- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार,त्या महिलेची सरळ जाहीर माफी मागा… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालिशपणा काल उभ्या महाराष्ट्राने अनुभवला.सोलापूरच्या पोलीस अधिक्षका अंजली कृष्णा यांना ” आपण जो फोन केला तो गावात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये,यासाठी होता,असा हास्यास्पद खुलासा करताना अजित पवार पाहायला मिळाले.त्यांचा हा खुलासा कोणालाच पटला नाही.अजित पवार हे आपल्या राजकीय जीवनात कधीही सामंजस्य व समजूतदारपणा दाखवत वावरले नाही.काकांच्या उपकारामुळे मिळालेली सत्ता,ही आपलीच जागीर आहे,अशा गुर्मीत ते सतत वावरत असतात.त्यांच्या या अशा वागण्यामुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.धरणात मुतु का ? असा सवाल शेतकऱ्यांना विचारणाऱ्या अजित पवार यांना कृष्णेकाठी दिवसभर फतकल मारून बसायला लागले होते.त्यांच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – भाग क्र,२, प्रभाग क्र २ ; अनेक समस्या ” जैसे थे,” स्थितीत,मतदारांमध्ये प्रचंड नाराजी… कालच्या लेखात आपण प्रभाग क्र.१ ची रचना कशी असेल,तसेच या प्रभागामधील समाजरचना व प्रलंबित विकासकामे यावर प्रकाशझोत टाकला.या आपल्या पहिल्या वहिल्या लेखाला वसई- विरारकर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या लेखमालेला सुरुवात करत असताना निवडणूक आयोगाने काल प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची संख्या एका पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली.लवकरच त्याचा निपटारा करण्याचा आयोगाकडून प्रयत्न सुरू होणार आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर होतील,असे संकेत मिळू लागले आहेत. वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात एकूण १६० हरकती…
दीपक मोहिते, प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट, २०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी २२ ऑगस्ट ते ०४ सप्टें.२०२५ असा कालावधी देण्यात आला होता.या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.सदर प्राप्त हरकती मध्ये १० मूळ हरकतींसोबत त्याच स्वरूपाचे २ हजार १३० नागरिकांनी सामुहिकरित्या दाखल केलेल्या एका हरकतीचा समावेश आहे.सदर हरकती व सूचना दाखल…
दीपक मोहिते, ” निव्वळ मुजोरी,” याला पुरुषार्थ म्हणायचा का ? काल राज्याचे तोंडाळ मंत्री म्हणून ओळख असलेल्या,साधी मराठी भाषा व्यवस्थित बोलता न येणारे व अंगी प्रचंड माज असलेले मंत्री,अशी ओळख असलेल्या अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.लाडक्या बहिणींचा निवडणुकीच्या काळात उदो उदो करणारे अजित पवार यांचा खरा चेहरा काल त्यांच्या लाडक्या बहिणींना पाहायला मिळाला.गैर व भ्रष्ट कारभाराचे जनक असलेले अजित पवार हे पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.त्यांच्या या अतिरेकी स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. काल सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व,- प्रभाग क्र.१, प्रभाग क्र.१ हा विकासाच्या बाबतीत अजूनही अंधारातच…. वसई-विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना गेल्या महिन्याच्या अखेरीस जाहीर झाली.त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या,काल तिची मुदत संपली.या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोग,निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करतो,याकडे आपले सर्वांचे लक्ष लागले आहे.सुमारे २९ प्रभागातील ११५ जागांसाठी या निवडणुका होत आहेत.त्यासाठी ११ लाख ५६ हजार २०९ मतदार आपल्या हक्काचे ५८ नगरसेवक व ५७ नगरसेविका,असे आपले एकूण ११५ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आहेत.या निवडणुकीची प्रभाग रचना,प्रभागनिहाय मतदारसंख्या,अनु.जाती व जमाती किती मतदार आहेत.तसेच प्रभागात झालेली विकासकामे,राजकीय स्थिती,प्रलंबित नागरी समस्या व मतदारराजाचे म्हणणे,अर्थात त्यांच्या प्रतिक्रिया,याचा समावेश असेल.ही…
दीपक मोहिते, मराठा आरक्षण ; निर्णयाची अंमलबजावणी अशक्य, दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने मराठ्यांच्या आरक्षण विषयी ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.पण या निर्णयाचा आनंद जास्त काळ टिकणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये,या मागणीवर ओबीसींचे नेते ठाम असताना,आता त्यांनी मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर लागू होऊ नये,यासाठी एल्गार पुकारला आहे.छगन भुजबळ,लक्ष्मण हाके,हरिभाऊ राठोड व बबनराव तायवाडे या ओबीसी समाजाच्या नेत्यानी शासनाच्या या निर्णयाविरोधात आता रान उठवण्यास सुरुवात केली आहे.तर छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला दांडी मारत आपल्याच सरकारला ” माहेरचा आहेर,” दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहता काल त्यांनी आपल्या एमआयटी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण हवे,” या मागणीचे काय झाले ? मराठ्यांच्या आरक्षण प्रश्नी गेले पाच दिवस सुरू असलेल्या लढ्याला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पूर्णविराम मिळाला.या लढ्यात कोण जिंकले व कोण हरले ? हा आज ना उद्या वादाचा मुद्दा ठरू शकतो.कारण,मराठ्यांचे नेते मनोज जरांगे यांनी आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावे,यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून धरली होती.ती मागणी पूर्ण झाली नाही,त्यामुळे जरांगे पाटील जिंकले,असे म्हणता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रश्नी हस्तक्षेप करावा,यासाठी सरकारने पडद्याआड ज्या हालचाली केल्या,त्या यशस्वी ठरल्या. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवण्यासाठी ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या,त्यांच्या नावावरून नजर टाकल्यास या प्रकरणी नक्की काय घडले असणार…
दीपक मोहिते, शासनाच्या निर्णयाने मराठा समाजाने हुरळून जाता कामा नये, हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे ? हैद्राबाद गॅझेट हे १८८४ साली निजामशाही सरकारकडून प्रकाशित केलेला अधिकृत अहवाल आहे.या गॅझेटमध्ये १८८१ च्या जनगणनेवर आधारित माहिती नोंदवण्यात आली होती.त्यावेळी हैद्राबाद राज्यात असलेला औरंगाबाद ( सध्याचे छत्रपती संभाजीनगर ) जिल्हा, त्यामधील वैजापूर आणि इतर तालुके यामध्ये विविध जाती-समुदायांची लोकसंख्या नमूद करण्यात आली होती. यात कुणबी समाजाची लोकसंख्या वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचा उल्लेख आहे.मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे म्हणणे असे की,मराठा समाज आणि कुणबी समाज यांचे ऐतिहासिक नातं आहे.त्यामुळे मराठ्यांना कुणबी समाजाशी जोडून ओबीसी आरक्षण मिळावे,त्यासाठी हे गॅझेट ते ऐतिहासिक पुरावा म्हणून…
दीपक मोहिते, तिसरे महायुद्ध दक्षिण आशिया खंडात होण्याची शक्यता, गेल्या ७५ वर्षात अमेरिकेला अनेक देशात मानहानी पत्करत माघार घ्यावी लागली. त्यामध्ये अफगाणिस्तान, व्हियेतनाम,इराक,या देशांचा समावेश होता. सोव्हीयत रशियाचे विघटन झाल्यानंतर अमेरिकेने मध्यपूर्व देशात विस्तारवादी धोरण राबवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना याप्रकरणी फारसे यश मिळाले नाही.या देशातील कट्टरवादी टोळ्यांनी अमेरिकेची डाळ शिजू दिली नाही. सैन्यावर होणारा अमाप खर्च व आपल्या जवानांचे जाणारे बळी,अशा दोन कारणामुळे अमेरिकन जनतेमध्ये रोष वाढला व अमेरिकेने या देशातील आपले सैन्य माघारी बोलावले. पण त्यानंतरही अमेरिकेची खुमखूमी काही कमी झाली नाही. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्हाल्दीमीर पुटीन यांच्या कणखरपणापुढे त्यांचे काही चालले नाही.रशियाला अधिक कमकुवत करण्यासाठी अमेरिकेने “…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटलांनी मुंबईकर जनतेची सहानुभूती गमावली, मराठ्यांचे नेते जरांगे पाटील यांना त्यांच्याच साथीदारांनी सध्या अडचणीत आणले असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांना मुंबई आणून आपली ताकद दाखवून दिली.पण आता त्यांनी न्यायालय व मुंबईकरांची सहानुभूती पार गमावली आहे.आरक्षणाचा प्रश्न हा कधीही ताकदीच्या जोरावर सुटू शकणार नाही,हे जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यायला हवे होते. मुंबई शहर हे गेल्या चार दिवसापासून कोमात गेले आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दिवसाकाठी कोट्यवधी रु.आर्थिक उलाढाल होत असते.मुंबई म्हणजे अंतरवाली सराट नव्हे,हे शहर दररोज फक्त दोन तास झोपत असते.अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराचे आर्थिक व्यवहार सलग चार दिवस…
