- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” मतमोजणी पुढे ढकलणे,मतदारांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करण्यासारखे…. केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार दिवसेंदिवस सैरभैर होत असून त्याचा फटका सर्वसामान्य मतदार व राजकीय पक्षांना बसत आहे.अशा या बदनाम केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आगपाखड करत असतात.यंदा भाजप,हा प्रथमच आयोगावर तुटून पडला आहे.एरवी भाजप आयोगाची बाजू घेऊन विरोधकांना खडे बोल सूनवत होता.तोच भाजप आता आयोगाला खडे बोल सूनवु लागला आहे.भाजपच्या वागण्यात अचानक झालेला बदल हे सारे विस्मयजनकच आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गेल्या बारा वर्षातील कारभार पाहता या संस्थेची विश्वासार्हता व पारदर्शकता पार रसातळाला गेल्याचा अनुभव मतदारांनी पावलोपावली घेतला.अनेक प्रकरणी त्यांनी संशयास्पद निर्णय दिले.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे त्यांच्याविषयी असलेले ममत्व…
दीपक मोहिते, २ डिसें.नंतर काय होणार ? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज होणाऱ्या निवडणुकांपैकी काही नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूकाना,निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.आयोगाच्या या निर्णयाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अंगाची लाही लाही झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी आयोगावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.आपल्या मनाविरुद्ध एखादा निर्णय झाला की भाजपचे नेते चवताळून उठतात.त्यांची आयटी टीम लगेच कामाला लागते.आपण वाटप केलेला पैसा वाया गेला म्हणून हा थयथयाट झाला असावा,अशा संशयाला जागा आहे.या निवडणुकीत कोटी कोटीची उड्डाणे झाली,मालवण येथे जे काही महाभारत घडले,त्यावरून यापुढे काहीही होऊ शकते,अशी आपली धारणा झाल्यास,ते चुकीचे ठरू नये.मालवणच्या निवडणुकीत मतदारांना वाटप करण्यासाठी त्या शहरातील आठ ते दहा घरात…
दीपक मोहिते, निवडणुक रणसंग्राम, माजी निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन आज हयात असते तर … गेले दहा दिवस सुरू असलेल्या नगरपरिषदा व नागरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता थांबणार असून आजची रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याची रात्र आहे.कारण,रात्रीच्या अंधारात ” रात्रीचा खेळ चाले,” या प्रयोगाचा खेळ हा गेल्या दहा दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरवणारा असतो.त्यामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्याना रात्रभर ” जागते रहो,” च्या भूमिकेत राहावे लागते. गेल्या १२ वर्षापासून आपल्या देशात रात्रीच्या वेळी ” पैश्याचा खेळ चाले,” हा नवीन खेळ सुरू झाला आहे आणि हा खेळ तुमच्या आमच्या मनात रुजवण्याकामी या नाट्याचे निर्माते कमालीचे यशस्वी झाले आहेत.त्यामुळे या खेळात कोटी,कोटीची उड्डाणे पाहायला मिळू…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीच्या प्रचारावर यंदा सोशल मीडियाचा मोठा प्रभाव,इतर माध्यमात मात चिंतेचे वातावरण… ग्रामीण भागात नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार धूमधडाक्यात सुरु असून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी यावेळी प्रचारात प्रसिद्धी करण्यासंदर्भात वारेमाप खर्च करण्याचे टाळले आहे.त्यांच्या आयटी टीमने प्रचारासाठी सोशल मीडियाचा चांगला आधार घेतला आहे.तर अनेक उमेदवार फेसबुक,व्हाट्सअप, इंस्टाग्राम,इ.चा बेमालूम वापर करत आहेत.या माध्यमातून उमेदवार स्वतः थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.त्यामुळे पैसा व वेळेची चांगलीच बचत होत आहे.प्रचार संपण्यास आता अवघे ३६ तास उरले आहेत.या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद,पंचायत समित्या व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.या सर्व निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचाराचा फोकस ” परिसर विकास व सर्वंसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या…
दीपक मोहिते, ” कुरुक्षेत्र,” वसई – विरार उपप्रदेशात महाविकास आघाडीचे नाणे चालणार नाही… सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.त्यामुळे राजकीय क्षितिजावर हालचालींना वेग आला आहे.शहरी व ग्रामीण भागात आपले पाय घट्टपणे रोवण्यासाठी राजकीय पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात.राज्यस्तरावर युती व आघाड्या होत असल्या तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या प्रयत्नात असतात.कारण,प्रत्येक पक्षाला सत्तेत वाटेकरी नको असतो.युती व आघाड्या झाल्यास जागावाटपात त्यांच्या वाट्याला अपेक्षित असलेल्या जागा मिळत नाहीत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना उद्धव व…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये बखेडा… प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षासह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते फोडण्याचा जो सपाटा लावला आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता.त्यामुळे महायुतीमध्ये सारे काही आलबेल नाही,हे उघड झाले.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकतेच ” मला २ डिसें.पर्यंत युती टिकवायची आहे,” असे विधान केले.त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. त्यांनी केलेल्या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी पलटवार करताना चव्हाण यांना चांगलेच खडे बोल सुनावले.त्यामुळे महायुतीचा रबर आता मोठ्या प्रमाणात ताणला गेल्याचे उघड झाले आहे.पूर्वी भाजप…
दीपक मोहिते, निवडणूकपर्व, अखेर अनिश्चितता संपली,न्यायालयाच्या निर्णयाने नागरिकांना मिळाला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात आज दिलेल्या निकालाने महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.आजच्या त्यांच्या या निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद,पंचायत समित्या व महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सर्वं थरावरून स्वागत झाले.हे स्वागत होणे साहजिकच आहे. शहरी व ग्रामीण भागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार,हा प्रदीर्घ काळ नोकरशाहीच्या ताब्यात राहणे,हे न्यायाला धरून नव्हते.त्यामुळे या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सतत लांबणीवर पडणे,हा प्रकारच मुळात नागरिकांचे हक्क व अधिकाराला बाधा आणणारा होता.पण राज्य सरकार व निवडणूक आयोग/ न्यायपालिका यांच्या मिलिभगतामुळे नागरिकांना आपले अधिकार व हक्कापासून प्रदीर्घ काळ वंचित राहावे लागले.…
दीपक मोहीते, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्राला दिलासा ; राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा… राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरक्षणा संदर्भात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.पुढील सुनावणी २१ जाने.रोजी ठेवण्यात आली आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील २८८ नगरपरिषदा,नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार,असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.राज्यातील ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती.त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्था.स्व.सं.च्या निवडणुकांमध्ये ” ठाकरे ब्रँड,” टिकणार का ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत ” ठाकरे ब्रँड,” टिकणार की नाही,हे ठरणार आहे.त्यामुळे उद्धव व राज ठाकरे,या दोघांचे या निवडणुकीत सर्वस्व पणाला लागणार आहे.ज्या बाळासाहेब ठाकरे या ब्रँडमुळे राष्ट्रीकृत बँका, रेल्वे व सरकारी आस्थापनामध्ये मराठी माणूस पाहायला मिळतो,तो भविष्यात दिसेल का ? असा प्रश्न साहजिकच मराठी माणसाच्या मनात आता उभा राहू लागला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाने जे स्वप्न उराशी बाळगले होते,ते तत्कालीन नेत्यानी आपले अथक प्रयत्न तसेच १०५ हुताम्यांच्या बलिदानाने मिळवून दिले. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे,प्र.के.अत्रे,थोर समाजवादी नेते एसेम व अन्य नेत्यानी त्यावेळी झालेल्या संघर्षात आपल्या…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली.. महंगारपालिकेचे बिगुल अद्याप वाजले नसताना भाजपने आपल्या विरोधकांच्या बदनामीचा भोंगा वाजवण्यास सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीच्या एका नेत्यांचे जुने जमीन हडप प्रकरण उजागर करून भाजपने आपल्या प्रमुख विरोधकाला अडचणीत आणले आहे.या पहिल्या दणक्यानंतर आणखी काही नेते त्यांच्या रडारवर आहेत.कोट्यवधी रु.ची सरकारी जमीन या माणसाने कशी हडप केली व त्यावर कारवाई कशी होत नव्हती,हे परवा रात्री चार जणावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वसईकर जनतेला कळले. या जमीन हडप प्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे दोन माजी आयुक्त,नगर रचनाकार व अन्य एक जण,अशा चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.गेल्या तीन ते चार…
