Author: दीपक मोहिते

संजय लांडगे, वाडा सारशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती ठाकरे यांची बिनविरोध निवड, वाडा तालुक्यातील सारशी मालोंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती अनिल ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.मावळत्या उपसरपंच उज्वला बांगर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ॲड.दिनेश कोदे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलवण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी आरती अनिल ठाकरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ठाकरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपाली कोदे,नरेश फडवले, उज्वला बांगर,जितेश कोंढारी उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच आरती ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीत ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत…

Read More

सुनीता मराठे,बोरिवली बोरिवली येथे येथील गोखले हायस्कुलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, गोखले एज्युकेशन सोसायटीचे ना.गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल,रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्क बोरिवली ( पूर्व ) व शाळेचा अभ्युदय माजी विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच पार पडले. या शिबिरात ३६५ विद्यार्थ्यांची नेत्र चिकित्सा , दंत चिकित्सा व रक्तगट चिकित्सा करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्कचे खजिनदार राजगौडा पाटील,नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मानस गोरे,आर.एन.शिंदे ॲन्ड सन्सच्या नेत्र तज्ज्ञ डॉ.निता शिंदे,दंततज्ज्ञ डॉ.मंगेश भट, डॉ.यतीन अल्हार,प्रिस्टीन हेल्थ केअरच्या प्रतिनिधी प्रिती खानविलकर,अमन कुमार,नूर शेख,अभुदय माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष राजेश म्हात्रे,सदस्य कुलकर्णी,महेश मोगरे,अस्मिता घोण व श्रुतिका सुर्वे यांचे…

Read More

अनंत भोईर, पालघर पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी ६० हजार २८८ घरकुलांचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत पालघर जिल्ह्यात ६० हजार ८९२ घरकुलांना मंजुरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी ६० हजार २८८ घरकुले मंजुर करणार आली आहेत.घरकुल लाभार्थी संवाद अभियान २०२५ स्वप्न घरकुलाचे साथ शासनाची” या उपक्रमांतर्गत आज अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला.या ऐतिहासिक अभियानाचा शुभारंभ आज मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख,गटविकास अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाभरात पार पडला. तसेच जिल्ह्यात उमेद…

Read More

संजय नेवे,विक्रमगड सेवा विवेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट, बांबू हस्तकलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या सेवा विवेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.गेल्या १४ वर्षांपासून सेवा विवेक संस्था आदिवासी बांधवांना सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने महामहीम राष्ट्रपतींना पालघरच्या प्रसिद्ध बांबू कलेतून साकारलेली भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती महोदया यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त करत यापुढील वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले. ही भेट सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली.सेवा विवेक संस्थेला राष्ट्रपतींनी सदिच्छा भेट…

Read More

वसंत भोईर,वाडा चांबळे गावात ग्रामदेवतांची सोंगे व महिषासुर वध,ठरताहेत आकर्षण, तालुक्यातील चांबळे गावात गेल्या अनेक वर्षापासून रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो.यंदा ” दिलेर डाकू,” हे लोकनाट्य सादर करण्यात आले.हनुमान प्रसादिक मंडळाने हे लोकनाट्य बसवले होते. त्याला गावातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. आज सकाळी ७.०० वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामदेवतेची सोंगे काढण्यात आली होती. दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाला व त्यानिमित्ताने स्थानिक कलाकार सादर करीत असणाऱ्या नाटकाला शतकाची परंपरा आहे. रंगपंचमी पंचमी उत्सव व त्या निमित्ताने सादर केले जाणारे नाटक व ग्रामदेवतांची सोंगे गेल्या चार ते पाच पिढ्यांपासून अखंडपणे सुरू आहे. दुसऱ्या दिवशी गावदेवी, वेताळ,वीरभद्र या ग्रामदेवतांची सोंगे काढण्यात येतात.यावेळी सादर होणाऱ्या…

Read More

जव्हार, प्रतिनिधी, हिरडपाडा माध्यमिक आश्रम शाळेचा ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” अभियानात भरीव यश, महाराष्ट्र शासनाच्या ” मुख्यमंत्री माझी,शाळा सुंदर शाळा,” – टप्पा 2 या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील शाळांची स्पर्धात्मक मूल्यमापन प्रक्रिया पार पडली.या अभियानात जव्हार तालुक्यातील श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित, एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा,हिरडपाडा या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून आदर्श शाळांचे उदाहरण उभे राहावे,यासाठी शासनाने ५ ऑगस्ट २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवले.पालघर जिल्ह्यातील तब्बल ३ हजार १९८ शाळा या अभियानात सहभागी झाले होते.…

Read More

वसंत भोईर,वाडा कोकणातील खनिज संपत्ती भांडवलदारांच्या घशात, पालघर – डहाणूपासून सिंधुदूर्गपर्यंत असणारे विविध तेलसाठे,बॉक्साइट व अन्य खनिज संपत्ती ही अदानी – अंबानी या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारचा आहे.प्रचंड बहुमत असलेले भाजप सरकार,हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी धार्मिक ध्रुविकरण करून समाजात फूट पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वाडा येथे केली. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांनी आज प्रथमच पालघर जिल्ह्याचा दौरा केला.यावेळी वाडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका मांडली.राज्यात शेतमालाला भाव नाही,शेतकरी प्रचंड संकटात आहे,बेरोजगारीने परमोच्च टोक गाठले आहे,सरकारकडे विकासासाठी पैसा नाही. राज्य सरकारने मांडलेल्या प्रचंड तुटीच्या…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यातील जाळे गावात फुलला सूर्यफुलांचा मळा, शेतीची आवड, दांडगी इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर वाडा तालुक्यातील जाळे या खेडेगावातील तरुण शेतकऱ्याने यावर्षी आपल्या शेतीत किलबिया देणाऱ्या सूर्यफुलाचे उत्तम पीक घेतले आहे. शेतीची आवड असलेल्या जाळे येथील प्रदीप गोरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला.नंतर सुशिक्षित बेरोजगार म्हणून कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय ही सुरू केला.अपार मेहनतीने त्यांचे हे दोन्ही व्यवसाय सध्या उत्तम प्रकारे सुरू असून,या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी कुडूस बाजारपेठेत आता दूध डेअरी सुरू केली. खरीप हंगामात भातशेती व रब्बी हंगामात हरभरा,वाल, तूर,मुग,अशा विविध धान्याचे पीक घेणाऱ्या प्रदीप गोरे यांनी यावर्षी रब्बी हंगामात तेलबिया…

Read More

संजय नेवे,विक्रमगड श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आज सहा.गटविकास अधिकाऱ्यांची भेट, विक्रमगड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असुन अनेक ग्रामपंचायतीमध्ये पेसा अंतर्गत अनेक विकासकामे करण्यात येत असतात.या विकासकामांच्या बाबतीत काही तक्रारी यावेळी करण्यात आल्या.तसेच घरकुलातील काही लाभार्थ्यांचा हप्ता मिळत नसल्याने शिष्टमंडळाने मागणी केली. जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाला असून विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात, बोरवेल विहिरीतील पाण्याची पातळी कमी होत असून पाणीपुरवठा विभागाने यावर ठोस उपाय योजावेत,अशा विविध मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या शिष्टमंडळामध्ये मंगेश काळे,रुपेश डोले व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा समावेश होता.

Read More

सुरेश वैद्य,पालघर २८ मार्च रोजी पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन, राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २८ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात येणार आहे. आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराविषयी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी ते बोलत होते. या जनता दरबारात नागरिकांनी आपली निवेदने तीन प्रतीमध्ये सादर करावित. नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी प्रशासनाने विविध विभागाच्या २० टेबलांची व्यवस्था केली असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. सदर ठिकाणी जनता दरबारासाठी येणाऱ्या नागरिकांचे अर्ज नोंदणी करून टोकनचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच जिल्हाधिकारी…

Read More