Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, भाग क्र. २, ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे शेअर बाजार कोसळला,एका दिवसात १७ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व अॅलन मस्क या दोघांनी घेतलेल्या विविध निर्णयाविरोधात त्यांच्या देशातील छोटे व्यापारी व जनता आता रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागली आहे.पण हट्टी स्वभाव असलेले ट्रम्प आपल्या निर्णयात बदल करतील,असे वाटत नाही.दरम्यान ट्रम्प यांना रोखण्यासाठी चिनी ड्रॅगन पुढे सरसावला आहे.चीनच्या सरकारनेही ट्रम्प या निर्णयाला सडेतोड उत्तर दिले आहे.त्यांनीही अमेरिकेच्या उत्पादनावर लावण्यात येणारे शुल्क वाढवले आहे. दरम्यान ट्रम्प यांना अमेरिकन व्यापारी व लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.ट्रम्प यांच्या निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.काल जगभरातील शेअर बाजार जबरदस्त कोसळला.एका दिवसात सुमारे…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे, ९ एप्रिल रोजी पालघर येथे लोकदरबाराचे आयोजन, पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुध.९ एप्रिल,२०२५ रोजी दु.३.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील,नियोजन समिती सभागृह,पालघर येथे लोक दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकदरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधणार असून पालघर जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख या लोकदरबारास उपस्थित राहणार आहेत.पालघर जिल्ह्यातील लोकदरबार कार्यक्रमामध्ये दु.१.०० वाजल्यापासून नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहेत.तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या लोकदरबारास उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

Read More

जव्हार प्रतिनिधी, देहरे आश्रमशाळा येथे करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न, विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी नंतर कोणत्या दिशेने वाटचाल करावी,कोणते करिअर निवडावे,स्पर्धा परीक्षा,कौशल्याधारित शिक्षण,तांत्रिक अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्र,परदेशी शिक्षण अशा विविध संधींबाबत योग्य माहिती मिळावी,या उद्देशाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,देहरे ( जव्हार ) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत “ दहावी व बारावीनंतर काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना समोरासमोर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर मानभाव ( पोलीस निरीक्षक, जव्हार ) यांनी पोलीस भरती,विविध स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती दिली.त्यांनी सायबर गुन्हेगारी व ‘अपघातमुक्त गाव’ या संकल्पनांचे प्रबोधन करत सामाजिक सजगतेचा…

Read More

रविंद्र राऊळ,मुंबई उत्तर मुंबईत साजरा झाला रामनवमी सोहळा, उत्सव रॅली,शोभा यात्रा,भव्य पालखी सोहळा आणि गरबा रजनी अशा अनेकविध धार्मिक कार्यक्रमांनी काल उत्तर मुंबई दुमदूमली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीने जल्लोषात अधिकच भर पडली. मालाड ( पूर्व ) येथील कुरार गावातील जमरुषी नगरात भव्य रामनवमी उत्सव रॅली काढण्यात आली. मालाडच्या गोरसवाडी येथील भद्रनगर राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. मालवणी येथील सकल हिंदू समाजातर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये विश्व हिंदू परिषद, दिंडोशी येथील बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मालाड ( पश्चिम ) येथील शैलेश नगरात भव्य रामनवमी जन्म उत्सव…

Read More

शशिकांत ठाकूर,कासा घोळ टोल नाक्याजवळ लाखों रु.चा खैराचा माल जप्त, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोळ टोलनाक्याजवळ काल मोठी कारवाई करत आठ लाख रु.चा अवैध वाहतूक करणारा खैर जप्त करण्यात आले.सदर कारवाई वनविभागाच्या गस्त पथकाने केली आहे.यामध्ये मालासह अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. सदर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर खैर सापडला असून या प्रकरणात ट्रकचालक सरफुद्दीन शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र,या तस्करीमागचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे समजते.यामागे मोठी टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर कारवाई कासा वन परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन.ए.हिरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे.के.चौधरी एम.ए. कांबळे आणि वनरक्षक आर. एस.हाडळ,वाय.पी.मोळे, यांच्या पथकाने केली.

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा, जगातील सर्वांत मोठ्या, सुसंस्कृत आणि विकासाचे दृष्टिकोन असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज सकाळी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तालुका सरचिटणीस रोहन पाटील यांच्या हस्ते कार्यालयावर पक्षध्वज फडकवण्यात आला. भाजपा पक्षाने देशाला अनेक विधायक गोष्टी देऊन जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावण्याचे काम केले आहे.देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.राष्ट्र प्रथम,सेवाभाव सर्वोच्च, देव ,देश,आणि हिंदुधर्म संरक्षित व सुरक्षित करण्याचे काम भाजपने केले आहे.कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे भाजप अशी त्याची जनमानसात आज ओळख आहे. याप्रसंगी जेष्ठ नेत्या शुभांगी…

Read More

वसंत भोईर,वाडा अद्रक लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, तालुक्यात काही शेतकरी अद्रकची लागवड करतात. गतवर्षी बारा,पंधरा हजारांचा पल्लागाठत अद्रकने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले होते.परिणामी,यंदा काही शेतकऱ्यांनी अद्रकची लागवड केली.परंतु सडीचे प्रमाण वाढल्याने अद्रकची माती झाली.भावही पडला,त्यामुळे विकतचे बेणे आणून अद्रक लावणाऱ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत कमी नफा झाला. अद्रक म्हणजे आल्याची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान असलेली जागा लागते.आल्याची लागवड मार्च -एप्रिल मध्ये केली जाते.हे पीक घेण्याचा कालावधी साधारणपणे आठ ते दहा महिने असतो.दोन ओळींमध्ये अद्रक लागवड केली जाते. तालुक्यात नदीकाठचे काही शेतकरी अद्रकची लागवड करत आहेत.ही लागवड साधारणतः पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी करतात. कृषी विभागाचे मार्गदर्शन व अनुभवाच्या जोरावर अद्रक…

Read More

जव्हार प्रतिनिधी, सहा.जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर ( भा.प्र.से ) यांची पदोन्नती होऊन त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या सन्मानार्थ शुभेच्छा समारंभाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार येथे करण्यात आले होते. या समारंभाचे अध्यक्षस्थान विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी भूषवले.आ.भोये यांनी करिश्मा नायर यांनी आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. “ त्या एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून,त्यांच्या कार्याचा ठसा हा जव्हारकरांच्या मनात सदैव राहील,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. करिश्मा नायर यांच्या कार्यकाळात प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधांचा विकास,…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार-गरदवाडी येथे विहिरीचे लोकार्पण, ग्रामपंचायत कासटवाडीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने केलेल्या योजनाबद्ध कामामुळे मौजे गरदवाडी येथील आंब्याच्या पाडा परिसरात नवीन विहिरीचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरदवाडीतील कातकरी वस्तीतील पाण्याची टंचाई लक्षात घेता विहीर हा गावासाठी एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक प्रकल्प होता.ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगाचा निधी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच कल्पेश राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, आदिवासी विकास विभाग, पीएम जनमन,आदी-आदर्श,…

Read More

जव्हार प्रतिनिधी, विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता वाढीसाठी जव्हार शिक्षण विभागाने सुरू केला उपक्रम, पंचायत समिती जव्हार जिल्हा पालघर प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना -कार्यशाळा, प्रदर्शन २०२४- २५ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारच्या गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे, विस्तार अधिकारी ( शिक्षण विभाग ) केंद्रप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा डांगे यांनी केले.त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यानी विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना कार्यशाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अध्ययनशीलता वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, अध्ययन प्रक्रिया आनंददायी सुलभ करणे,अध्ययनातले अडथळे दूर करणे,अशा उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत…

Read More