरिकांची घरे व…
वसंत भोईर,वाडा शुद्ध बियाणे व समृद्ध शेती याविषयी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ? पालघर जिल्ह्यात मान्सून नुकताच दाखल झाला आहे.आता पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे.पिकांची अधिक वाढ होऊन चांगले उत्पादन होण्यासाठी गुणवत्ता पूर्व बियाणे आवश्यक आहे. त्यामुळे बियाण्यांची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून,कंपनीच्या जाहिराती वाचून शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करू नये.बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी,खरेदी करावयाचे बियाणे वाण,जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का,हे जाणून घ्यावे.निवडलेले वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी विकारक्षम किंवा सहनशील आहे का ? निवडलेले वाण किती कालावधीसाठी आहे,त्याची वैशिष्ट्ये कोणती ? याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. शेतात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बियाणे…
वसंत भोईर,वाडा सावरोली पुलाला पडले तडे,कांबरे – वासिंद मार्ग धोकादायक, वाडा- शहापूर- भिवंडी या तीन तालुक्यांना जोडणारा काबांरे- वाशिंद मार्गावरील तानसा नदीवरील सावरोली पुलाला दोन दिवसापूर्वी तडे गेले आहेत.त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडा- भिवंडी महामार्गाची पार दुरावस्था झाली असल्यामुळे वाडा, शहापूर, ठाणे येथून येणारी सर्व वाहने याच मार्गे ये-जा करत असतात. शिवाय हा मार्ग अरुंद असल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.तडे गेल्यामुळे या पुलाला आता धोका निर्माण झाला आहे. या मार्गाने होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्वरित थांबविण्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज संध्याकाळीच मला व्हाट्सअपवर फोटो आले आहेत.मी उद्याच या ठिकाणी जाऊन…
दीपक मोहिते, ” निवडणूक पर्व, ” मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यात निवडणुकीचे बिगुल वाजवले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल वसईच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी महानगरपालिकेच्या इस्पितळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण करून एकप्रकारे निवडणुकीचे बिगुलच वाजवले आहे.वसईकर नागरिकांसाठी आधुनिक दर्जाचे इस्पितळ हा अत्यंत जिव्हाळ्याचा तसेच संवेदनशील असा विषय आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ९० बेडच्या विस्तारीत कक्षाचे लोकार्पण करून वसईकर नागरिकांची मने जिंकली आहेत.या घटनेचा आगामी निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.तसेच पाणी व अनेक प्रलंबित असलेली अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी विविध वित्तीय संस्थाकडून निधी उभारण्यावर भर दिला आहे. मेट्रोच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्नाला लागले आहे. तसेच…
दीपक मोहिते, माणुसकीला काळिमा, वा रे चौथी मुंबई ; रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बाळाचा मृतदेह पिशवीतून नेला, पालघर जिल्ह्याची वाटचाल चौथ्या मुंबईच्या दिशेने सुरू झाल्याचे आपले नेतेमंडळी सतत सांगत असतात. वाढवण बंदर, विमानतळ,बुलेट ट्रेन व मुंबई-वडोदरा जलदगती मार्ग व अन्य विकासकामे प्रस्तावित आहेत.या विकासकामावर लाखो कोटी रु.खर्च करण्यात येत आहेत.मात्र पालघर जिल्हावासीय आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. पाणी,वैद्यकीय सेवा,शिक्षण व आरोग्य,या मूलभूत गरजापासून ते वंचित आहे. आरोग्य सेवेची पार दुर्दशा झाली आहे.कुपोषणांमुळे दरवर्षी किती बालके मृत्यूमुखी पडतात,याविषयीची आकडेवारी दस्तूरखुद्द जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे नाही.तसेच गरोदरमातांची स्थिती देखील तशीच असल्याचे पाहायला मिळते. मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे जोगलवाडीत वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याला नाशिक…
दीपक मोहिते, मागील वीस वर्षाचा बॅक लॉग भरून काढू – मुख्यमंत्री फडणवीस, लोकसंख्या वाढीच्या तुलनेत गेल्या वीस वर्षांत या तालुक्यातील लोकांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत.त्यामुळे विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता कामाला लागा,आपल्याला विधानसभा निवडणुकीत जसे परिवर्तन घडवले,तसेच परिवर्तन या महानगरपालिका निवडणुकीत घडवायचे आहे,असे उदगार मुख्यमंत्री यांनी वसई येथे झालेल्या कार्यक्रमात काढले.मुख्यमंत्री फडणवीस हे आज वसईच्या दौऱ्यावर आले होते,त्यावेळी ते बोलत होते. वसई येथे वसई- विरार महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट इस्पितळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण तसेच वसईच्या आ.स्नेहा दुबे यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी वसईत आले होते.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले,मुंबई महानगरपालिका व आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रात ज्याप्रकारे विकास झाला,दुर्देवाने तसा तो या…
दीपक मोहिते, सेनेच्या ( शिंदे गट ) कार्यकारिणीची वसईत बैठक, काल १५ जून रोजी वसईत शिवसेना ( शिंदे गट ) वसई तालुका कार्यकारणीची बैठक पार पडली.सदर बैठक जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस तालुका व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.यंदा वसई विरार शहर महानगरपालिकेत महापौर हा शिवसेनेचाच होणार,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला तरी आपण सर्वच्या सर्व जागा…
