- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाचे प्रशिक्षण, जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल से जल,” पाणी पुरवठा करण्य़ात येणार आहॆ. त्यासाठी जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासनातर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या निवड सुचीतील मुख्य संसाधन संस्थेतर्फे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाच प्रतिनिधींचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहॆ. तसेच डहाणु तालुक्यामध्येही लक्ष्मी प्लाझा हॉल,डहाणु येथेही शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.सदर प्रशिक्षणाला ग्राम पाणी पुरवठा समिती अध्यक्ष,सरपंच,ग्रामसेवक व इतर सदस्य उपस्थित होते. पाणीटंचाई दूर करणे, आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाला…
नदीम शेख,पालघर पालघर जिल्हा जमीन भरपाईसाठी राज्य मंजुरीची प्रतिक्षा, पालघर जिल्ह्यात खावडा ट्रान्समिशन प्रकल्पांतर्गत राज्य सरकारकडून जमीन भरपाईसाठी मंजुरीची प्रतीक्षा असताना,जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र पीक भरपाई मिळू लागली आहे. आत्तापर्यंत ” राईट ऑफ वे,” प्रक्रियेनुसार जव्हार,वाडा, विक्रमगड आणि भिवंडी या चार तालुक्यांतील ६६ शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे.ही भरपाई ट्रान्समिशन टॉवर्सच्या उभारणीसह सुरू असलेल्या बांधकामामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्रभावित शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक आधार देणे आहे,जेणेकरून ते अडचणीच्या काळात टिकून राहू शकतील.काही शेतांत पाया घालण्याचे काम पूर्ण झाले असून,काही ठिकाणी बांधकाम अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यानुसार पीक भरपाई मिळत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी…
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या मनमानी कारभारावर नाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक पार पडली.ही बैठक स्वतंत्रपणे घेण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत शिंदे समोरासमोर चर्चा केली. मात्र,प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली.त्यामुळे शिंदें गटाचे मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे उघड झाले आहॆ.अर्थमंत्री असलेले अजित पवार हे निधीचे वाटप करताना दुजाभाव करतात,असा आरोप त्यांच्यावर सतत होत असतो. महाविकास आघाडीत असतानाही पवार यांनी अशाप्रकारचा मनमानी कारभार केला होता.त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये त्याना अर्थखाते त्यांच्याकडे देण्यात येऊ नये,अशी मागणी करण्यात…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी जी – ७ परिषदेला जाणार नाहीत, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कॅनडामध्ये जी – ७ शिखर परिषद होत आहे. मात्र,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे.भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध, तसेच,त्यांच्या सुरक्षेची चिंता आणि भारताला अद्यापपर्यंत अधिकृत निमंत्रण न आल्याची अनेक कारणे,यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवरून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या जी – ७ शिखर संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंदर्भात अधिकृत माहीती आली नसली तरी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची हत्या झाल्यानंतर भारत-कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.ही पार्श्वभूमी…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावाला पालकमंत्र्यांची भेट, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवाली गावाची काल पाहणी दौरा केला.यावेळी नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई तत्काळ मिळेल,असे वाटत होते,परंतु नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे बाधित कुटुंबे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकसानग्रस्तांना सीएसआर फंडातून तातडीची मदत व अन्न धान्य देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या आठवड्यात विक्रमगड तालुक्यातील टेटवालीसह नऊ गावाचे वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले होते.अनेक घरावरील छप्परे,कौले व पत्रे उडाले होते,तर काही घरांच्या भिंती पडल्या होत्या.या घटनेत दहा ग्रामस्थ जख्मी झाले होते. तर वीज कोसळून शेतकऱ्यांचे दोन बैलही मृत्युमुखी पडले होते. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या…
दीपक मोहिते, पंचायतराज व्यवस्थेची ऐसी तैसी, उ वसई तालुक्याच्या वार्षिक आमसभेचे दहा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उद्या आयोजन, वसई तालुक्याच्या सन २०२४ – २५ या वर्षाची वार्षिक आमसभा उद्या ४ जून रोजी सकाळी ११.०० वाजता यंग मॅन कॅथलिक असोसिएशन सभागृह, माणिकपूर, ता. वसई, जि. पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर ही आमसभा होत आहॆ.पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभा व आमसभाना अनन्यसाधारण महत्व असते.लोकांसाठी या सभा हक्काचे व्यासपीठ आहॆ. पण गेल्या काही वर्षात ही व्यवस्था मोडीत काढण्याचे प्रशासनातील अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांची अभद्र युती झाल्याचे पाहायला मिळाले. या आमसभा का झाल्या नाहीत ? याविषयी गेल्या दहा वर्षात एकाही मुख्य…
दीपक मोहिते, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा ७७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा… ग्रामीण भागातील जनतेची नाळ विकासाशी जोडण्यात एस.टी परिवहन सेवेचा सिंहाचा वाटा आहे.१ जून हा एस.टी.परिवहन सेवेचा वर्धापनदिन.संपूर्ण राज्यात गेल्या ३ वर्षापासून वर्धापनदिन राज्याच्या सर्व आगारात साजरा करण्यात यावा,असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.वसईतील एस.टी.कामगार संघटना मात्र सरकारचा आदेश येण्याआधीच गेल्या २० वर्षापासून वर्धापनदिन साजरा करत आहे. आपल्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा काल ७७ वा वर्धापन होता.यावेळी वसई एस.टी.कामगार संघटनेने हा वर्धापनदिन वसई गाव बस आगारासमोर साजरा करण्यात आला.एस.टी.परिवहन सेवा कर्मचाऱ्याच्या प्रचंड मेहनतीने व प्रवाशांच्या सहकार्यामुळे आज नफ्यात आहे.परंतु, गेल्या काही वर्षात जुन्या बसेस बदलून नवीन बस खरेदी…
दीपक मोहिते आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे – पालकमंत्री नाईक, राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्येही काही रुग्ण आढळले आहेत.या आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे,असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आढावा.तसेच संभाव्य आपत्तीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकताच जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला. यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,खा.डॉ.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित , जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक देशमुख,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जव्हार आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर,विशाल खत्री,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या जलजीवन मिशन योजनेची केंद्रीय सचिवांनी केली पाहणी, भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे सचिव अशोक कुमार के.मिना यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ५८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलj जीवन मिशन योजनेच्या जलस्त्रोत आणि पाणी शुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.या भेटीदरम्यान त्यांनी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीचे मूल्यमापन केले.यावेळी त्यांच्या सोबत राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे अभियान संचालक ई.रविंद्रन, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बसुर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाध्ये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे,मोखाडा गटविकास अधिकारी…
दीपक मोहिते, पाहणी दौऱ्याचे इव्हेंट व सोहळे झाले उदंड ; पण विकासकामे मात्र जाग्यावरच….. वसई व नालासोपारा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यात असंख्य इव्हेंट पार पडले.या सर्व इन्व्हेंटस सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी किती निगडित आहे,हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.नवीन आमदारांची निवड,त्यांचे सत्कार सोहळे,अर्धवट अवस्थेत असलेल्या विकासकामांची केवळ पाहणी करणे,( अद्याप विस्कळीत असलेला पाणीपुरवठा,पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल व ४१ इमारतीमधील ४०० कुटुंबाचे पुनर्वसन,या व्यतिरिक्त अनेक विकासकामे आजही अर्धवट अवस्थेतच आहेत.) अशी विकासकामे अद्याप अर्धवट अवस्थेत पडून आहेत.पण सोहळ्यांचे इव्हेंटसना अक्षरशः उत आला आहे. तत्कालीन माजी आमदारांनी मंजूर केलेल्या विकसकामाचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली धडपड,पाहता येणाऱ्या साडेचार वर्षात आपल्यासमोर काय…
