Author: दीपक मोहिते

शुभम सावंत विरार, वसई विरार शहर महानगरपालिकेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानांकन, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त देशातील १३ किनारी राज्यामध्ये राज्य सरकार/स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम/मोहिम २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्याचे पर्यावरण व हवामान बदल विभाग,राज्य शासन यांनी निर्देश दिले होते.राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे,जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे,असा हा दिवस साजरा करण्यामागे मुळ उद्देश होता.त्याअनुषंगाने २१ सप्टें.२०२४ रोजी राजोडी बिच,विरार ( पुर्व ) येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका व गो-शुन्य प्रा.लि.यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती. सदर मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक,शाळा, महाविद्यालये,एनसीसी व एनएसएस…

Read More

दीपक मोहिते, वृक्ष प्राधिकरण ; करदात्यांची फसवणूक करणारे प्राधिकरण, राज्यातील प्रत्येक महानगरात वृक्ष प्राधिकरण कार्यरत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या प्राधिकरणाचे काम चालते.मात्र हे प्राधिकरण नक्की काम काय करते ? हा एक संशोधनाचा विषय आहे.आपल्या कार्यक्षेत्रातील वृक्षाचे संवर्धन करणे किंवा वृक्ष कत्तलीला परवानग्या देणे,या दोन महत्वाच्या विषयांपैकी हे प्राधिकरण नक्की कोणत्या विषयावर काम करते,हे त्या त्या भागातील करदात्यांना आजवर कधीच कळले नाही.पण दरवर्षी या महानगरपालिका करदात्यांकडून लाखो रु.चा वृक्ष कर मात्र वसूल करत असते. आपल्याकडून वसूल करण्यात आलेल्या करातून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे,अशी कामे अपेक्षित असताना हे प्राधिकरण विकासकाच्या बांधकामात अडथळे ठरणारे वृक्ष कापण्यासाठी वारेमाप परवानग्या देत असते.या परवानग्या देताना…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन, जव्हार प्रतिनिधी- पंचायत समिती शिक्षण विभाग,जव्हार यांच्या वतीने के. व्ही. हायस्कूल,जव्हार येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केंद्रस्तरातून निवड झालेल्या १६ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेच्या आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी शिक्षण मनीषा डांगे यांनी विशेष नियोजन केले.बचत गटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनातर्फे पारितोषिके ठेवण्यात आली होती.सदर स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी मनीषा डांगे शिक्षक राजेंद्र जोरी व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर पाककला स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पंचायत समिती जव्हारचे सहा.प्रशासन अधिकारी व्ही. एस. महाले, तालुका व्यवस्थापक…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरी तालुक्यात २७ शेतकऱ्यांना विहिरी मंजुर, आदिवासी शेतकऱ्यांनी शेती उत्पन्नातुन आपला विकास करावा,आपले आर्थिक स्रोत वाढावावे,यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.या अनुदानातुन विहीर बांधून आपल्या शेतीसाठी पाण्याचे स्रोत निर्माण करणे, असा शासनाचा उद्देश आहे. तलासरी तालुक्यात पंचायत समितीतर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत असून या योजने द्वारे आदिवासी शेतकऱ्याला जो खातेदार आहे,त्याला नवीन सिंचन विहीर बांधणे,विहीर दुरुस्ती करणे,शेततळे अस्तरीकरण इ.कामासाठी अनुदान दिले जाते. नवीन विहिरीसाठी अडीच लाख रु.जुनी विहीर दुरुस्ती साठी रुपये पन्नास हजार रु. शेततळे अस्तरीकरणासाठी कमाल एक लाख रु.इतके अनुदान देण्यात येते. तलासरी पंचायत समितीतर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने…

Read More

अनंत भोईर,पालघर ” धरणे-सत्याग्रह,” आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्य सरकारी,निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” धरणे-सत्याग्रह,” आंदोलन करण्यात आले.सकाळी ११.०० ते दु.१.०० या दरम्यान झालेल्या या आंदोलनाला कर्मचारी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत आणि महत्त्वाच्या मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात राज्य गट ड व जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना सक्रिय सहभागी झाली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव किशोर प्रल्हाद पाटील,जिल्हाध्यक्ष कल्पेश कोशिंबे,उपाध्यक्ष राजेंद्र वरठा,महिला संघटक सीमा चौधर,सचिव हर्षद निकुळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच समन्वय समितीचे निमंत्रक डी.डी.पाटील, आरोग्य सेवक संघटनेचे अध्यक्ष बालाजी सातपुते, ठाणे-पालघर शिक्षक…

Read More

वसंत भोईर,वाडा, घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर वाजवला बॅन्ड तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील काही कारखानदार हे दोन तीन वर्ष उलटूनही घरपट्टी भरत नाहीत. वारंवार बिले बजावूनही त्याची दखल घेतली जात नाही.मार्च महिना उजाडला तरी अनेक कारखानदार घरपट्टी भरीत नसल्याने आज ग्रामपंचायतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बॅन्ड वाजवून त्यांना जागे करण्याचा अनोखा फंडा वापरला.या अनोख्या फंड्याची चर्चा तालुकाभर होत आहे. घोणसई मेट ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कारखान्यांच्या घरपट्ट्याची थकबाकी अनेक वर्षापासून आहे.वारंवार बिले बजावूनही अनेक उद्योजक त्या भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.अनेक कारखाने सुस्थितीत चालू असतानाही ते बिले भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.वर्ष अखेर मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी उद्योजक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.अखेर…

Read More

वसंत भोईर,वाडा वनहक्क सहा.व तालुका व्यवस्थापक यांच्या मानधनात वाढ करा, जिल्हा समन्वयक वनहक्क सहाय्यक व तालुका व्यवस्थापक,या कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मानधनात अवश्यक ती वाढ करण्यात यावी,अशी मागणी पालघरचे खा.डाॅ.हेमंत सवरा यांनी आदिवासी विकासंत्री अशोक ऊईके यांच्याकडे केली आहे. जिल्हा कार्यालय पालघर येथे जिल्हा व्यवस्थापक,जिल्हा रामन्वयक वनहक्क राहाय्यक,तालुका व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत असलेले कर्मचारी हे आदिवासी जनतेकरीता आदिवासी जिल्ह्यात वनहक्क कायद्यांतर्गत वनहक्काबाबतच्या कामासाठी गेली १२ ते १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.सदर कर्मचाऱ्याची आदिवासी विकास विभाग यांचे अंतर्गत वनहक्काच्या कामासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात नियुक्ती झाली आहे.वनहक्क कायद्यांतर्गत काम करत असताना कामाचे स्वरूप पाहता त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे.तरी या…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे पालघर जिल्हा परिषदेत उद्या एक दिवसीय प्रदर्शन व विक्री, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पालघर येथे महिला स्वयंसहायता समूह गटांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) तर्फे उद्या सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आहे आहे. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांकडून उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.महिला गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे टीबी मुक्त गाव जनजागृती अभियान संपन्न. जे.एस.डब्लू.फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त गाव जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात पार पडले.जामसर,तालुका जव्हार येथील ग्रामपंचायत अंतर्गत वेलीचापाडा,देवतळी, तेलीचापाडा, बहुपाडा या गावांमध्ये तीन दिवस विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. जव्हारसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात क्षयरोग (टीबी) हा एक महत्त्वाचा विषय आहे.नुकत्याच झालेल्या या मोहिमेत २०० हून अधिक ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले होते.स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. वाढती लोकसंख्या,आरोग्य शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा यामुळे टीबीवरील जनजागृतीची गरज ओळखून ” जेएसडब्लू फाउंडेशन आणि स्थानिक आरोग्य संस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला. यावेळी नर्सिंग विद्यार्थ्यांनी पथनाट्य,पोस्टर प्रदर्शन…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी भागात चौथी मुंबई आकाराला येणार… मुंबई व आसपासच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी केंद्र व राज्यसरकारतर्फे संयुक्तरित्या विविध महत्वाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली आहे. वर्सोवा ते मढ आणि वर्सोवा पासून भाईंदरपर्यंत एक सिलिंक जाणार आहे.हा सिलिंक मढहून पुढे विरारपर्यंत जाणार आहे.मुंबईची ६० टक्के वाहतूक ही पश्चिम भागात आहे.हे सिलिंक एकदा सुरू झाले तर पश्चिमेस असलेल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक डायव्हर्ट होईल.सध्या मुंबईहून विरारला जाण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतात.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघे २५ मिनिटांवर येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले…

Read More